-१-
ओळख
कालचं वाचलं -
की पृथ्वीचा जन्म १३७० करोड वर्षांपूर्वी झालाय
आणि ...
ही खिडकी, चेहरे, ऊन, घर, अनुभव,
दुःख, संवाद, पक्षी, युद्धं, प्रेम, दिवस, रात्र,
तुम्ही, मी, देव.....
सगळं... सगळं कसं ओळखीचं वाटू लागलंय
अचानक !
-२-
सोवळं
“हात लावू नकोस तिथे” दुरून ओरडलात तुम्ही
“सोवळ्यात आहोत, दिसत नाही का?” कडाडलात तुम्ही
अंगभूत पापभीरूपणे
(आणि धार्मिक ऐवजी अध्यात्मिक असल्याने)
मी चटकन सरकलो दोन पावलं मागे....
म्हटलं नको मोडायला तुमच्या मंदीराची पवित्रता!
मग मात्र उगाच आठवत राहिले -
तुमचे ते न धुतलेले अस्वच्छ हात
येता जाता उच्चारलेले ते अर्वाच्य शब्द
ओठी एक आणि पोटी एक वागवलेली, चक्रावून टाकणारी गाणी
आणि स्वतःच्या स्वार्थाभोवती घोटाळलेलं तुमचं संपूर्ण जग.....
पैश्यामागे नको तसे धावतानाही
तुम्ही असता का हो तसेच शुचिर्भूत?
रागाचा पारा काय ... चढवता येईल मला पण इतरांसारखा
पण.....
त्या सोवळ्याआड कसंही वागायचं ’लायसन्स’ मिळवलंय तुम्ही
आणि सोवळं नसल्यामुळे...
माझ्या प्रार्थना मीच वहायची मोठी जोखीम पेलतोय मी !
-३-
पर्णकुटी
म्हटलं वनवास तर काय कुणाला चुकायचा नाही
तेंव्हा बांधायला घ्यावी
आपली आपणच एक छोटी पर्णकुटी....
शोधून आणल्या मग
वनभर पसरलेल्या अबोल वेली,
माझ्या भूतकाळासारख्या दिसणार्या निर्मम झावळ्या
आणि उगाचच खोटं खोटं आश्वस्त करणारे
बांबूचे पोकळ खांब !
झालं... छत शाकारलं.... अंगण उभारलं....
कंदीलही तेवता केला - माझ्या असण्या आणि नसण्यावर !
वनवासाचा एकेक दिवस वजा करत करत
चांगली भक्कम बांधली होती मी पर्णकुटी..
तेवढा तो एक कांचन-मृग दिसायला नको होता !!!
Tuesday, January 24, 2012
Tuesday, January 17, 2012
डोक्यात जाणे - भाग २
पुण्यातल्या हॉटेल्समधल्या वेटर्सचे प्रकार दोन.....
१) गिर्हाईकाकडे दुर्लक्ष करणारे
आणि
२) गिर्हाईकाकडे साफ दुर्लक्ष करणारे
तुम्ही कितीही आदळआपट करा ते त्यांच्या कलाने जाणार आणि त्याला हवे तेंव्हा, हवे तेवढे आणि हवे तसेच तुमच्या पदरात errrrr ताटात पडणार !
पुण्यातल्या रिक्षावाल्यांचे प्रकार दोन......
१) जवळची अथवा लांबची भाडी नाकारणारे
आणि
२) सर्व प्रकारची भाडी नाकारणारे
रिक्षा या त्रिकोणी वाहनाचा शोध लावणार्या बजाज कंपनीतल्या इंजिनियरचा मला आधी सत्कार करायचा आहे. माणसाच्या शरीरात ज्याप्रमाणे appendices नावाचा बिनकामी अवयव कोणत्याही कारणाशिवाय दिलेला असतो तसा रिक्षांमध्ये इंडीकेटर हा फक्त जागा व्यापण्यासाठी बसवलेला पार्ट मानावा.
पुणेरी रिक्षावाले कोणते भाडे न्यायला होकार देतात ह्या विषयावर अनेक मान्यताप्राप्त विद्यापीठांमध्ये सखोल संशोधन चालू आहे.
पुण्यातील दुचाकीस्वारांचे प्रकार दोन.....
१) बेशिस्त
आणि
२) अतिशय बेशिस्त
’वाहतुकीचे नियम ही काय पाळण्याची गोष्ट आहे का?’ हा विनोद तर खुप जुना झाला. सध्या पुणेरी दुचाकीचे लायसेन्स देताना फूटपाथवर गाडी घालता येणे, सिग्नल तोडणे, उलट्या बाजूने येणे, कर्णकर्कश हॉर्न वाजवायची आवड असणे, डावीकडून गाड्या टाकून रस्ता ब्लॉक करणे आदी अत्यावश्यक गुणांची चाचणी घेतली जात असावी !
पुण्यातील बिल्डर्सचे प्रकार दोन.....
१) ग्राहकांना लुबाडणारे
आणि
२) ग्राहकांना पुरेपुर लुबाडणारे
माणूस बदलतो म्हणजे काय होते याचे उदाहरण पहायचे असेल तर Agreement करण्यापूर्वीचा बिल्डर आणि सर्व पैसे देउन झाल्यानंतर दिसणारे तयाचे रूप याचा अभ्यास करावा.
गरीब पारशी, गरम तव्यावर उगाचच पाणी मारून चर्रर्रर्र आवाज न काढणारा डोसावाला, एजंटच्या आधी सर्वसामान्य ग्राहकांना preference देणारी पोस्टातली कर्मचारी, आवाज न करणारी P.M.T. ची बस आणि वेळेत पझेशन देणारा बिल्डर या गोष्टी अद्याप कोणी पाहिल्या नसाव्यात !
पुण्यातील दुकानदारांचे प्रकार दोन......
१) गिर्हाईकाने मागितलेली वस्तू ’नाही’ म्हणून सांगणारे
आणि
२) गिर्हाईकाने मागितलेली वस्तू ’संपलीये’ म्हणून सांगणारे
यात पारंपारीक निरूत्साही दुकानदारांबरोबरच ’क्रॉसवर्ड’, ’शॉपर्स स्टॉप’, ’सब-वे’ अश्या तारांकीत ब्रॅंडसचाही समावेश होतो.
खरेदी करायला आलेल्या व्यक्तीला ’नाही’ हा शब्द विजयीमुद्रेने ऐकवून रिक्त हस्ते पिटाळण्यात यांना बहोत मजा येत असावी.
पुण्यातील भाषेचे प्रकार दोन......
१) भोचक
आणि
२) खोचक
जिज्ञासूंनी स्वतः अनुभव घेऊन पहावा !!
पुण्यातील कार्यक्रमांचे प्रकार दोन....
१) वेळेत सुरू न होणारे
आणि
२) वेळेत कधीही सुरू न होणारे
प्रेक्षकांच्या उपहासात्मक टाळ्या, बाहेर गाडी लावलेल्या भैय्याच्या भेळचा खप, टॉयलेटमधील द्रावणाची पातळी, बसलेल्यांच्या पायातल्या मुंग्या इत्यादी गोष्टी कमाल सीमेला जाउन ठेपल्या की मग कार्यक्रमाला तब्ब्येतीत सुरूवात होते !!
(क्रमशः)
१) गिर्हाईकाकडे दुर्लक्ष करणारे
आणि
२) गिर्हाईकाकडे साफ दुर्लक्ष करणारे
तुम्ही कितीही आदळआपट करा ते त्यांच्या कलाने जाणार आणि त्याला हवे तेंव्हा, हवे तेवढे आणि हवे तसेच तुमच्या पदरात errrrr ताटात पडणार !
पुण्यातल्या रिक्षावाल्यांचे प्रकार दोन......
१) जवळची अथवा लांबची भाडी नाकारणारे
आणि
२) सर्व प्रकारची भाडी नाकारणारे
रिक्षा या त्रिकोणी वाहनाचा शोध लावणार्या बजाज कंपनीतल्या इंजिनियरचा मला आधी सत्कार करायचा आहे. माणसाच्या शरीरात ज्याप्रमाणे appendices नावाचा बिनकामी अवयव कोणत्याही कारणाशिवाय दिलेला असतो तसा रिक्षांमध्ये इंडीकेटर हा फक्त जागा व्यापण्यासाठी बसवलेला पार्ट मानावा.
पुणेरी रिक्षावाले कोणते भाडे न्यायला होकार देतात ह्या विषयावर अनेक मान्यताप्राप्त विद्यापीठांमध्ये सखोल संशोधन चालू आहे.
पुण्यातील दुचाकीस्वारांचे प्रकार दोन.....
१) बेशिस्त
आणि
२) अतिशय बेशिस्त
’वाहतुकीचे नियम ही काय पाळण्याची गोष्ट आहे का?’ हा विनोद तर खुप जुना झाला. सध्या पुणेरी दुचाकीचे लायसेन्स देताना फूटपाथवर गाडी घालता येणे, सिग्नल तोडणे, उलट्या बाजूने येणे, कर्णकर्कश हॉर्न वाजवायची आवड असणे, डावीकडून गाड्या टाकून रस्ता ब्लॉक करणे आदी अत्यावश्यक गुणांची चाचणी घेतली जात असावी !
पुण्यातील बिल्डर्सचे प्रकार दोन.....
१) ग्राहकांना लुबाडणारे
आणि
२) ग्राहकांना पुरेपुर लुबाडणारे
माणूस बदलतो म्हणजे काय होते याचे उदाहरण पहायचे असेल तर Agreement करण्यापूर्वीचा बिल्डर आणि सर्व पैसे देउन झाल्यानंतर दिसणारे तयाचे रूप याचा अभ्यास करावा.
गरीब पारशी, गरम तव्यावर उगाचच पाणी मारून चर्रर्रर्र आवाज न काढणारा डोसावाला, एजंटच्या आधी सर्वसामान्य ग्राहकांना preference देणारी पोस्टातली कर्मचारी, आवाज न करणारी P.M.T. ची बस आणि वेळेत पझेशन देणारा बिल्डर या गोष्टी अद्याप कोणी पाहिल्या नसाव्यात !
पुण्यातील दुकानदारांचे प्रकार दोन......
१) गिर्हाईकाने मागितलेली वस्तू ’नाही’ म्हणून सांगणारे
आणि
२) गिर्हाईकाने मागितलेली वस्तू ’संपलीये’ म्हणून सांगणारे
यात पारंपारीक निरूत्साही दुकानदारांबरोबरच ’क्रॉसवर्ड’, ’शॉपर्स स्टॉप’, ’सब-वे’ अश्या तारांकीत ब्रॅंडसचाही समावेश होतो.
खरेदी करायला आलेल्या व्यक्तीला ’नाही’ हा शब्द विजयीमुद्रेने ऐकवून रिक्त हस्ते पिटाळण्यात यांना बहोत मजा येत असावी.
पुण्यातील भाषेचे प्रकार दोन......
१) भोचक
आणि
२) खोचक
जिज्ञासूंनी स्वतः अनुभव घेऊन पहावा !!
पुण्यातील कार्यक्रमांचे प्रकार दोन....
१) वेळेत सुरू न होणारे
आणि
२) वेळेत कधीही सुरू न होणारे
प्रेक्षकांच्या उपहासात्मक टाळ्या, बाहेर गाडी लावलेल्या भैय्याच्या भेळचा खप, टॉयलेटमधील द्रावणाची पातळी, बसलेल्यांच्या पायातल्या मुंग्या इत्यादी गोष्टी कमाल सीमेला जाउन ठेपल्या की मग कार्यक्रमाला तब्ब्येतीत सुरूवात होते !!
(क्रमशः)
Wednesday, January 4, 2012
मौनातल्या कथा माझ्या...
या कवितेची जन्मवेळ:
आवंढा गिळावासा वाटणारा कोणताही प्रसंग... दगडी चेहर्याच्या आणि रापलेल्या बुद्धीच्या सोबतीला एक टचकन् हळवं होणारं मन नावाचं अकरावं इंद्रीय आहे याची सादर आठवण करून देणारी कोणतीही रात्र... बर्याच दिवसात आपण आपले होऊन राहिलो नाही असं वाटायला लावणारा कोणताही क्षण... मनातल्या बहुसंख्य प्रश्नांना उत्तरे मिळणार नाहीत हे ठाऊक असूनही रित्या जमिनीशी संवाद साधण्याचे वेडे ऋतू..
चालता जुन्याच वाटेवरी, छाया ढळू लागल्या,
मौनातल्या कथा माझ्या, सार्या कळू लागल्या...
होते कधी रान हिरवे, पायवाटही होती सुखी,
एका अनाम क्षणी कश्या, दिशा वळू लागल्या...
फुल माझे पानही माझे, नव्हते साक्ष कुणी उद्या,
भर दुपारी चंद्र-वेड्या, वेली छळू लागल्या...
बुडता खोल आज मी, हाक न मारी तरी कुणा,
प्रवाहाला पापण्यांच्या भेटी मिळू लागल्या....
सवाल अनेक घेऊनी, पाही आकाश मोकळे,
तळहातींच्या रेषा माझ्या, मज टाळू लागल्या..
होतो उभा कधीचा, दिस मोजत पाखरांचे,
सांज-ज्योती आठवांचे थवे गिळू लागल्या....
उरता सोयरीचे काही, वेदना पळू लागल्या,
अन्
मौनातल्या कथा माझ्या, आता कळू लागल्या...
मौनातल्या कथा माझ्या, सार्या कळू लागल्या........ !!!
आवंढा गिळावासा वाटणारा कोणताही प्रसंग... दगडी चेहर्याच्या आणि रापलेल्या बुद्धीच्या सोबतीला एक टचकन् हळवं होणारं मन नावाचं अकरावं इंद्रीय आहे याची सादर आठवण करून देणारी कोणतीही रात्र... बर्याच दिवसात आपण आपले होऊन राहिलो नाही असं वाटायला लावणारा कोणताही क्षण... मनातल्या बहुसंख्य प्रश्नांना उत्तरे मिळणार नाहीत हे ठाऊक असूनही रित्या जमिनीशी संवाद साधण्याचे वेडे ऋतू..
चालता जुन्याच वाटेवरी, छाया ढळू लागल्या,
मौनातल्या कथा माझ्या, सार्या कळू लागल्या...
होते कधी रान हिरवे, पायवाटही होती सुखी,
एका अनाम क्षणी कश्या, दिशा वळू लागल्या...
फुल माझे पानही माझे, नव्हते साक्ष कुणी उद्या,
भर दुपारी चंद्र-वेड्या, वेली छळू लागल्या...
बुडता खोल आज मी, हाक न मारी तरी कुणा,
प्रवाहाला पापण्यांच्या भेटी मिळू लागल्या....
सवाल अनेक घेऊनी, पाही आकाश मोकळे,
तळहातींच्या रेषा माझ्या, मज टाळू लागल्या..
होतो उभा कधीचा, दिस मोजत पाखरांचे,
सांज-ज्योती आठवांचे थवे गिळू लागल्या....
उरता सोयरीचे काही, वेदना पळू लागल्या,
अन्
मौनातल्या कथा माझ्या, आता कळू लागल्या...
मौनातल्या कथा माझ्या, सार्या कळू लागल्या........ !!!
Monday, October 24, 2011
’आयटी’तील बाला - तनिष्का दिवाळी २०११ लेख
(पूर्वप्रसिद्धी: सकाळ-तनिष्का दिवाळी अंक २०११)
वाचकहो,
विषय म्हटला तर गंभीर आहे आणि म्हटलं तर हसतखेळत पाहण्याजोगा आहे. आज व्यावसायिक जगाच्या प्रत्येक दालनात काहीतरी करून दाखवण्याची इर्षा असलेल्या गुणी स्त्रीयांचा पदरव वाढतो आहे. पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून आणि क्वचित प्रसंगी प्रस्थापित वर्चस्वाला आव्हान देत या यशोमति आपले वेगळे स्थान निर्माण करीत आहेत. आय.टी. सारखे ’सुजलाम्-सुफलाम्’ क्षेत्र याला अपवाद कसे असेल? एकेकाळी तर ’कॉंप्युटर इंजिनियरींग’ ही सर्वार्थाने मुलींच्या अधिपत्याखालील शाखा म्हणून गणली जात असे. अर्थातच आय.टी. मधील रोजगाराच्या बाबतीतही त्यांचे प्रमाण सर्वार्थाने उजवे आहे हे सांगणे नकोचं !!
मुलगी माहिती-तंत्रज्ञान विश्वात आली की व्यक्तीमत्वाला नवी झळाळी प्राप्त होऊन तिचे राहणीमान पार बदलून जाते अशी एक वदंता आहे.
सामान्य अज्ञ जनांना सॉफ्टवेअर मध्ये काम करणार्या बालिकांच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या कृतीचे व त्यांच्या आचार-विचारांचे विलक्षण आकर्षण आणि कौतुक वाटत असते.
या क्षेत्रातील एक अंतःस्थ माहितीगार म्हणून सदरहू विषयाचे बारकाईने चिंतन केल्यावर आम्हास काही गोष्टी प्रकट कराव्याश्या वाटू लागल्या आहेत.
बाह्य जगताच्या ’सब घोडे बारा टक्के’ न्यायानुसार इथल्या सगळ्यांना एका तागडीत तोललं जात असलं तरी अभ्यासू वाचकांच्या सोयीसाठी आय.टी. क्षेत्रात कार्यरत असणार्याज महिलांची विभागणी पाच प्रमुख गटांमध्ये आम्ही करू इच्छितो. या अभिनव आणि अपारंपारिक वर्गीकरणाचे प्रयोजन हे केवळ कथनामध्ये सुटसुटीतपणा आणण्यासाठी केले असून अधिक जाणून घेण्यासाठी संबधित नायिकांशी संवाद साधणेच इष्ट !
(१) फ्रेशर –
आय.टी. क्षेत्रात आलेली फ्रेशर मुलगी ही तिच्या व्यवच्छेदक लक्षणांवरून त्वरीत ओळखू येते.
कुठल्याही कामात तत्परता दाखवणे हे तिचे प्रतीत होणारे अगदी प्रमुख चिन्ह! आणि शिकण्याची तीव्र लालसा हा तिच्या भात्यात असलेला सर्वात मोठा गुण!!
कॉलेजच्या अल्लड वातावरणातून कार्यक्षेत्राच्या रूक्ष बगिच्यात आल्यावरही जिच्या डोळ्यातला स्वप्नाळूपणा अद्याप कमी झालेला नाही ती फ्रेशर मुलगी अशी नेमक व्याख्या करता येईल.
नोकरीस लागल्याबरोबर अश्या मुलीच्या कपड्यांमध्ये जीन्सचे अगणित जोड आणि आधुनिक टी-शर्टची भर पडते. कॅंटीनचे नाविन्य आणि कॉफी मशिनचे अप्रुप असलेली ही कन्या काही काळ घरचा डबा नेण्याचे बंद करते. ग्रुपची निवड करताना ’आपल्या सोबत जॉईन झालेल्यांबरोबर जेवायला जायचं’ की ’जिथे आपली नेमणुक झालेली आहे त्या विभागाच्या मंडळींबरोबर जायचं’ हा प्रश्न तिला सतत सतावत असतो.
सिनियर्सबद्दल आदरयुक्त भिती आणि कंपनीच्या सुखसुविधांनी हरखून जाणं या गोष्टी तिच्या दिनक्रमाचा अपरिहार्य भाग असतात. आय-कार्ड स्वाईप करताना थोडीशी चिंतीत भासली तरी शनिवारी ज्यादा कामासाठी येण्याची तयारी ती नेहमीच दर्शवित असते.
पुस्तकातून वाचलेल्या गोष्टी प्रत्यक्षात कितीतरी निराळ्याच पद्धतीने केल्या जात असलेल्या पाहून फ्रेशर मुलीचा सुरूवातीला प्रचंड गोंधळ उडतो. या अज्ञानापायी आपली थट्टा होऊ नये म्हणून कुणाला थेट प्रश्न अगर शंका न विचारण्याचा समजूतदारपणा ती दाखवते. अर्थात तिची जिज्ञासा तिला स्वस्थ बसवू देत नाही. अश्या वेळी आधार असतो तो मर्यादीत वेळेत उपलब्ध असलेल्या इंटरनेटचा आणि नुकत्याच रूजू झालेल्या काही स्मार्ट बॅचमेट्सचा !! फ्रेशर मुलीची धडपड ही नवशिक्या पोहणार्यासारखी असते.
आय.टी. कंपनीत कामाला लागलेल्या प्रत्येकालाच लॅपटॉप दिला जातो आणि न्यायला स्वतंत्र गाडी येते असं फ्रेशर मुलीला उगाचच वाटत राहतं. आजूबाजूला प्रत्यही अनुभवायला मिळत असलेली मिटींग्स आणि क्लायंट कॉल्सची लगीनघाई तिला मनोमन सुखावून जाते. सुरूवातीच्या काळात नुसतं मूक श्रोता म्हणून अश्या कार्यक्रमांना जायला मिळालं तरी तिला कोण आनंद होतो. गोर्या लोकांशी अगम्य, गूढ परवलीचे शब्द वापरत तासन्तास बोलणार्या सिनियर मंडळींबद्दल तिच्या मनात कमाल आदराची भावना निर्माण होते. अश्याच एखाद्या कॉलमध्ये जेंव्हा तिची रितसर ओळख करून दिली जाते आणि पलीकडून नावाची लाडिक मोडतोड करून कस्टमर काहीबाही बोलतो, तेंव्हा फ्रेशर मुलीला गगन ठेंगणे झाल्याचा अनुभव येवून जातो.
मुलगी आय.टी. कंपनीमध्ये जितकी नविन तितकी तिची ईमेल सिग्नेचर मोठी असा एक सिद्धांत आहे. सुरूवातीस चातकाच्या उत्कंठेने ती मेल्सची वाट पहात असते. ’नविन मेल आलेली कळलं नाही’ असं होऊ नये म्हणून दर काही मिनीटाने स्क्रीन रिफ्रेश करत राहते. हे नव्याचे नऊ दिवस ओसरून नंतर नंतर तिच्या इन-बॉक्समधील ’अन्रीड’ मेल्सची संख्या वाढू लागली की फ्रेशरचे हे सुरवंट ’डेव्हलपर’नामक फुलपाखरात रूपांतरीत होवू लागलंय असं खुशाल समजावं :P
आपली कौटुंबिक अगर वैयक्तिक पार्श्वभूमी व आपले ऑफीसमधील जीवन यामधील अंतर्विरोध हा आय.टी. क्षेत्रात पदार्पण करणार्या बर्याचश्या मुलामुलींना अगदी ठळकपणे जाणवत राहतो.
’बिपिन’मध्ये वडा आणि ’तिलक’मध्ये कटींग चहा पिणारे आपण टीमबरोबर ’लिटल इटली’, ’जॅझ-बाय-द-बे’ सारख्या तारांकीत ठिकाणी जायला लागलो आणि सुदर्शन हॉलमध्ये जमिनीवर मांडी घालून नाटक पाहणार्या आपणाला इतर सहकार्यांबरोबर ’आयनॉक्स’ व ’इन ऑरबिट’ मॉलमध्ये जावे लागते हा बदल ती आपखुशीने स्वीकारते.
कंपनीतील पहिले काही महिने तिच्यासाठी खरंच परीक्षेचे असतात. रोज एका नव्या जगाची ओळख होत असते. माहितीचा, कामाचा वेग प्रचंड असतो. व्यवस्थेचे, कामाचे चित्र-विचित्र अनुभव येत राहतात. यातून तावून सुलाखून जी बाहेर पडते तीच फ्रेशर मुलगी पुढे व्यावसायिक जीवनात यशाच्या पायर्या चढत राहते.
(२) प्रोजेक्ट मॅनेजर/प्रोजेक्ट लीड –
अनेकांना हेवा वाटावा असं कर्तृत्व आणि दुर्दम्य इच्छाशक्ती यांनी मंडीत असलेली ही स्त्री म्हणजे खरोखरीच एक अभ्यासाचा विषय आहे. आजपर्यंतच्या कामावर जणू शिक्कामोर्तब म्हणून कंपनीने तिला ही अधिकाराची भूमिका दिलेली असते. नाठाळ घोड्यांपासून ते मत्सरी, महत्वाकांक्षी सहकार्यालपर्यंत सर्वांना काबूत ठेवून त्यांच्याकडून इप्सित काम करवून घेण्याची कठीण जबाबदारी हिच्यावर तिच्या गलेलठ्ठ पगारासोबत सोपवली गेलेली असते.
प्रोजेक्ट मॅनेज करण्यासाठी करडा चेहरा ही आवश्यक गोष्ट आहे असा यातील काही जणींचा समज होऊन जातो. त्यामुळे कनिष्ठांनी केलेल्या विनोदांवर न हसणे, सतत तणावाखाली असल्याचे भासवणे एक उद्विग्नतेचे भाव चेहर्यावर नांदवत वावरणे अश्या स्वतःला इजादायक कृती ही मंडळी करत राहतात.
समोरच्याने सांगितलेले आकडे आणि एस्टिमेटस् या कायमच फुगवलेल्या आहेत असा प्रबळ विश्वास जगातल्या सगळ्या प्रोजेक्ट मॅनेजर्सच्या ठायी नित्य वसती करून असतो. त्यामुळे कुठल्याही बाबतीत घासाघीस ही अनिवार्य गोष्ट होऊन बसते.
’क्योंकी सास भी कभी बहू थी’ ही उक्ती संपूर्णपणे विसरून आपापल्या टीमकडून अचाट, अवाजवी कामांच्या अपेक्षा करणे हा यांचा अजून एक गुणधर्म. मॅनेजमेंटचे राक्षसी टार्गेट आणि टीम मेंबरच्या नैसर्गिक मर्यादा या दोन्हींचा व्यवस्थित ताळमेळ घालण्याची तारेवरची कसरत त्यांची अहर्निशी चालू असते.
एकीकडे महत्वाकांक्षा तर दुसरीकडे भावना या चक्रात सापडल्यामुळे प्रचंड मानसिक घालमेलीला या वर्गाला तोंड द्यावे लागते.
चालत आलेल्या परदेशगमनादी अनेक सुवर्णसंधी कौटुंबिक अथवा इतर कारणांमुळे नाकाराव्या लागल्याचे शल्य काही काहींच्या मनात पूर्ण करीयरभर रूतून बसते.
मधाच्या पोळ्यामध्ये ज्याप्रमाणे राणी माशी काही काम न करता फक्त स्वस्थ बसून इतरांकडून होणार्याण सुमधूर कार्याची दखल ठेवण्याचे काम करते, त्याचप्रमाणे आयटी मधील हा प्रवर्ग सोपवलेल्या व्यक्तींच्या दैनंदीन बिलींगची आणि प्रोजेक्टच्या डेडलाईन्सची काळजी वहात असतो.
कनिष्ठांसारखं मुक्तपणे आनंद लुटता येत नाही, आपल्या समपदीयांबरोबर मन मोकळं करता येत नाही तर वरीष्ठांकडे खदखद नीट व्यक्त करता येत नाही अश्या तिहेरी कुचंबणेच्या अवस्थेत यांची केबिन म्हणजे ’सोन्याचा पिंजरा’ बनून जाते.
एकंदरीत करीयरची ‘धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय’ अशी अवस्था होऊन गेल्याने बर्याचश्या लेडीज प्रोजेक्ट मॅनेजर्स या भरभराटीच्या पदावर असूनही आंतरीक ताणाखाली अडकलेल्या दिसून येतात.
(३) डेव्हलपर/इंजिनीयर/कन्सल्टंट –
कंपनीच्या गोवर्धनाचा खराखुरा भार उचललेल्या या सगळ्या आदीशक्ती म्हणजे आय.टी. मधील बहुसंख्य वर्ग होय!
रूजू झाल्यावर काही वर्षातच आपापली टेक्नॉलॉजी ठरवून घेऊन, प्रोजेक्टची इत्यंभूत माहिती करून घेऊन त्यात आपले योगदान देत राहणे हे त्यांच्या अंगवळणी पडून जाते. अधूनमधून ’अपग्रेड स्कील’च्या नावाखाली प्रशिक्षणाचे सोहळे आयोजित करून ना यांच्यावर अधिक बोजा कसा टाकता येईल याचा साकल्याने विचार मॅनेजमेंट करीत असते.
निरनिराळ्या संगणक-प्रणाली तयार करणे, केलेल्या प्रणालींची देखभाल करणे आणि त्या बदलत राहणे हे यांच्या कामाचे ढोबळमानाने दिसून येणारे स्वरूप !
ही मंडळी फावल्या वेळात कंपनीच्या आवारात आणि बाहेर घडणार्याच बहुविध गुणदर्शनाच्या, समाजपोयोगी तसेच उपयुक्त कार्यक्रमात हिरीरीने भाग घेतात. या वर्गाचा वयोगट हा कंपनीत एक वर्ष पूर्ण केलेल्या नवख्या मुलीपासून ते अपत्ये दहावीच्या परीक्षेला बसलेल्या अनुभवसंपन्न गृहीणींपर्यंत विस्तारलेला आहे.
’पीटर’, ’डेव्हीड’, ’जोसेफीना’ वगैरे मंडळींशी क्लीष्ट तांत्रिक विषयांवर साधक-बाधक चर्चा करणारी ही स्त्री आपल्या ड्रॉवरमध्ये अरूणा ढेरे, शांता शेळके, मंगला गोडबोले वगैरेंची पुस्तके बाळगून असते.
वयाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करणारे देखणे पोशाख आणि उच्च पेहराव करणार्या या गटातील एखादी भगिनी श्रावणी शुक्रवारी दुपारच्या मधल्या सुट्टीत अगदी लीलया सवाष्ण म्हणून जेवायला जावून येते.
सोमवारी सकाळी चेहर्यावर सुतकी कळा आणून कामावर जाणे ही तमाम आय.टी ची प्रतिक्षिप्त क्रिया! या वर्गामध्ये त्याची अभिव्यक्ती जरा जास्तीच मोठ्या प्रमाणात होते. म्हणूनच की काय हाडाचे मॅनेजर्स महत्वाच्या मीटींग सोमवारी ठेवण्याची चूक चुकूनही करत नाहीत !!
या जमातीमध्ये ’कष्टाळू’ आणि ’स्मार्ट’ अश्या दोन मुख्य प्रजाती आपल्याला प्रकर्षाने पहावयास मिळतात.
कष्टाळू डेव्हलपर मुली ’आपण बरं आणि आपला कोड बरा’ अश्या विरक्त भावाने दिवसभर कष्ट उपसत बसतात. आपल्यापाशी असलेले ज्ञान पणाला लावून, क्वचित अडल्यास थोडे बहुत हात पाय मारून आपल्याला दिलेले काम चोखपणे व वेळेत पूर्ण करणे हे त्यांचे कर्तव्य असते. संध्याकाळी वेळेत घरी जायला मिळणे आणि ऑनसाईटहून कामाच्या गुणवत्तेबद्दल कधीतरी एखादी कौतुकाची मेल येणे इतक्या माफक अपेक्षा त्या बाळगून असतात. अश्या मुली इंटरनेटही थोडाच वेळ बघतात आणि ’फेसबुक’ ही केवळ घरी करमणुकीच्या वेळात पहायची गोष्ट आहे अश्या गोड भ्रमात असतात. आपल्या मागून येवून प्रोजेक्ट लीड झालेल्या इतरांबद्दल यांना तसूभरही असूया वाटत नाही आणि पगारवाढीसाठी कंपनीची आर्थिक स्थिती व आपले प्रारब्ध या दोनच गोष्टी कारणीभूत आहेत असा त्यांचा ठाम विश्वास असतो.
कॉफी मशिनपाशी घडणार्या रिसेशनविषयक चर्चांनी यां भगिनींचा जीव घाबराघुबरा होऊन जातो. त्या जेवणाचा डबा रोज घरून घेऊन येतात आणि गाडीत बसल्याबरोबर कानाला इअर-फोन लावून बसतात.
मीटींग किंवा कॉनफरन्समध्ये अगदी स्पष्टपणे कुणी आज्ञा केल्याशिवाय बोलणे यांच्या स्वभावात बसत नाही.
मन लावून काम करणे, फक्त हक्काच्याच सुट्ट्या घेणे, आपण भरत असलेल्या घराच्या हप्त्याचे भान राखून वागणे आणि शक्यतो कुणाच्या अध्यात-मध्यात न पडणे आदी उपकारक गुणांमुळे असे कर्मचारी कंपनीच्या दृष्टीने पिळवणुकीसाठी अतिशय योग्य ठरतात.
या वर्गातील ’स्मार्ट’ मुली हा मात्र ओळखायला, हाताळायला आणि टाळायला कठिण असा प्रकार आहे !! गोड गोड बोलून दुसर्यांना कामाला लावणे हे त्यांचे प्राथमिक लक्षण म्हणून सांगता येईल.
’स्मार्ट’ डेव्हलपर मुली या नेहमी छान, नीटनेटक्या सजून येतात आणि जिकडे तिकडे आपल्या व्यक्तीमत्वाचा जमेल तितका प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करत राहतात. यांच्यासाठी बस अगर कॅब पाच-पाच मिनीटे थांबवून ठेवली जाते व त्यानंतर त्यांना जागा देण्यासाठी उपस्थितांमध्ये अहमिहीका लागते. यांच्या मशिनवर हवे ते सॉफ्ट्वेअर काही क्षणातच इन्स्टॉल केले जाते. टीममध्ये सर्वात कमी ज्ञान असूनही सर्वात जास्ती पगारवाढ वाट्याला जाणे, वीकेंडला लागून आलेल्या सुट्ट्यांच्या अलीकडे किंवा पलीकडे रजा मंजूर होणे, एकही पैसा खर्च न करता रोज कॅंटीनमध्ये खायला मिळणे, पूर्ण करायला सुलभ अशीच कामे असाईन होणे इत्यादी चमत्कार स्मार्ट कन्यांच्या बाबतीत नित्य घडत असतात.
विशेषतः “बरं ऐक ना..” या पालुपदाने सुरू होणारे कुठलेही संभाषण हे फार घातक ठरू शकते याची इतरांनी नोंद घ्यावी.
या निरूपद्रवी शब्दसमूहापाठोपाठ एखादे काम करून देण्याची गळ ही येतेच येते. आणि योग्य तो सावधपणा नसल्यास काही कळायच्या आत एखादा पुरूष कर्मचारी या स्मार्टपणाला नाहक बळी पडण्याची दाट शक्यता असते.
असा दयाळू कर्मचारी तिच्या कोडमधले बग्स काढून कोड सुधरवण्याचे काम रात्री उशीरापर्यंत थांबून करत बसतो तेंव्हा आपली स्मार्ट नायिका मात्र वेळेवर घरी पोहोचून फार्मा कंपनीत मॅनेजर असलेल्या आपल्या मित्राबरोबर चतुःश्रुंगीच्या टेकडीवरून दिसणारा सूर्यास्त जोडीने पहात असते.
बाकीच्या ठिकाणी बंदी असलेले जीटॉक, स्काईप, याहू असे विविध मेसेंजर्स आणि इतर वेबसाईटस् अश्या मुलींच्या पीसीवर हमखास चालू आढळतात.
बराच फावला वेळ मिळत असल्याने ‘bfn’ किंवा ‘ttyl’ असे लघुरूपातील चॅट-पंथीय संवाद यांनी आत्मसात व रूढ केलेले असतात. या भाषेचा अर्थ न कळल्याने गोंधळलेल्या समोरच्या व्यक्तीस ’तू आयटी मध्ये काम करण्यास लायक नसून तुझी जागा ही बॅंक किंवा विमा कंपनीच्या कचेरीत(च) असायला हवी’ अश्या तीव्र न्यूनगंड-उत्पादक विचाराच्या भेटी देणे ही मग ओघानेच येणारी गोष्ट ठरते!
सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये या सर्वजणी उत्साहाने पुढाकार घेतात आणि त्या नावाखाली आपल्या वाट्याची उरलीसुरली कामे इतरांच्या गळ्यात मारतात. बोलण्यातील चतुराई आणि वरीष्ठांबरोबरचे सौहार्द्र ही त्यांची बलस्थाने असल्याने आपला स्मार्टनेस अविरोध मिरवत कंपनीतील त्यांचा प्रवास सुखेनैव चालू असतो.
(४) टेस्टर –
आयटी मध्ये यायची संधी मिळालेले, पात्रता असणारे पण थोडेसे कमनशिबी असलेले जीव टेस्टर बनतात. कोणत्याही गोष्टीवर विश्वास न ठेवणे हा नंतर नंतर त्यांच्या स्वभावाचाच भाग बनून जातो. दुसर्यांनी लिहीलेल्या संगणक-प्रणालींची चाचणी करून त्यावर योग्य तो निर्णय देणे हे यांचे प्रमुख कार्य. पण दुसर्याच्या चुका काढण्याचे रसभरीत काम मिळाल्यामुळे अशी मंडळी आपले उपद्रवमूल्य खूप वाढवून घेतात.
क्वालिटी अथवा टेस्टींग साठी काम करत असलेल्या मुलींना डेव्हलपरने लिहीलेल्या प्रत्येक ओळीबद्दल निकराचा संशय येत असतो.
ज्याप्रमाणे सीआयडी मालिकेतील एसीपी जवळपास प्रत्येक पात्रावर खुनाचा आळ घेतो त्या पद्धतीने कोडमध्ये लिहीला गेलेला प्रत्येक शब्द हा चुकीचा आहे अशी रास्त खात्री टेस्टर लोकांना असते.
डेव्हलपर आणि टेस्टरमधील या पारंपारीक युद्धात विजयाचा लंबक कधी इकडे तर कधी तिकडे झुकत असतो.
टेस्टींग क्षेत्रात काम करणार्या भगिनींना कामाचा तणाव तुलनेने कमी असल्याने त्या विविध छंद आणि कलागुणांची जोपासना करताना दिसतात.
(५) बेंच –
’बेंच’ हे आयटी मधील बहारदार प्रकरण आहे. कोणत्याही प्रोजेक्टवर थेट बिलींग करता न येणारे, कोणत्याही कामासाठी सध्या थेट उपयोग करून न घेता येणारे, अर्हतेला साजेसे काम अजून न आल्याने इतर कामांमध्ये वापरण्याची मिजास न परवडणारे असे सगळे लोक या ’बेंच’वर टाकले जातात.
’बेंच’ वर आलेल्यांनी आपला वेळ आणि क्रियाशक्ती ज्ञानाची उजळणी करण्यात खर्च करावी अशी बाळबोध अपेक्षा काही काही कंपन्या करतात. तर ’बेंच’ म्हणजे आपला विश्रांतीचा अगर करमणुकीचा कालखंड आहे अशी सोईस्कर समजूत कर्मचारी करून घेतात.
’बेंच’वरील मुली हे इतरांच्या हेव्याचे कारण ठरू शकते. अश्या मुलींचे थवे कॅंपसमध्ये इकडून तिकडे बागडताना पाहून समोर साचलेल्या कामाकडे पहात आपल्या नशिबाला दोष देणार्यांची संख्या काही कमी नाही.
कॅंटीन, कॉफी मशिन्स, स्पोर्टस् रूम, लायब्ररी, आवारातील बागा, जिम इत्यादी ठिकाणी यांचा संचार मोठ्या संख्येने पहावयास मिळतो.
’बेंच’वरील काही काही मुली या कायम सेलफोनला चिकटलेल्या दिसतात. ते पाहताना एवढा वेळ संभाषण करणारी पलीकडील व्यक्तीही ’बेंच’वर असावी असा विचार मनास चाटून जातो.
आय.टी. आणि आय.टी. मधील सुखासीनतेबद्दल समाजात गोड गैरसमज पसरवण्यामध्ये या वर्गाचा मोठा हात आहे असा आम्हांस दाट संशय आहे.
इकडच्या जीवनाबद्दल असे मृगजळाचे मळे फुलवणारी हे लोक भवितव्याबाबत कुठेतरी थोडीशी चिंताग्रस्त देखील असतात. त्यानुसार ’बेंच’वरील कालखंडात इतर ठिकाणी मुलाखतीसाठी जाणे आणि बाहेर चांगल्या नोकरीसाठी चाचपणी करत राहणे हा उपक्रम देखील त्यांच्या करणीय गोष्टींच्या यादीमध्ये समाविष्ट होऊन जातो.
*****************
खरं तर माहिती तंत्रज्ञान हे स्त्री-बाहुल्य असलेलं क्षेत्र ! समाजाच्या इतर थरात निदर्शनास येणारा ’व्यक्ती तितक्या प्रकृती’ हा प्रवाद इथे देखील मोठ्या प्रमाणावर दिसून येतो.
त्यामुळे ’आयटी मध्ये गेलं की मुलींच्या डोक्यात हवा जाते’ अगर ’तिकडच्या मुली कॉमर्स किंवा आर्टसच्या विद्यार्थ्यांकडे प्रथम वर्ग एसीच्या प्रवासाने जनरल डब्यातल्या गर्दीकडे तुच्छतेने पहावे तश्या पाहतात’ असे निष्कर्ष सरसकट काढू नयेत.
’Grass Always Looks Greener on other side’ या वचनाप्रमाणे सामान्यांना त्यांच्या आयुष्यातला चकचकीतपणा दिसत असला तरी या प्रवासात घडलेल्या अनंत कर्मकहाण्या या कायम पडद्याआडच राहतात याची नोंद घ्यावी.
उपर्निदेष्टीत प्रकार हे केवळ वाचकांच्या स्पष्टतेसाठी केलेले असून त्याच्या अधिक तपशीलात जाण्यापेक्षा या क्षेत्रात योगदान देणार्या व आपला स्वल्पसा का होईना ठसा उमटवणार्या समस्त कर्मयोगिनींना अभिवादन करणे हेच प्रस्तुत लेखकास श्रेयस्कर वाटते.... !!!!!!!
वाचकहो,
विषय म्हटला तर गंभीर आहे आणि म्हटलं तर हसतखेळत पाहण्याजोगा आहे. आज व्यावसायिक जगाच्या प्रत्येक दालनात काहीतरी करून दाखवण्याची इर्षा असलेल्या गुणी स्त्रीयांचा पदरव वाढतो आहे. पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून आणि क्वचित प्रसंगी प्रस्थापित वर्चस्वाला आव्हान देत या यशोमति आपले वेगळे स्थान निर्माण करीत आहेत. आय.टी. सारखे ’सुजलाम्-सुफलाम्’ क्षेत्र याला अपवाद कसे असेल? एकेकाळी तर ’कॉंप्युटर इंजिनियरींग’ ही सर्वार्थाने मुलींच्या अधिपत्याखालील शाखा म्हणून गणली जात असे. अर्थातच आय.टी. मधील रोजगाराच्या बाबतीतही त्यांचे प्रमाण सर्वार्थाने उजवे आहे हे सांगणे नकोचं !!
मुलगी माहिती-तंत्रज्ञान विश्वात आली की व्यक्तीमत्वाला नवी झळाळी प्राप्त होऊन तिचे राहणीमान पार बदलून जाते अशी एक वदंता आहे.
सामान्य अज्ञ जनांना सॉफ्टवेअर मध्ये काम करणार्या बालिकांच्या प्रत्येक छोट्या-मोठ्या कृतीचे व त्यांच्या आचार-विचारांचे विलक्षण आकर्षण आणि कौतुक वाटत असते.
या क्षेत्रातील एक अंतःस्थ माहितीगार म्हणून सदरहू विषयाचे बारकाईने चिंतन केल्यावर आम्हास काही गोष्टी प्रकट कराव्याश्या वाटू लागल्या आहेत.
बाह्य जगताच्या ’सब घोडे बारा टक्के’ न्यायानुसार इथल्या सगळ्यांना एका तागडीत तोललं जात असलं तरी अभ्यासू वाचकांच्या सोयीसाठी आय.टी. क्षेत्रात कार्यरत असणार्याज महिलांची विभागणी पाच प्रमुख गटांमध्ये आम्ही करू इच्छितो. या अभिनव आणि अपारंपारिक वर्गीकरणाचे प्रयोजन हे केवळ कथनामध्ये सुटसुटीतपणा आणण्यासाठी केले असून अधिक जाणून घेण्यासाठी संबधित नायिकांशी संवाद साधणेच इष्ट !
(१) फ्रेशर –
आय.टी. क्षेत्रात आलेली फ्रेशर मुलगी ही तिच्या व्यवच्छेदक लक्षणांवरून त्वरीत ओळखू येते.
कुठल्याही कामात तत्परता दाखवणे हे तिचे प्रतीत होणारे अगदी प्रमुख चिन्ह! आणि शिकण्याची तीव्र लालसा हा तिच्या भात्यात असलेला सर्वात मोठा गुण!!
कॉलेजच्या अल्लड वातावरणातून कार्यक्षेत्राच्या रूक्ष बगिच्यात आल्यावरही जिच्या डोळ्यातला स्वप्नाळूपणा अद्याप कमी झालेला नाही ती फ्रेशर मुलगी अशी नेमक व्याख्या करता येईल.
नोकरीस लागल्याबरोबर अश्या मुलीच्या कपड्यांमध्ये जीन्सचे अगणित जोड आणि आधुनिक टी-शर्टची भर पडते. कॅंटीनचे नाविन्य आणि कॉफी मशिनचे अप्रुप असलेली ही कन्या काही काळ घरचा डबा नेण्याचे बंद करते. ग्रुपची निवड करताना ’आपल्या सोबत जॉईन झालेल्यांबरोबर जेवायला जायचं’ की ’जिथे आपली नेमणुक झालेली आहे त्या विभागाच्या मंडळींबरोबर जायचं’ हा प्रश्न तिला सतत सतावत असतो.
सिनियर्सबद्दल आदरयुक्त भिती आणि कंपनीच्या सुखसुविधांनी हरखून जाणं या गोष्टी तिच्या दिनक्रमाचा अपरिहार्य भाग असतात. आय-कार्ड स्वाईप करताना थोडीशी चिंतीत भासली तरी शनिवारी ज्यादा कामासाठी येण्याची तयारी ती नेहमीच दर्शवित असते.
पुस्तकातून वाचलेल्या गोष्टी प्रत्यक्षात कितीतरी निराळ्याच पद्धतीने केल्या जात असलेल्या पाहून फ्रेशर मुलीचा सुरूवातीला प्रचंड गोंधळ उडतो. या अज्ञानापायी आपली थट्टा होऊ नये म्हणून कुणाला थेट प्रश्न अगर शंका न विचारण्याचा समजूतदारपणा ती दाखवते. अर्थात तिची जिज्ञासा तिला स्वस्थ बसवू देत नाही. अश्या वेळी आधार असतो तो मर्यादीत वेळेत उपलब्ध असलेल्या इंटरनेटचा आणि नुकत्याच रूजू झालेल्या काही स्मार्ट बॅचमेट्सचा !! फ्रेशर मुलीची धडपड ही नवशिक्या पोहणार्यासारखी असते.
आय.टी. कंपनीत कामाला लागलेल्या प्रत्येकालाच लॅपटॉप दिला जातो आणि न्यायला स्वतंत्र गाडी येते असं फ्रेशर मुलीला उगाचच वाटत राहतं. आजूबाजूला प्रत्यही अनुभवायला मिळत असलेली मिटींग्स आणि क्लायंट कॉल्सची लगीनघाई तिला मनोमन सुखावून जाते. सुरूवातीच्या काळात नुसतं मूक श्रोता म्हणून अश्या कार्यक्रमांना जायला मिळालं तरी तिला कोण आनंद होतो. गोर्या लोकांशी अगम्य, गूढ परवलीचे शब्द वापरत तासन्तास बोलणार्या सिनियर मंडळींबद्दल तिच्या मनात कमाल आदराची भावना निर्माण होते. अश्याच एखाद्या कॉलमध्ये जेंव्हा तिची रितसर ओळख करून दिली जाते आणि पलीकडून नावाची लाडिक मोडतोड करून कस्टमर काहीबाही बोलतो, तेंव्हा फ्रेशर मुलीला गगन ठेंगणे झाल्याचा अनुभव येवून जातो.
मुलगी आय.टी. कंपनीमध्ये जितकी नविन तितकी तिची ईमेल सिग्नेचर मोठी असा एक सिद्धांत आहे. सुरूवातीस चातकाच्या उत्कंठेने ती मेल्सची वाट पहात असते. ’नविन मेल आलेली कळलं नाही’ असं होऊ नये म्हणून दर काही मिनीटाने स्क्रीन रिफ्रेश करत राहते. हे नव्याचे नऊ दिवस ओसरून नंतर नंतर तिच्या इन-बॉक्समधील ’अन्रीड’ मेल्सची संख्या वाढू लागली की फ्रेशरचे हे सुरवंट ’डेव्हलपर’नामक फुलपाखरात रूपांतरीत होवू लागलंय असं खुशाल समजावं :P
आपली कौटुंबिक अगर वैयक्तिक पार्श्वभूमी व आपले ऑफीसमधील जीवन यामधील अंतर्विरोध हा आय.टी. क्षेत्रात पदार्पण करणार्या बर्याचश्या मुलामुलींना अगदी ठळकपणे जाणवत राहतो.
’बिपिन’मध्ये वडा आणि ’तिलक’मध्ये कटींग चहा पिणारे आपण टीमबरोबर ’लिटल इटली’, ’जॅझ-बाय-द-बे’ सारख्या तारांकीत ठिकाणी जायला लागलो आणि सुदर्शन हॉलमध्ये जमिनीवर मांडी घालून नाटक पाहणार्या आपणाला इतर सहकार्यांबरोबर ’आयनॉक्स’ व ’इन ऑरबिट’ मॉलमध्ये जावे लागते हा बदल ती आपखुशीने स्वीकारते.
कंपनीतील पहिले काही महिने तिच्यासाठी खरंच परीक्षेचे असतात. रोज एका नव्या जगाची ओळख होत असते. माहितीचा, कामाचा वेग प्रचंड असतो. व्यवस्थेचे, कामाचे चित्र-विचित्र अनुभव येत राहतात. यातून तावून सुलाखून जी बाहेर पडते तीच फ्रेशर मुलगी पुढे व्यावसायिक जीवनात यशाच्या पायर्या चढत राहते.
(२) प्रोजेक्ट मॅनेजर/प्रोजेक्ट लीड –
अनेकांना हेवा वाटावा असं कर्तृत्व आणि दुर्दम्य इच्छाशक्ती यांनी मंडीत असलेली ही स्त्री म्हणजे खरोखरीच एक अभ्यासाचा विषय आहे. आजपर्यंतच्या कामावर जणू शिक्कामोर्तब म्हणून कंपनीने तिला ही अधिकाराची भूमिका दिलेली असते. नाठाळ घोड्यांपासून ते मत्सरी, महत्वाकांक्षी सहकार्यालपर्यंत सर्वांना काबूत ठेवून त्यांच्याकडून इप्सित काम करवून घेण्याची कठीण जबाबदारी हिच्यावर तिच्या गलेलठ्ठ पगारासोबत सोपवली गेलेली असते.
प्रोजेक्ट मॅनेज करण्यासाठी करडा चेहरा ही आवश्यक गोष्ट आहे असा यातील काही जणींचा समज होऊन जातो. त्यामुळे कनिष्ठांनी केलेल्या विनोदांवर न हसणे, सतत तणावाखाली असल्याचे भासवणे एक उद्विग्नतेचे भाव चेहर्यावर नांदवत वावरणे अश्या स्वतःला इजादायक कृती ही मंडळी करत राहतात.
समोरच्याने सांगितलेले आकडे आणि एस्टिमेटस् या कायमच फुगवलेल्या आहेत असा प्रबळ विश्वास जगातल्या सगळ्या प्रोजेक्ट मॅनेजर्सच्या ठायी नित्य वसती करून असतो. त्यामुळे कुठल्याही बाबतीत घासाघीस ही अनिवार्य गोष्ट होऊन बसते.
’क्योंकी सास भी कभी बहू थी’ ही उक्ती संपूर्णपणे विसरून आपापल्या टीमकडून अचाट, अवाजवी कामांच्या अपेक्षा करणे हा यांचा अजून एक गुणधर्म. मॅनेजमेंटचे राक्षसी टार्गेट आणि टीम मेंबरच्या नैसर्गिक मर्यादा या दोन्हींचा व्यवस्थित ताळमेळ घालण्याची तारेवरची कसरत त्यांची अहर्निशी चालू असते.
एकीकडे महत्वाकांक्षा तर दुसरीकडे भावना या चक्रात सापडल्यामुळे प्रचंड मानसिक घालमेलीला या वर्गाला तोंड द्यावे लागते.
चालत आलेल्या परदेशगमनादी अनेक सुवर्णसंधी कौटुंबिक अथवा इतर कारणांमुळे नाकाराव्या लागल्याचे शल्य काही काहींच्या मनात पूर्ण करीयरभर रूतून बसते.
मधाच्या पोळ्यामध्ये ज्याप्रमाणे राणी माशी काही काम न करता फक्त स्वस्थ बसून इतरांकडून होणार्याण सुमधूर कार्याची दखल ठेवण्याचे काम करते, त्याचप्रमाणे आयटी मधील हा प्रवर्ग सोपवलेल्या व्यक्तींच्या दैनंदीन बिलींगची आणि प्रोजेक्टच्या डेडलाईन्सची काळजी वहात असतो.
कनिष्ठांसारखं मुक्तपणे आनंद लुटता येत नाही, आपल्या समपदीयांबरोबर मन मोकळं करता येत नाही तर वरीष्ठांकडे खदखद नीट व्यक्त करता येत नाही अश्या तिहेरी कुचंबणेच्या अवस्थेत यांची केबिन म्हणजे ’सोन्याचा पिंजरा’ बनून जाते.
एकंदरीत करीयरची ‘धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय’ अशी अवस्था होऊन गेल्याने बर्याचश्या लेडीज प्रोजेक्ट मॅनेजर्स या भरभराटीच्या पदावर असूनही आंतरीक ताणाखाली अडकलेल्या दिसून येतात.
(३) डेव्हलपर/इंजिनीयर/कन्सल्टंट –
कंपनीच्या गोवर्धनाचा खराखुरा भार उचललेल्या या सगळ्या आदीशक्ती म्हणजे आय.टी. मधील बहुसंख्य वर्ग होय!
रूजू झाल्यावर काही वर्षातच आपापली टेक्नॉलॉजी ठरवून घेऊन, प्रोजेक्टची इत्यंभूत माहिती करून घेऊन त्यात आपले योगदान देत राहणे हे त्यांच्या अंगवळणी पडून जाते. अधूनमधून ’अपग्रेड स्कील’च्या नावाखाली प्रशिक्षणाचे सोहळे आयोजित करून ना यांच्यावर अधिक बोजा कसा टाकता येईल याचा साकल्याने विचार मॅनेजमेंट करीत असते.
निरनिराळ्या संगणक-प्रणाली तयार करणे, केलेल्या प्रणालींची देखभाल करणे आणि त्या बदलत राहणे हे यांच्या कामाचे ढोबळमानाने दिसून येणारे स्वरूप !
ही मंडळी फावल्या वेळात कंपनीच्या आवारात आणि बाहेर घडणार्याच बहुविध गुणदर्शनाच्या, समाजपोयोगी तसेच उपयुक्त कार्यक्रमात हिरीरीने भाग घेतात. या वर्गाचा वयोगट हा कंपनीत एक वर्ष पूर्ण केलेल्या नवख्या मुलीपासून ते अपत्ये दहावीच्या परीक्षेला बसलेल्या अनुभवसंपन्न गृहीणींपर्यंत विस्तारलेला आहे.
’पीटर’, ’डेव्हीड’, ’जोसेफीना’ वगैरे मंडळींशी क्लीष्ट तांत्रिक विषयांवर साधक-बाधक चर्चा करणारी ही स्त्री आपल्या ड्रॉवरमध्ये अरूणा ढेरे, शांता शेळके, मंगला गोडबोले वगैरेंची पुस्तके बाळगून असते.
वयाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करणारे देखणे पोशाख आणि उच्च पेहराव करणार्या या गटातील एखादी भगिनी श्रावणी शुक्रवारी दुपारच्या मधल्या सुट्टीत अगदी लीलया सवाष्ण म्हणून जेवायला जावून येते.
सोमवारी सकाळी चेहर्यावर सुतकी कळा आणून कामावर जाणे ही तमाम आय.टी ची प्रतिक्षिप्त क्रिया! या वर्गामध्ये त्याची अभिव्यक्ती जरा जास्तीच मोठ्या प्रमाणात होते. म्हणूनच की काय हाडाचे मॅनेजर्स महत्वाच्या मीटींग सोमवारी ठेवण्याची चूक चुकूनही करत नाहीत !!
या जमातीमध्ये ’कष्टाळू’ आणि ’स्मार्ट’ अश्या दोन मुख्य प्रजाती आपल्याला प्रकर्षाने पहावयास मिळतात.
कष्टाळू डेव्हलपर मुली ’आपण बरं आणि आपला कोड बरा’ अश्या विरक्त भावाने दिवसभर कष्ट उपसत बसतात. आपल्यापाशी असलेले ज्ञान पणाला लावून, क्वचित अडल्यास थोडे बहुत हात पाय मारून आपल्याला दिलेले काम चोखपणे व वेळेत पूर्ण करणे हे त्यांचे कर्तव्य असते. संध्याकाळी वेळेत घरी जायला मिळणे आणि ऑनसाईटहून कामाच्या गुणवत्तेबद्दल कधीतरी एखादी कौतुकाची मेल येणे इतक्या माफक अपेक्षा त्या बाळगून असतात. अश्या मुली इंटरनेटही थोडाच वेळ बघतात आणि ’फेसबुक’ ही केवळ घरी करमणुकीच्या वेळात पहायची गोष्ट आहे अश्या गोड भ्रमात असतात. आपल्या मागून येवून प्रोजेक्ट लीड झालेल्या इतरांबद्दल यांना तसूभरही असूया वाटत नाही आणि पगारवाढीसाठी कंपनीची आर्थिक स्थिती व आपले प्रारब्ध या दोनच गोष्टी कारणीभूत आहेत असा त्यांचा ठाम विश्वास असतो.
कॉफी मशिनपाशी घडणार्या रिसेशनविषयक चर्चांनी यां भगिनींचा जीव घाबराघुबरा होऊन जातो. त्या जेवणाचा डबा रोज घरून घेऊन येतात आणि गाडीत बसल्याबरोबर कानाला इअर-फोन लावून बसतात.
मीटींग किंवा कॉनफरन्समध्ये अगदी स्पष्टपणे कुणी आज्ञा केल्याशिवाय बोलणे यांच्या स्वभावात बसत नाही.
मन लावून काम करणे, फक्त हक्काच्याच सुट्ट्या घेणे, आपण भरत असलेल्या घराच्या हप्त्याचे भान राखून वागणे आणि शक्यतो कुणाच्या अध्यात-मध्यात न पडणे आदी उपकारक गुणांमुळे असे कर्मचारी कंपनीच्या दृष्टीने पिळवणुकीसाठी अतिशय योग्य ठरतात.
या वर्गातील ’स्मार्ट’ मुली हा मात्र ओळखायला, हाताळायला आणि टाळायला कठिण असा प्रकार आहे !! गोड गोड बोलून दुसर्यांना कामाला लावणे हे त्यांचे प्राथमिक लक्षण म्हणून सांगता येईल.
’स्मार्ट’ डेव्हलपर मुली या नेहमी छान, नीटनेटक्या सजून येतात आणि जिकडे तिकडे आपल्या व्यक्तीमत्वाचा जमेल तितका प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करत राहतात. यांच्यासाठी बस अगर कॅब पाच-पाच मिनीटे थांबवून ठेवली जाते व त्यानंतर त्यांना जागा देण्यासाठी उपस्थितांमध्ये अहमिहीका लागते. यांच्या मशिनवर हवे ते सॉफ्ट्वेअर काही क्षणातच इन्स्टॉल केले जाते. टीममध्ये सर्वात कमी ज्ञान असूनही सर्वात जास्ती पगारवाढ वाट्याला जाणे, वीकेंडला लागून आलेल्या सुट्ट्यांच्या अलीकडे किंवा पलीकडे रजा मंजूर होणे, एकही पैसा खर्च न करता रोज कॅंटीनमध्ये खायला मिळणे, पूर्ण करायला सुलभ अशीच कामे असाईन होणे इत्यादी चमत्कार स्मार्ट कन्यांच्या बाबतीत नित्य घडत असतात.
विशेषतः “बरं ऐक ना..” या पालुपदाने सुरू होणारे कुठलेही संभाषण हे फार घातक ठरू शकते याची इतरांनी नोंद घ्यावी.
या निरूपद्रवी शब्दसमूहापाठोपाठ एखादे काम करून देण्याची गळ ही येतेच येते. आणि योग्य तो सावधपणा नसल्यास काही कळायच्या आत एखादा पुरूष कर्मचारी या स्मार्टपणाला नाहक बळी पडण्याची दाट शक्यता असते.
असा दयाळू कर्मचारी तिच्या कोडमधले बग्स काढून कोड सुधरवण्याचे काम रात्री उशीरापर्यंत थांबून करत बसतो तेंव्हा आपली स्मार्ट नायिका मात्र वेळेवर घरी पोहोचून फार्मा कंपनीत मॅनेजर असलेल्या आपल्या मित्राबरोबर चतुःश्रुंगीच्या टेकडीवरून दिसणारा सूर्यास्त जोडीने पहात असते.
बाकीच्या ठिकाणी बंदी असलेले जीटॉक, स्काईप, याहू असे विविध मेसेंजर्स आणि इतर वेबसाईटस् अश्या मुलींच्या पीसीवर हमखास चालू आढळतात.
बराच फावला वेळ मिळत असल्याने ‘bfn’ किंवा ‘ttyl’ असे लघुरूपातील चॅट-पंथीय संवाद यांनी आत्मसात व रूढ केलेले असतात. या भाषेचा अर्थ न कळल्याने गोंधळलेल्या समोरच्या व्यक्तीस ’तू आयटी मध्ये काम करण्यास लायक नसून तुझी जागा ही बॅंक किंवा विमा कंपनीच्या कचेरीत(च) असायला हवी’ अश्या तीव्र न्यूनगंड-उत्पादक विचाराच्या भेटी देणे ही मग ओघानेच येणारी गोष्ट ठरते!
सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये या सर्वजणी उत्साहाने पुढाकार घेतात आणि त्या नावाखाली आपल्या वाट्याची उरलीसुरली कामे इतरांच्या गळ्यात मारतात. बोलण्यातील चतुराई आणि वरीष्ठांबरोबरचे सौहार्द्र ही त्यांची बलस्थाने असल्याने आपला स्मार्टनेस अविरोध मिरवत कंपनीतील त्यांचा प्रवास सुखेनैव चालू असतो.
(४) टेस्टर –
आयटी मध्ये यायची संधी मिळालेले, पात्रता असणारे पण थोडेसे कमनशिबी असलेले जीव टेस्टर बनतात. कोणत्याही गोष्टीवर विश्वास न ठेवणे हा नंतर नंतर त्यांच्या स्वभावाचाच भाग बनून जातो. दुसर्यांनी लिहीलेल्या संगणक-प्रणालींची चाचणी करून त्यावर योग्य तो निर्णय देणे हे यांचे प्रमुख कार्य. पण दुसर्याच्या चुका काढण्याचे रसभरीत काम मिळाल्यामुळे अशी मंडळी आपले उपद्रवमूल्य खूप वाढवून घेतात.
क्वालिटी अथवा टेस्टींग साठी काम करत असलेल्या मुलींना डेव्हलपरने लिहीलेल्या प्रत्येक ओळीबद्दल निकराचा संशय येत असतो.
ज्याप्रमाणे सीआयडी मालिकेतील एसीपी जवळपास प्रत्येक पात्रावर खुनाचा आळ घेतो त्या पद्धतीने कोडमध्ये लिहीला गेलेला प्रत्येक शब्द हा चुकीचा आहे अशी रास्त खात्री टेस्टर लोकांना असते.
डेव्हलपर आणि टेस्टरमधील या पारंपारीक युद्धात विजयाचा लंबक कधी इकडे तर कधी तिकडे झुकत असतो.
टेस्टींग क्षेत्रात काम करणार्या भगिनींना कामाचा तणाव तुलनेने कमी असल्याने त्या विविध छंद आणि कलागुणांची जोपासना करताना दिसतात.
(५) बेंच –
’बेंच’ हे आयटी मधील बहारदार प्रकरण आहे. कोणत्याही प्रोजेक्टवर थेट बिलींग करता न येणारे, कोणत्याही कामासाठी सध्या थेट उपयोग करून न घेता येणारे, अर्हतेला साजेसे काम अजून न आल्याने इतर कामांमध्ये वापरण्याची मिजास न परवडणारे असे सगळे लोक या ’बेंच’वर टाकले जातात.
’बेंच’ वर आलेल्यांनी आपला वेळ आणि क्रियाशक्ती ज्ञानाची उजळणी करण्यात खर्च करावी अशी बाळबोध अपेक्षा काही काही कंपन्या करतात. तर ’बेंच’ म्हणजे आपला विश्रांतीचा अगर करमणुकीचा कालखंड आहे अशी सोईस्कर समजूत कर्मचारी करून घेतात.
’बेंच’वरील मुली हे इतरांच्या हेव्याचे कारण ठरू शकते. अश्या मुलींचे थवे कॅंपसमध्ये इकडून तिकडे बागडताना पाहून समोर साचलेल्या कामाकडे पहात आपल्या नशिबाला दोष देणार्यांची संख्या काही कमी नाही.
कॅंटीन, कॉफी मशिन्स, स्पोर्टस् रूम, लायब्ररी, आवारातील बागा, जिम इत्यादी ठिकाणी यांचा संचार मोठ्या संख्येने पहावयास मिळतो.
’बेंच’वरील काही काही मुली या कायम सेलफोनला चिकटलेल्या दिसतात. ते पाहताना एवढा वेळ संभाषण करणारी पलीकडील व्यक्तीही ’बेंच’वर असावी असा विचार मनास चाटून जातो.
आय.टी. आणि आय.टी. मधील सुखासीनतेबद्दल समाजात गोड गैरसमज पसरवण्यामध्ये या वर्गाचा मोठा हात आहे असा आम्हांस दाट संशय आहे.
इकडच्या जीवनाबद्दल असे मृगजळाचे मळे फुलवणारी हे लोक भवितव्याबाबत कुठेतरी थोडीशी चिंताग्रस्त देखील असतात. त्यानुसार ’बेंच’वरील कालखंडात इतर ठिकाणी मुलाखतीसाठी जाणे आणि बाहेर चांगल्या नोकरीसाठी चाचपणी करत राहणे हा उपक्रम देखील त्यांच्या करणीय गोष्टींच्या यादीमध्ये समाविष्ट होऊन जातो.
*****************
खरं तर माहिती तंत्रज्ञान हे स्त्री-बाहुल्य असलेलं क्षेत्र ! समाजाच्या इतर थरात निदर्शनास येणारा ’व्यक्ती तितक्या प्रकृती’ हा प्रवाद इथे देखील मोठ्या प्रमाणावर दिसून येतो.
त्यामुळे ’आयटी मध्ये गेलं की मुलींच्या डोक्यात हवा जाते’ अगर ’तिकडच्या मुली कॉमर्स किंवा आर्टसच्या विद्यार्थ्यांकडे प्रथम वर्ग एसीच्या प्रवासाने जनरल डब्यातल्या गर्दीकडे तुच्छतेने पहावे तश्या पाहतात’ असे निष्कर्ष सरसकट काढू नयेत.
’Grass Always Looks Greener on other side’ या वचनाप्रमाणे सामान्यांना त्यांच्या आयुष्यातला चकचकीतपणा दिसत असला तरी या प्रवासात घडलेल्या अनंत कर्मकहाण्या या कायम पडद्याआडच राहतात याची नोंद घ्यावी.
उपर्निदेष्टीत प्रकार हे केवळ वाचकांच्या स्पष्टतेसाठी केलेले असून त्याच्या अधिक तपशीलात जाण्यापेक्षा या क्षेत्रात योगदान देणार्या व आपला स्वल्पसा का होईना ठसा उमटवणार्या समस्त कर्मयोगिनींना अभिवादन करणे हेच प्रस्तुत लेखकास श्रेयस्कर वाटते.... !!!!!!!
Thursday, October 6, 2011
आयुष्यावर बोलू काही....
(पूर्वप्रसिद्धी: दै.सकाळ, औरगांबाद . आज बर्याच दिवसांनी ’डॉ. सलील च्या वाढदिवसानिमित्त”ब्लॉगवर प्रकाशित)’जा जा जा दिले दिले मन तुला....’
डॉ. सलील कुलकर्णी मोठ्या टेचात ही कविता आळवायला सुरूवात करतात अन् एक क्षणभराचा पॉज घेतात. समोर दुथडी भरून वाहणारी तरुणाई टाळ्यांचा प्रचंड गजर करते. ’कुणाला जर कुणाच्या तोंडावर मारायला गाणं हवं असेल... तर हेच ते गाणं” सलीलदादा निर्विकार चेहर्याने म्हणतात. सभागृह अक्षरशः फुटतं !!
’तुला मन द्यावे असे, काही कारण नव्हते....एवढेच म्हणू आता, तुझ्या नशिबात होते’ या खास सलील स्टाईलमध्ये म्हटलेल्या अंतर्याला तर खुर्च्या, दारे आणि पडद्यांचाही चीत्कार ऐकू येतो.
शिट्ट्य़ा, टाळ्या, हशा, ’वाह वा’, ’क्या बात है’ अश्या आपसुक निघणार्या दादी.... एवढं होऊनही शांतपणे तबला वाजवणारा आदित्य आठल्ये रांचीच्या स्तुपासारखा स्थितप्रज्ञ वाटायला लागतो.
अचूक वेळ साधत संदिप शरसंधान करतो, “असू दे... असू दे.... मगाशी उगाचंच आपलं हा म्हणाला की तो कवितेतला माणूस वगैरे...” सलीलकडे टाकलेला एक तिरका कटाक्ष आणि प्रेक्षकात पुन्हा एकदा लोळालोळी...... ’आयुष्यावर बोलू काही’ पहायला आलेला प्रत्येकजण या आणि अश्या असंख्य जागांवर ’फुल्ल टू एंजॉय’ करत प्रयोगाची लज्जत चाखत राहतो.
एकदा, दोनदा, दहादा, तीसदा, कितीही वेळा बघितला, अनुभवला तरी तृप्ती न होणारा, प्रत्येकवेळची खुमारी न्यारी असणारा मराठीतला हा अद्वितीय कार्यक्रम संदिप-सलील जोडी तितक्याच निष्ठेने व जीव ओतून सादर करत राहते.
*****************
साहित्य आणि संगीत हे मराठी जनमानसाचे जिव्हाळ्याचे विषय. या दोन्ही क्षेत्रात होऊन गेलेल्या अनेक दिग्गजांनी, मातब्बरांनी आपापल्या परीने शारदेची सेवा केली. संदिप-सलील जोडीने या कलामंदीरावर लखलखीत सोन्याचा कळस चढवला तो आपल्या ’आयुष्यावर बोलू काही’ या अनोख्या कलाकृतीने!!
बदलती गाणी पण न बदलंलेलं स्वरूप अशी संहीता असलेल्या ’आबोका’ने आबालवृद्धांना बेफाम वेड लावलं. संदिपच्या सरळ मनाला जाऊन भिडणार्या कवितांनी युवावर्ग परत एकदा मराठी भाषेच्या सौंदर्याकडे वळाला तर सलीलच्या सुश्राव्य आणि नाविन्यपुर्ण चालींनी संगीतप्रेमी मोहीत झाले.
एक कवि, एक गायक कम पेटीवादक आणि एक तबलावाला.....मागे नेपथ्य नाही...... नृत्य, नाट्य, निर्देशन काहीच नाही.......... बरं, कार्यक्रमाला साचेबद्ध आराखडाही नाही ...... की विषयाचं बंधन नाही......
पण पडदा उघडल्यापासून ते शेवटाची टाळ्यांच्या कानठळ्या बसवणार्या आवाजातली, उभ्याने दिली जाणारी मानवंदना होईपर्यंतचा काळ हा प्रेक्षकांसाठी का मंतरलेला होऊन जातो हे कळण्यासाठी तिथे जाऊन बसलंच पाहिजे....
असं काय बरं आहे या ’आबोका’मध्ये?
***********************
संदिप खरे म्हणजे मराठी काव्यजगताला मिळालेली नवसंजीवनी.........
संदिप खरे म्हणजे आजच्या तरूणमनाची चपखल अभिव्यक्ती......
आणि संदिप खरे म्हणजे आशयघन शब्दलीलेचा अमोघ सम्राट........
बोजडपणा टाळून भाषेची लज्जत चाखायला संदिपच्या कवितेनं शिकवलं !!
’मन तळ्यात, मळ्यात, जाईच्या कळ्यात.... मन नाजूकशी मोतीमाळ, तुझ्या नाजूकश्या गळ्यात’ म्हणत लावण्य अलगद टीपायला लावणारा संदिप ’प्रश्नांचे हे एकसंधसे तुकडे... त्यावर नाचे मनींचे अबलख घोडे.. या घोड्याला लगाम शोधत आहे, परि मजला गवसत नाही’ ही आत्मव्यथा तितक्याच प्रभावीपणे मांडतो.
’मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो’, ’मी मोर्चा नेला नाही’ ’आताशा मी फक्त रकाने’, ’अजून तरी रूळ सोडून’, ’साहेब म्हणतो चेपेन चेपेन’ याच्यासारख्या कित्येक वरकरणी हलक्याफुलक्या वाटणार्या कवितांमधूनही प्रत्येकवेळी त्याने एक विचार श्रोत्यांसमोर ठेवला.
’संकेतस्थळांचे सूर त्या लालस ओठी होते, ती वेळ पुरिया होती अन् झाड मारवा होते’ असा शब्दशृंगार रचावा तर संदिपनेच.....
’या जमिनीत एकदा स्वतःला गाडून घेइन म्हणतो’ अशी पराकोटीची उत्कट अवतरणे लिहावीत ती संदिपनेच... ’तुझ्या डोळ्यातल्या रानी असे रानभरीहोणे...अश्या मनात कबूल आम्हा वनवासी होणे’ अशी प्रेमवेड्या जीवाची बेहोशी मांडावी ती संदिपनेच...
’आकाशाचे देणे काही आज-उद्या फिटत नाही...आणि इतक्यात प्रलय होईल असं काही वाटत नाही’ असा शिखरावर जाउन केलेला कवितेचा शेवट असो की ’वोसाड्याच्या गावी तुझा वोसाडाचा मळा, गुलाबाला सोसवेना उन्हाळ्याच्या झळा’चा अस्सल गावरानी बाज, संदिपचं वेगळेपण ठसल्याशिवाय रहात नाही.
’कुणी अडवावे, कुणास भ्यावे, श्रीहरि सावरणारा’ अशी मधुराभक्तीची लय मांडणार्या संदिपच्या ’मौनाची भाषांतरे’ आणि ’नेणिवेची अक्षरे’ या कवितासंग्रहांना युवा वाचकवर्गाचा तुफान प्रतिसाद मिळालेला आहे.
संदिपने चाकोरीत अडकलेली कविता तिच्या गेयतेला अबाधित ठेवत सर्वसामान्यांच्या परीघात आणली.
त्याच्या सहज, भावस्पर्शी पण प्रत्यंयकारी काव्याने संवेदनशील जीव सुखावून गेले. प्रत्येकाच्या ओंजळीत काही ना काही टाकणारा कल्पवृक्ष संदिप खरेच्या रूपाने रंगशारदेच्या प्रांगणात आविर्भूत झाला.
संदिपच्या प्रत्येक चाहत्याला त्याच्या कुठल्या ना कुठल्या तरी शब्दामध्ये आपलीच आपल्याशी भेट झाल्याचा अनुभव येतो हे एका कलासाधकाच्या प्रतिभेचं विलक्षण यश... आणि उत्कट अभिव्यक्तींच्या माध्यमातून प्रसृत केलेल्या शेकडो नितांतसुंदर कविता हा संदिपने श्रोतृवर्गाला दिलेला चिरंतन, मोरपिशी ठेवा !!
***********************
एकदा पाहून, ऐकून, अनुभवून सुद्धा पोट न भरल्याने पुन्हा-पुन्हा येत राहणारा प्रेक्षकवर्ग हे ’आयुष्यावर बोलू काही’चं बलस्थान. तर त्यांना तसं प्रतिक्षिप्त क्रियेसारखं यायला भाग पाडणं ही संदिप-सलीलची जादुगिरी. ’आबोका’ला असं निष्ठावंत पाईक असल्याप्रमाणं अनेकदा येणार्या या वेड्या चाहत्यांची जाणीव दोघांनाही असावी. म्हणूनच की काय प्रत्येक प्रयोगात काहीतरी नविन देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
हजरजबाबीपणा, कमालीची सृजनशीलता, जनमानसाची नस अचूक ओळखण्याची हातोटी, प्रतिभेचं अलौकीक वरदान, आपल्यातलं सारसर्वस्व समोरच्याला भरभरून देण्याबाबत असलेला उत्साह असे अनेक सामाईक गुण असलेल्या संदिप-सलीलनी काव्यवाचन-काव्यगायन कार्यक्रमांची व्याख्याच बदलून टाकली.
’आबोका’ पहायला येणार्या तरूणाला अगदी सुरूवातीलाच साद घातली जाते ’जरा चुकीचे, जरा बरोबर बोलू काही... चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही’ या विचारप्रवर्तक गाण्याने.... हे असं मनमुराद आत्मचिंतन झाल्यावर संदिप-सलील-आदित्य रंगमंचावर अक्षरशः धुमाकुळ घालायला लागतात. संदिप एकापेक्षा एक बहारदार कविता वाचायला, गायला लागतो. सलील संधी मिळेल तिथे सहज, नर्मविनोदी शैलीत टीप्पण्या चालू करतो आणि प्रेक्षागृहात हास्याची कारंजी उडायला लागतात.
पुढे मग कसदार गायकीचा वसा लाभलेला सलील आपल्या गळ्याची करामत हळूच दाखवतो. इथे सगळंच कसं एक वेगळीच उंची गाठायला लागतं. आजचा आघाडीचा व प्रचंड लोकप्रिय संगीतकार म्हणून नावाजला गेलेला डॉ. सलील त्याची स्वतःची आणि क्वचित कधीकधी इतरांची कंपोझिशन्स अश्या काही खुमारीने सादर करतो की आपण एखाद्या अभिजात गायनाच्या मैफीलीला बसलो की काय असा भास व्हावा !
आदित्यची बोटं कधी द्रुतलयीत, कधी शांत ठेहरावासकट तर कधी ठसक्यात तबल्यावर फिरू लागतात.
मध्येच एखादा हळुवार, गंभीर क्षण येतो. ’दूरदेशी गेला बाबा, गेली कामावर आई’, ’अजून उजाडत नाही गं’, ’नास्तिक’ किंवा ’दमलेल्या बाबाची कहाणी’ सारख्या खोल गर्भितार्थ असणार्या कविता युवामनाला अंतर्मुख करून जातात. घड्याळाचा काटा पुढे सरकत राहतो. स्थळ-काळाचं भान विसरून लोक या काव्यामृतात पुन्हा पुन्हा डुबक्या मारत राहतात. प्रेक्षकांना असं सचैल भिजवणारे संदिप-सलील मात्र पुढची रचना पेश करण्यात मग्न होऊन गेलेले असतात........
**************
डॉ. सलील हे सरस्वतीचं लाडकं अपत्य !
निष्णात पेटीवादक, अथांग प्रतिभेचा संगीतकार, तयारीचा गायक, मनस्वी कवि, संवेदनशील लेखक असे अनेक गुण दाटीवाटीने भरून वागेश्वरीने ’सलील कुलकर्णी’ ही निर्मिती सस्मित चेहर्याने पूर्ण केली असणार. तरूण-तरूणींचे विवीध भाव-विभ्रम जोखून, त्यांच्या हृदयातली स्पंदनं टिपत ते सगळं अनेक मनोहारी रूपात रेखाटायचे काम डॉ. सलील आपल्या संगीतातून अव्याहतपणे करत असतात.
सलीलच्या संगीताने प्रत्येकवेळी नवनवी शिखरे पादाक्रांत करायचे ठरवलेय बहुधा!! त्याचं प्रत्येक नवं कंपोझिशन हे आधीच्यापेक्षा काकणभर सरसच असतं.
’माझ्या मना’ सारखं कमालीच गोड गाणं देणारा सलील ’संधीप्रकाशात’च्या रूपाने अस्वस्थ करणारी सांजसमाधी अलगद बहाल करतो.
सलीलच्या संगीतशैलीबद्दल लोकांना जशी एक कमालीची उत्सुकता आहे तसाच त्याच्या अष्टपैलुत्वाबद्दल आदरही आहे.
’प्रेमात म्हणे, कुणी मोहरते. कुणी हुरहुरते राणी’चा दाक्षिणात्य ठेका, ’तव नयनांचे दल’ मधला नाट्यसंगीताचा बाज, ’माझे जगणे होते गाणे’ ची आर्तता ’नसतेस घरी तू जेंव्हा’ मधली एव्हरग्रीन भैरवी, अफाट लोकप्रियतेचा कळस गाठलेल्या ’डिपाडी डिपांग’ची लयदार धून, ’मी फसलो म्हणूनी’ मध्ये मुर्तिमंत उभा केलेला यमन, ’तुझ्या-माझ्या सवे’ म्हणत रंगवलेला पाऊस, ’राती अर्ध्या राती’ मधला लोकगीताला मेलोडीयस बनवण्याचा अनोखा प्रयोग, ’देते कोण, देते कोण’ सारखं निसर्गातल्या चैतन्याचं गोजिरं चित्रण किंवा ’हुरहुर असते तीच उरी’ सारखी अवाक करून टाकणारी शास्त्रीय कलाकुसर......सलील कुलकर्णींचं गाणं थेट आत जाऊन भिडतं.
’ज्ञानियांचे ज्ञेय’ सारख्या अभंगाची चाल बांधणारा सलील ’वणवा’च्या रूपाने थिरकणार्या तरूणाईचाही होऊन जातो.
गाण्यांमधलं नाविन्य, त्यातली गुणवत्ता, त्यातली सुश्राव्यता असे अनेक घटक जपत या संगीतकाराचं आपल्याला खिळवून टाकणं चालूच आहे.
’आबोका’मध्ये सलीलला ऐकल्यावर तर सलीलच्या चतुरस्त्र कलागुणांची पुरेपुर ओळख पटून जाते. दशरथ पुजारी, श्रीनिवास खळे, वसंत देसाई, हृदयनाथ मंगेशकर, प्रभाकर जोग, अशोक पत्की अश्या मराठी संगीतसृष्टीला लाभलेल्या अनेक दिग्गज संगीतकारांची परंपरा - त्यांच्यापेक्षा थोड्याश्या अधिकचं चांगल्या पद्धतीने- पुढे चालवण्याचे कार्य सलील कुलकर्णी करत आहे याबद्दल प्रेक्षकांमध्ये दुमत रहात नाही.
**************
३ ऑगस्ट २००३ ला एका छोटेखानी, अनौपचारीक स्वरूपात सुरू झालेला ’आयुष्यावर बोलू काही’ ने आता साडेसातशे प्रयोगांचा टप्पा पार केला आहे. बीजाचं रूपांतर वटवृक्षात होऊन त्याच्या फांद्या आता चहूबाजूंनी विस्तारल्या आहेत. जपान, अमेरिका, इंग्लंड, दुबई, जपान इत्यादी १२ देशांमध्ये ’आबोका’चे कार्यक्रम तुफान रंगले. महाराष्ट्र आणि बाहेरही जवळपास प्रत्येक मोठ्या गावात, शहरात संदिप-सलील नी आपली कला सादर केली आहे. ’आबोका’ म्हणजे मराठी चोखंदळ संगीतप्रेमी, काव्यप्रेमींचे मानचिन्ह बनून गेला आहे.
सकाळच्या उन्हात सोनं आणि फुलांमध्ये ह्सरा चेहरा दिसायच्या वयात ज्यांनी ज्यांनी ’आयुष्यावर बोलू काही’ एकदातरी पाहिला त्या सर्वांच्या संगतीला ही कधीही न उतरणारी सांस्कृतिक भूल कायम राहते आहे.
आद्यकवि ’संत ज्ञानेश्वर महाराजां’पासून ते सध्याच्या गुरू ठाकूरपर्यंत अनेक एकापेक्षा एक सरस कवि, गीतकार या मराठी मातीत होऊन गेले. अश्या अनेक युगांचा समृद्ध वारसा लाभलेल्या मायबोलीतील कवितेला, गीतांना आजच्या काळात लोकाश्रय मिळवून देण्याचं तसंच सध्याच्या फास्ट-फॉरवर्ड पिढीची पावलं प्रेक्षागृहाकडे खेचून आणण्याचं विलक्षण महत्वाचं कार्य ’आयुष्यावर बोलू काही’ने केलं आहे.
गेल्या आठ वर्षांपासून चालत आलेलं हे मनोरंजनाचं पर्व असंच चालू राहतं....... प्रयोगाची तारीख जाहीर होते ना होते तोच शो हाऊसफुल्ल होऊन जाते....... संदिपच्या अंतःकरणाचा ठाव घेणार्या ओळींवर आणि सलीलच्या नित्यनूतन भासणार्या संगीतावर जीव ओवाळून टाकणारे कलासक्त वेडे पुन्हा तशीच गर्दी करतात........ पडदा वर जातो आणि पुन्हा एकदा सुरू होतो आयुष्याचं तत्वज्ञान तुमच्या-आमच्या डोळ्यातल्या भाषेत मांडणारा, खिळवून टाकणारा तोच लोकप्रिय अध्याय....... सलील गात राहतो,
“उद्या उद्याची किती काळजी, बघ रांगेतून....
उद्या उद्याची किती काळजी, बघ रांगेतून....
परवा आहे, उद्याच नंतर बोलू काही
परवा आहे, उद्याच नंतर बोलू काही
चला दोस्तहो, आयुष्यावर बोलू काही....
चला दोस्तहो, आयुष्यावर बोलू काही....”
Tuesday, August 30, 2011
’डोक्यात जाणे’ - एक चिंतन
पुणेरी भाषेने या मायमराठीला अनेक अजरामर शब्द बहाल केले आहेत. यापैकीच एक आणि सांप्रतकाळात सर्रास वापरला जाणारा शब्दप्रयोग म्हणजे ’डोक्यात जाणे’ !!
वाचकहो, एखादी व्यक्ती ’मनात भरणे’, ’डोळ्यात मावेनाशी होणे’, ’काळजात सामावणे’, ’हृदयात शिरणे’ वगैरे वाक्प्रचार आम्हांस माहीती होते. पण या भूतलावर जीवन कंठीत असलेला एखादा सजीव ’डोक्यात जातो’ म्हणजे नेमके काय होते याचा आम्ही खूप बारकाईने अभ्यास सुरू केला. पुणेरी लोकांच्या मते ’(तो किंवा ती)डोक्यात जाणे’ या मध्ये राग, संतापा पासून ते परकोटीचा उद्वेग आणि त्राग्यापर्यंत सर्व मनोभावांच्या छटा आहेत.
’Getting on the nerves चे हे पुण्यातील कट्ट्यांवर केलेले भ्रष्ट भाषांतर आहे का?’ या आमच्या प्रश्नाला सरकारने अण्णांच्या मागण्यांना दिली तशी सहज बगल दिली गेली.
’एखाद्यामुळे वाईट्ट्ट्ट्ट (’ट’ ला ’ट’ जोडला नाही तर तो निंदनीय अपराध मानावा !) चीडचीड झाली की त्याला डोक्यात जाणे म्हणतात’ अशी मौलीक माहिती मला टिळक रोडवर भेटलेल्या एका जुन्या मित्राने (मी फुकटात त्याला कॉपी करून दिलेल्या ’Inception’ आणि ’Shutter Island’ चित्रपटांच्या बदल्यात) दिली.
मानवजाती मधील काही काही लोकांना दुसर्याला मनस्ताप झाला अथवा राग-राग झाला की अवर्णनीय आनंद होतो. हे लोक कायम दुसर्याच्या डोक्यात जात रहातात. असे नियमितपणे डोक्यात गेल्याने त्यांच्या व्यक्तीमत्वाला एक वेगळीच झळाळी प्राप्त होते. आपल्या जुन्या शत्रूंचा, व्यावसायिक प्रतिस्पर्ध्यांचा काटा काढण्यासाठी अश्या ’भेजा फ्राय’ करणार्या महापुरूषांचा अत्यंत उपयोग होतो.
वाचकहो, ’डोक्यात जाणे’ हा म्हटलं तर टाळणीय प्रकार आहे पण म्हटलं तर कमावण्यासारखा गुणही आहे. दुसर्याची सात्विक संतापाने फुरफुरणारी मुर्ती बघून तुम्हांस आनंद होतो?
वात लावून दिल्यावर तडतडणार्या गुंडाळीचे दृश्य तुम्हाला तोष देऊन जाते?
कोणत्याही विषयावर आक्रमक आक्रेस्ताळपणे मते मांडणारे लोक तुम्ही enjoy करता?
निष्पाप भाव चेहर्यावर आणून समोरच्याचे रक्त उसळवण्यातली मजा तुम्हाला लुभावून टाकते?
वरीलपैकी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर होकारार्थी असेल तर आपल्याला या कलेचा अभ्यास त्वरीत करायला हवा.
’टोपी पडताक्षणी’ (At the drop of a hat चे हे भ्रष्ट मराठी भाषांतर... ’लोकसत्ता’ आणि ’महाराष्ट्र टाईम्स’ मध्ये येणार्या भयानक मराठीतील जाहिराती वाचून मान्यवरांना आजकाल असले काहीकाही सुचत असते..) डोक्यात जाण्याची विद्या फार कमी लोकांना अवगत आहे म्हणून निराश होण्याचे कारण नाही. आमची कमालीची निरीक्षणशक्ती आणि दांडगा सार्वजनिक अनुभव यांच्या संगमातून घुसळून काढलेली काही रत्ने आम्ही आज वाचकांसमोर ठेवू इच्छितो. यापैकी कोणत्याही मार्गाचा अवलंब करून भीड चेपेपर्यंत सराव केल्याने आपल्या अंतरंगाला तजेला प्राप्त होतो व पुणेरी असल्याचा सार्थ अभिमान आपल्यामध्ये दृढ होऊ लागतो. अर्थात इतर कोणत्याही व्यसनाप्रमाणे ’डोक्यात जाणे’ या अस्त्राचा वापर आपापल्या मापात राहून करावा. घडणार्या दुष्परीणामांना लेखक, सरकार, पाऊस, इंडीया टीव्ही, नंदन निलेकणी आणि परमेश्वर जबाबदार नाही याची ’आधार’ कार्ड काढलेल्या अथवा न काढलेल्या सर्वांनीच नोंद घ्यावी !!
युक्ती (१) भीषण पीजे –
दुसर्याला अक्षरशः वात येईल असे पीजे मारले की माणूस आपसूकच डोक्यात जायला लागतो. जोक मारणार्याच्या विनोदबुद्धीपेक्षा त्याच्या चुकीच्या टायमिंगवर डोक्यात जाण्याची तीव्रता अवलंबून असते.
प्रसंग:
तुम्ही आणि ’ती’ गाडीवरून चालले आहात. मागे बसलेल्या सुखद ’प्रकरणा’मुळे उत्तेजित होऊन तुमचा गाडीचा वेग वाढत चाललेला आहे. लटक्या रागाचे हुंकार (अथवा चिमटे, गुद्दे, थाप, बिलगणे..ज्याच्या त्याच्या सोयीनुसार, अनुभवानुसार आणि कल्पनाशक्तीनुसार आपण आपला पर्याय निवडावा !) ऐकून तुम्हाला जास्तीच चेव येतो आहे. इतक्यात एक प्रचंड मंद दिसणारा माणूस प्रकृतीधर्मानुसार शांतपणे मध्ये येतो. जीवनात कुठल्याच गोष्टीची घाई नसल्यासारखा तो मुंगीच्या पावलांनी रस्ता ओलांडणार अस्तो. तुम्ही ब्रेकचा (ऑटोमोबाईल कंपनीने डिझाईन केलेल्या क्षमतेपेक्षा अधिक) छळ करत त्याला चुकवता/घासता/थोडक्यात वाचवता.
मागे बसलेली व्यक्ती ओरडते/चीत्कारते/डोळे मिटते/अधिकच बिलगते वगैरे वगैरे.
वाचणारा आणि वाचवणारा दोघेही पुणेरी असल्याने एका आळसावलेल्या नेत्रपल्लवीखेरीज जास्ती नाट्य तिथे घडत नाही. गाडी पुढे जातेच आहे.
प्रकरण आता भानावर येऊन मोठ्या रागाच्या आविर्भावात म्हणते, “अरे काय चालवतो आहेस गाडी तू? उडवला असतास ना त्याला?”
वाचकहो, हीच ती वेळ आणि हाच तो क्षण !
तुमच्या भात्यातून निघालेला अशक्य पीजे – “असा कसा उडवेन? (जमल्यास ’ईटीव्ही कॉमेडी एक्सप्रेस’ मधील कमलाकर सातपुतेचा आवाज काढत) तो काय दिवाळीचा फटाका आहे का उडवायला?”
तुमच्या प्रेमात कितीही आकंठ बुडालेली व्यक्ती असो, या विनोदाने तुम्ही तिच्या (हृदयातून) डोक्यात जाणारंच !!
याचेच थोडे सामाजिक variation:
“असा कसा उडवेन? तो काही जमिन विकून आलेला पैसा आहे का उडवायला?”
त्याच व्यक्तीसोबत हा प्रसंग दुबार घडत असल्यास घ्यायचे variation:
“असा कसा उडवेन? तो काही पतंग आहे का उडवायला?”
प्रथम प्रयत्नात अपेक्षित परीणाम न साधल्यास लगेच पुढचा जोड-विनोद तयार असायलाच हवा.
“असा कसा उडवेन? तो म्हणजे काही जत्रेत मिळणारे विमान आहे का उडवायला?”
युक्ती (२) शब्दच्छल –
शब्दच्छल हा दुसर्याच्या डोक्यात जाण्याचा बौद्धीक राजमार्ग आहे असे आचरट-विज्ञान सांगते.
सदरहू प्रकारात इतरांनी बोललेल्या शब्दांचा सहारा घेऊन त्यातील काही शब्दांवर अत्यंत बालीश अगर ओढून ताणून केल्यासारखी कोटी करणे अपेक्षित आहे. काही काही वेळा यातून चपखल विनोद निर्माण होऊ शकतो पण ते आपले ध्येय नसल्याने हसू न येणार्या शब्दच्छलाकडे तूर्तास आपण सोदाहरण लक्ष देऊया.
तुमची ओळखीची कोणीही व्यक्ती एका गंभीर विषयावर तुमच्याशी चॅट करीत आहे. (टीप: शब्दच्छलाची खुमारी समोरासमोर घडणार्या संभाषणापेक्षा अप्रत्यक्ष बोलण्यामध्ये वापरल्याने खुप वाढते. शिवाय अघोरी शब्दच्छलामुळे दुसर्याच्या डोक्याची नस तडकल्याने तुम्हांस होऊ शकणार्या शारीरीक इजेपासून बचाव होतो) गप्पांचा विषय (कन्या राशीच्या प्रारब्धानुरूप) अनुक्रमे तक्रार, दुःख, वेदना, वैषम्य, करूणा, उद्वेग इत्यादी स्थानके पार करून असहाय्यतेच्या ’डेपो’मध्ये येत आहे.
तुम्ही: I think you should leave everything behind !
समोरील व्यक्ती: hmm… I wish
(वाचकहो, हीच ती वेळ आणि हाच तो क्षण !)
तुम्ही: I amrut
समोर भयानक शांतता पसरते. आधी मूळात हा जीवघेणा पीजे कळायला अंमळ वेळ लागतो अन् त्यानंतर राग, चीड, वैताग अश्या अनेक भावनांचा उद्रेक झाला असल्याने नेमके काय उत्तर द्यावे हे त्याला अथवा तिला समजत नाही.
आपल्या हजरजबाबी वाक्यानंतर प्रसंगवशात :P, :D किंवा ;) अश्या स्माईलीचा उपयोग करावयास हरकत नाही. चिन्हांचा वापर करताना आपला चारचौघात ’मनिष तिवारी’ होत नाही ना याची खबरदारी घ्यावी.
पलीकडील व्यक्ती अचानक लॉग ऑफ होणे, संतापाच्या भरात असंसदीय शब्द वापरणे, शिफ्ट आणि की-बोर्डवरील १ ते ९ पर्यंतच्या सर्व ’कीज्’ दाबून निर्माण होणारा स्माईलीसमूह पाठवणे या व अश्या प्रतिक्रीया आल्या की आपला शब्दच्छल उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाला असे समजावे !
समोरासमोरच्या संभाषणात शब्दच्छल वापरताना डोक्यात जाण्याची तीव्रता अनेक पटींनी वाढवायची असेल तर खालील बारकाव्यांकडे सूज्ञांनी लक्ष द्यावे –
अ) एकसे भले दो... एकाच वाक्यातील दोन शब्दांवर अथवा एकाच शब्दावर ’कॅस्केड’ केलेले दोन शब्दच्छल
उदा.
Project Manager: Let’s have another sitting tomorrow on this issue
तुम्ही: This requires system ‘setting’ rather than ‘sitting’ !!
Technical team doesn’t like to ‘sit’ on the issue for long time !!
किंवा
The way it is wiping the records from database, this issue should be called as tissue !!
आ) शब्दच्छलाच्या वेळी आपल्या उपकाराच्या ओझ्याखाली दबून गेलेल्या व्यक्ती (जसे - ज्याला आपण व्रत घेतल्यासारखे टपरीवर रोज फुकटात चहा पाजतो असा सहकारी, ऑफीसच्या वेळात सिनेमाची तिकीटे आणायला गेल्यावर ज्याचा मेसेंजर आपण ऑनलाईन ठेवतो व टाईमशीट भरून देतो असा टीम मेंबर, विकतची पावभाजी खाण्याची इच्छा झाल्याने ज्याचा घरून दिलेला डबा संपवण्यास आपण नित्यनियमाने मदत करतो असा निम-वरीष्ठ इत्यादी इत्यादी) आजूबाजूला असतील असे पहावे. केल्या मदतीला स्मरून अश्या व्यक्ती आपला विनोद उचलून धरतात अन् त्यामुळे आपण अगदी सुकरपणे इतरांच्या डोक्यात जातो.
इ) पहीला शब्दच्छल वाया गेल्यास नविन तयार करून मारण्यापेक्षा आपण केलेली कोटी समजावून देणे हा डोक्यात जाण्याचा हमखास उपाय आहे हे जिज्ञासूंनी लक्षात घ्यावे. समजावून सांगत असताना खोटे, खोटे डोळ्यात पाणी येईपर्यंत हसणे, टेबलावर हात आपटणे, पाय झाडणे, ’तुला सांगतो’, ’Did you get that?’ वगैरे शब्दप्रयोग मुश्कीलीने उच्चारणे या क्लृप्त्यांचा वापर करावा
ई) शब्दच्छलाचा चीड येईल असा उपसंहार म्हणजे जोक संपताक्षणी ऐकणार्याच्या तोंडाकडे हसण्याच्या अपेक्षेने पाहणे. टाळीसाठी हात पुढे करणे ही त्याच्याही पुढची पायरी. ’विनोदाचा दर्जा जितका दरीद्री तितकी टाळीस्तव हात पुढे करण्याची तत्परता अधिक’ हे सूत्र मात्र कायम लक्षात ठेवावे.
उ) शब्दच्छलानंतर दुसर्याला हाताने स्पर्श करणे हा डोक्यात जाण्याच्या प्रकाराचा कडेलोट आहे. आपल्या एकापाठोपाठ एक अश्या असहनीय कोट्यांमुळे जर्जर झालेल्या व्यक्तीस हाताने ढोसून हसण्यास प्रवृत्त करणे या अतीव रोमहर्षक कृतीमुळे मनमोहन सिंगसारख्या थंड व्यक्तींच्या मनातही आपल्याबद्दल पराकोटीचा संताप निर्माण होऊ शकतो.
युक्ती (३) सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये वाजणारे मोबाईल –
एकाचवेळी अनेकांच्या डोक्यात जाण्याची खुबी शोधण्यासाठी आपण हा लेख इथपर्यंत वाचत आला असाल तर अभिनंदन!! आता उलगडण्यात येणारी बहुमुल्य माहिती या बाबतीत आपल्या खरंच कामी येऊ शकते.
प्रेक्षागृहे, सिनेमा थिएटर, गाण्याच्या मैफीली, नाट्यगृहे, सभा-मिटींगचे हॉल्स ही ठिकाणे यासाठी अतिशय उपयुक्त म्हणून गणली जातात.
आपले आसन रंगमंचापासून जवळ आणि रांगांच्या दोन्ही शेवटांकडून बरोबर मध्यभागी असेल तर मोठी पर्वणीच !
कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी ’आपला मोबाईल बंद ठेवावा’ या सूचनेकडे आपण जाणीवपूर्वक दुर्लक्ष करावे. फावल्या वेळेत कामे नसलेल्या (म्हणजेच सरकारी कचेरीत नोकरीस असणार्या) आपल्या आप्तेष्टांना, बडबड्या मित्रांना, आपण देणे लागत असलेल्या महात्म्यांना “Give me call after 30 minutes”, “Call me once you reach home.. need to discuss something”, “Ring me after an hour… will sort out the matter” वगैरे आपल्या Free SMS Pack च्या कक्षेत येतील इतपतच मेसेज पाठवावेत.
त्यानंतर मोबाईलची रिंगटोन कर्णकर्कश अश्या ’सोनी दे नखरे’, ’कोंबडी पळाली’ किंवा ’ए गणपत’ यांपैकी कोणत्याही गाण्याला सेट करावी. होता होईल तो हिंदीपेक्षा प्रादेशिक भाषेतील गाण्यांना पसंती द्यावी.
गब्बरसिंग किंवा मकरंद अनासपुरेच्या आवाजातील धन्य संवाद किंवा ’बाबा लगीन’ सारखा मिरवणुकीत वाजवायचा लूप असेल तर सोन्याहून पिवळे !!
मोबाईलमधील व्ह्यायब्रेटर आणि साऊंड असे दोन्ही पर्याय आपण उदारपणे स्वीकारावेत.
कीपॅड पूर्णपणे लॉक करावे. मोबाईल जीन्सच्या अगदी आतल्या कप्प्यात (ए. राजाने 2G स्कॅमचा पैसा दडवला तसा) लपवून ठेवावा.
त्यावर रूमाल, पेन, खाली पडताच ’खळ्ळकन्’ अथवा ’खण्णकन्’ वाजणारी गाडीची किल्ली अश्या बहुविध वस्तू ठेवाव्यात. सर्व तजवीज करून झाल्यानंतर अत्यंत एकाग्र चेहरा करून रंगमंचाकडे पहात रहावे.
मध्ये मध्ये स्व-मनोरंजनासाठी ’उशीरा आलेल्या लोकांकडे दुपारची झोपमोड झाल्यासारखे अत्यंत त्रासिकपणे बघणे’, ’उग्र कांदा घातलेली भेळ तोंडाचे आवाज करत आणि सांडत सांडत खाणे,’ ’सादर होत असलेल्या गाण्याच्या अथवा कवितेच्या पुढच्या ओळी बाकीच्यांना ऐकू जातील अश्या पद्धतीने म्हणणे’, (हेच विनोदी नाटक असेल तर) ’जोक संपायच्या आधीच मोठ्यांदा हसू लागणे अथवा तो विनोद शेजारच्याला सांगून टाकणे’, ’झोपेत एका कुशीवरून दुसरीवर वळतो तसे आसनात जागा बदलत राहणे’, ’प्रेक्षागृहामधील ए.सी.च्या स्थितीनुसार हुडहुडी भरल्याचा अगर घामेघुम झाल्याचा अभिनय करत राहणे’ वगैरे गोष्टी चवीने कराव्यात.
कार्यक्रम रंगात येऊ लागला की आपण तयारीत रहावे. अंधारलेल्या हॉलमध्ये आपल्या आजूबाजूचे सर्व जण रंगमंचावर सादर होणार्या कलेमध्ये मग्न आहेत. कलाकार अत्यंत प्रभावीपणे सादरीकरण करत आहेत. एवढ्यात........मगाशी पाठवलेल्या अनेक (फ्री) SMS पैकी एखादा सुफल होतो....
आणि.... वाचकहो, हीच ती वेळ आणि हाच तो क्षण! ....
सर्व वातावरणाला पालटून टाकणारा एक खणखणीत नाद आपल्याच खिश्यातून येवू लागतो... प्रत्येक रिंगबरोबर आवाजाची तीव्रता वाढत जाते.... त्याला साथसंगत करण्यासाठी रात्री दोन-अडीचला कर्वेनगर चौकात मोकाट फिरणार्या कुत्र्यांच्या घश्यातून येतो तसा ’गुर-गुर’ हा व्हायब्रेटरचा रांगडा आवाज... क्या बात है !
काही कळायच्या आत जपानचा किनारा आणि भूप्रदेश गिळंकृत करणार्या सुनामीसारखी ही रिंगटोन आपल्या खुर्चीपासून उगम पावून आजूबाजूच्या अनेक प्रेक्षक-श्रोत्यांपर्यंत जाऊन धडकू लागते.
अल्पसंतुष्ट लोकांनी इथे थांबायला हरकत नाही. पण ज्यांना ’सामुहीक डोक्यात जाण्याच्या’ कल्पनेचा प्रगत थरार अनुभवायचा असेल त्याने पुढच्या नाट्याला प्रारंभ करावा.
सर्वप्रथम लोकांमधून उमटणार्या ’श्या’, ’चुक् चुक्’, ’शी’, ’काय हे’ असल्या प्रतिक्रीयांकडे साफ कानाडोळा करावा. मोबाईल ज्यात आहे तो सोडून इतर सर्व खिसे चाचपल्याचा/धुंडाळल्याचा अभिनय करावा.
इथे तात्कालिक परिस्थितीनुसार जीन्सच्या खिशात हात अडकून बसलाय, पाण्याची अथवा पिऊन ठेवलेल्या कोल्ड्रींकची बाटली लवंडली वगैरे variations घ्यायला लेखकाची हरकत नाही.
जवळ कॅरीबॅग असेल तर त्यात पूर्ण आतपर्यंत हात घालून वाद्यांपेक्षाही मोठा आवाज होईल अश्या रितीने ती चुरगळावी. चष्माधारी व्यक्तींनी आधी काही वेळ चष्मा काढणे, साफ करणे, पुन्हा घालून मोबाईल शोधायला लागणे असे उपचार आचरावेत.
शोधकार्य चालू असताना ’आत्ता नेमका कुणाचा फोन आला?’, ’कुठे ठेवला बरं फोन?’ असे प्रश्न पुटपुटत रहावे. एव्हाना रिंगटोनच्या गाण्याचे पहिले आवर्तन पूर्ण होऊन त्याचे पडसाद स्टेजवरही उमटायला लागलेले असतात. आता फोन सापडल्याचा आविर्भाव आणावा. त्या खिश्यातून मोबाईल काढण्यासाठी खुर्चीत अर्धवट उठून बसण्यापासून ते पाय समोरच्याच्या खुर्चीखाली लांब ताणण्यापर्यंत सर्व शक्कली लढवाव्यात. फोन बाहेर निघत असताना शक्य तेवढ्या सर्व वस्तू खाली पाडाव्यात. ती उचलण्याचे निमित्त करून उरलेली भेळ सांडावी.
आपण खाली वाकलेले असताना हॅंडसेट मात्र उंच वर धरावा जेणे करून आपली रिंगटोन समस्त प्रेक्षागृहाला व्यापून टाकेल.
आता इथून पुढचा टप्पा मात्र अगदी बेरकी साधकांसाठी आहे. मार्ग खूप खडतर आहे. पण त्यातून तरून गेल्यावर लाभणारा असुरी आनंद काही औरच आहे. प्रत्येकाने आपल्या बाय-सेपचा साईज, LIC Policyची संख्या आणि रक्कम, जवळच्या पोलिस मित्रांचे नंबर इत्यादींचे यथोचित भान राखून पुढील भाग अवलंबणे हेच इष्ट!
मोबाईल काढल्यानंतर आपण खुर्चीत स्थिर होऊन बसावे. गाणे चालूच आहे. इनकमिंग कॉलच्या बॅकलाईटमुळे तुमचा चेहरा उजळून निघालेला आहे. आता भगवंताने दिलेल्या या सुंदर चेहर्याचा यथायोग्य उपयोग करून घेण्याची नामी संधी तुम्हाला बहाल झालेली आहे.
आपण नितांत गोंधळल्याचे भाव आणावेत. मगाशी चष्मा काढलेल्यांनी इथे तो परत घालून फोनवरील नंबर वाचण्याचा निष्फळ प्रयत्न करावयाचा आहे. इतरांनी फोनवर आलेल्या नंबरकडे (अप्पा बळवंत चौकातील पुस्तक दुकानातील कर्मचारी हातातली कामे सोडून एकाच ग्राहकाकडे अगर रस्त्यावरील रहदारीकडे पहात राहतात तसे) बघत रहावे. एव्हाना तुम्ही तिथे उपस्थित असलेल्या बहुसंख्य लोकांच्या डोक्यात गेलेले असता.
इथे आपण फोन कट करून खांदे उडवत परत चित्रविचित्र आवाज करत तो फोन आत ठेवू शकतो. पण तुम्ही जर इतक्याने मन न भरलेले खंदे वीरपुरूष असाल तर आपण आता ’सामुहीक डोक्यात जाण्याच्या’ क्लायमॅक्सकडे जाऊया.. ही स्टेप प्रत्येकाने आपल्या जोखमीवर घेणे अपेक्षित आहे.
निष्णात वाचकहो, आता कॉल चक्क रिसीव्ह करावा. ’मी आत्ता एका कार्यक्रमात आहे’ हे वाक्य हळूच बोलल्याचा आव आणत पण खरं तर बॅकस्टेजपर्यंत ऐकू जाईल अश्या बेताने म्हणावे. अजून रसनिष्पत्तीसाठी ’त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यात घे रे’, ’फोल्डरला राईट क्लीक कर...दिसतंय ना ते पिवळे फोल्डर’, ’हॅल्लो...कुठे आहेस? विरारहून अंधेरीला चालला आहेस का?’ किंवा ’अहो मॅडम, तुमचे पैसे कुठे पळून जात आहेत का? कार्यक्रम संपल्यावर मी ब्रॅंचला लगेच येतो’ अशी वायफळ वाक्ये मोठ्यांदा उच्चारावीत.
लोकांची शिवीगाळ, तिरस्कारपूर्ण कटाक्ष, आरडाओरडा, शाप शांतपणे झेलावेत आणि आपण इतक्या बखुबीने इतक्या मोठ्या जनसमुदायाचं रक्त तापवलं/उसळवलं/वाया घालवलं या विकृत आनंदात रमून रहावं !!
डिसक्लेमर:
१. या प्रयोगाने चिडून जाऊन एखाद्या सहप्रवाश्याने तुमचा मोबाईल (’जिंदगी ना मिलेगी दोबारा’ मध्ये फरहान ह्रतिकचा फेकून देतो तसा) बाहेर फेकून दिल्यास लेखक जबाबदार नाही. चाणाक्ष लोकांनी अश्या वेळी कंपनीने दिलेला हॅंडसेट, अनेक वर्षे पडून असलेला जुना दणकट नोकीया किंवा सासुरवाडीच्या लोकांकडून एका दिवसाच्या वायद्यावर मागून आणलेला फोन वापरावा !!
२. हे डोक्यात जाण्याचे टेक्निक ’आयुष्यावर बोलू काही’ मध्ये चुकूनही वापरू नये. तिथे याचा प्रयोग करणे म्हणजे स्वतःच्या पायावर ’कपिल सिब्बल’ पाडून घेण्यासारखे आहे. असला वावदूकपणा करणार्या मंडळींवर ’आबोका’च्या स्टेजवरील मान्यवरांचे बारीक लक्ष असते. त्यामुळे बाजी उलटून असले चाळे करणारा गुन्हेगार त्यांच्या विनोदाचा एक भाग केंव्हा बनून जाईल हे सांगता येत नाही.
मान्यवरांकडून उडवली गेलेली खिल्ली, चुरचुरीत विनोदी पद्धतीने घेतला गेलेला समाचार आणि त्याला सहप्रेक्षकांचा मिळालेला कानठाळ्या बसवणारा प्रतिसाद यामुळे एखाद्याच्या आत्मविश्वासाला major तडे जाऊ शकतात !!
३. श्रीराम लागू, नाना पाटेकर, विक्रम गोखले, राहुल सोलापूरकर, मकरंद देशपांडे इत्यादी मंडळी भूमिका करत असलेल्या नाटक समयी हा प्रयोग करणे हे आपल्या व समाजाच्या दृष्टीने हानीकारक ठरू शकते !!
युक्ती (४) सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये गोंधळ घालणारी बालके –
वर दिलेल्या युक्ती क्रमांक ३ मध्ये जीवाला असलेल्या संभाव्य धोका टाळायचा असेल आणि तरीही ’सामूहिक डोक्यात जाण्याच्या’ भावनेचा आनंद लुटायचा असेल तर या अमोघ मार्गाला पर्याय नाही. बहुतांश मुलांमध्ये आपल्या पालकांचे गुण उपजतच आलेले असल्याने द्वाडपणा व संभावितपणा शिकवण्याचे विशेष कष्ट घ्यावे लागत नाहीत. मुलांनी कसा आणि किती गोंधळ करावा याचे काही विशेष ठोकताळे नसल्याने ती गोष्ट आपण व्रात्य अपत्यांवर सोडून द्यावी. सार्वजनिक कार्यक्रमात दंगा करणार्या मुलांचे ढोबळमानाने पुढीलप्रमाणे चार प्रमुख प्रकार पडतात -
(अ) अकलनीय शब्द अथवा सुरस आवाज काढणारे – जसे ’आव्व्व्व्व’, ’धुडुम’, ’क्वाड्ड्ड्ड्ड्ड्ड्ड’, ’बाब्य्य्य्य्य्य्य्य्या’. श्रोत्यांकडून मिळणारा हशा हे त्यांचे बलस्थान.
(आ) रडणारे/किंचाळणारे/हुंदके देणारे – या मुलांना जितके शांत करायला जावे तितके त्यांचे रडणे अधिकच वाढते असा सार्वत्रिक अनुभव आहे
(इ) खुर्च्यांच्या मध्ये, पॅसेजमध्ये, स्टेजसमोरील मोकळ्या जागेत खेळणारे – चेंडूपासून शिवणा-पाणीपर्यंत आणि कोलांट्या उड्यांपासून ते हावभावापर्यंत कोणत्याही मनोरंजक खेळात मग्न असलेले.
(ई) कार्यक्रम भर रंगात आलेला असताना थेट स्टेजवर अथवा कलाकाराच्या समोर जाऊन उभे ठाकणारे – ही सर्वात धीट आणि हाताळायला आगाऊ जमात. असे बालवीर पुढच्या क्षणाला काय करतील याचा अंदाज येऊ न शकल्याने भलेभले कलाकारही यांना वचकून असतात. मोठमोठ्यांची पत्रास न बाळगायची (आणि त्यांची फजिती करायची) सवय लागल्याने अशी मुले पुढे जाऊन अर्णब गोस्वामी, राजदीप सरदेसाई, दीपक चौरासिया, सागरीका घोश, बरखा दत्त, निखील वागळे इत्यादी नावांनी कुप्रसिद्ध होतात.
आपले मूल यापैकी कोणत्याही गटात बसत असले अथवा नसले तरी कार्यक्रमस्थळी त्यांना उधळू दिले की ते उपस्थितांच्या डोक्यात रितसर जाते ही काळ्या दगडावरची रेघ आहे.
कार्यक्रम/समारंभ रंगात आलेला आहे. श्रोते/प्रेक्षक तल्लीन झालेले आहेत. कलाकर ऐन भरात आले आहेत. वाचकहो, हीच ती वेळ आणि हाच तो क्षण ! आपल्या चिरंजीवांच्या अथवा कन्येच्या उपद्रवमूल्याचा रसरशीत आविष्कार होऊ देण्यासाठी याहून चांगली घटीका ती कोणती?
गाण्याच्या अथवा कवितेच्या कार्यक्रमात किंवा गंभीर सिनेमाच्या वेळी भोकाड पसरणार्या लहान मुलापरता ’डोक्यात जाण्याचा’ दुसरा जालीम उपाय नाही.
एकीकडे बालकांना त्यांची प्रतिभा मुक्तहस्ताने उधळण्याची मुभा देत असताना आई-बाबांनी मात्र कपाळ्यावर आठ्या किंवा ’काय करू? कसं सांभाळू? ऐकतच नाहीये’ अश्या भावना दर्शवणारे हताशतेचे भाव धारण करावेत. आतून उकळ्या फुटत असतानाही केवळ चार-दोन प्रेक्षकांच्या रागीट नजरांमुळे आपल्या मुलांना पकडायला अगर शांत करायला जाऊ नये. अगदीच आणिबाणीची परिस्थिती ओढवल्याने मुलांच्या पाठीमागे जावे लागलेच तर तो गोंधळ द्विगुणित कसा होईल हे निग्रहाने पहावे.
कितीही डोक्यात जात असलो तरी पालकत्वाच्या सहानुभूतीमुळे आपल्यावर थेट कसलीही कारवाई होणार नाही याबद्दल आपण अगदी निःशंक असावे !
(क्रमशः)
वाचकहो, एखादी व्यक्ती ’मनात भरणे’, ’डोळ्यात मावेनाशी होणे’, ’काळजात सामावणे’, ’हृदयात शिरणे’ वगैरे वाक्प्रचार आम्हांस माहीती होते. पण या भूतलावर जीवन कंठीत असलेला एखादा सजीव ’डोक्यात जातो’ म्हणजे नेमके काय होते याचा आम्ही खूप बारकाईने अभ्यास सुरू केला. पुणेरी लोकांच्या मते ’(तो किंवा ती)डोक्यात जाणे’ या मध्ये राग, संतापा पासून ते परकोटीचा उद्वेग आणि त्राग्यापर्यंत सर्व मनोभावांच्या छटा आहेत.
’Getting on the nerves चे हे पुण्यातील कट्ट्यांवर केलेले भ्रष्ट भाषांतर आहे का?’ या आमच्या प्रश्नाला सरकारने अण्णांच्या मागण्यांना दिली तशी सहज बगल दिली गेली.
’एखाद्यामुळे वाईट्ट्ट्ट्ट (’ट’ ला ’ट’ जोडला नाही तर तो निंदनीय अपराध मानावा !) चीडचीड झाली की त्याला डोक्यात जाणे म्हणतात’ अशी मौलीक माहिती मला टिळक रोडवर भेटलेल्या एका जुन्या मित्राने (मी फुकटात त्याला कॉपी करून दिलेल्या ’Inception’ आणि ’Shutter Island’ चित्रपटांच्या बदल्यात) दिली.
मानवजाती मधील काही काही लोकांना दुसर्याला मनस्ताप झाला अथवा राग-राग झाला की अवर्णनीय आनंद होतो. हे लोक कायम दुसर्याच्या डोक्यात जात रहातात. असे नियमितपणे डोक्यात गेल्याने त्यांच्या व्यक्तीमत्वाला एक वेगळीच झळाळी प्राप्त होते. आपल्या जुन्या शत्रूंचा, व्यावसायिक प्रतिस्पर्ध्यांचा काटा काढण्यासाठी अश्या ’भेजा फ्राय’ करणार्या महापुरूषांचा अत्यंत उपयोग होतो.
वाचकहो, ’डोक्यात जाणे’ हा म्हटलं तर टाळणीय प्रकार आहे पण म्हटलं तर कमावण्यासारखा गुणही आहे. दुसर्याची सात्विक संतापाने फुरफुरणारी मुर्ती बघून तुम्हांस आनंद होतो?
वात लावून दिल्यावर तडतडणार्या गुंडाळीचे दृश्य तुम्हाला तोष देऊन जाते?
कोणत्याही विषयावर आक्रमक आक्रेस्ताळपणे मते मांडणारे लोक तुम्ही enjoy करता?
निष्पाप भाव चेहर्यावर आणून समोरच्याचे रक्त उसळवण्यातली मजा तुम्हाला लुभावून टाकते?
वरीलपैकी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर होकारार्थी असेल तर आपल्याला या कलेचा अभ्यास त्वरीत करायला हवा.
’टोपी पडताक्षणी’ (At the drop of a hat चे हे भ्रष्ट मराठी भाषांतर... ’लोकसत्ता’ आणि ’महाराष्ट्र टाईम्स’ मध्ये येणार्या भयानक मराठीतील जाहिराती वाचून मान्यवरांना आजकाल असले काहीकाही सुचत असते..) डोक्यात जाण्याची विद्या फार कमी लोकांना अवगत आहे म्हणून निराश होण्याचे कारण नाही. आमची कमालीची निरीक्षणशक्ती आणि दांडगा सार्वजनिक अनुभव यांच्या संगमातून घुसळून काढलेली काही रत्ने आम्ही आज वाचकांसमोर ठेवू इच्छितो. यापैकी कोणत्याही मार्गाचा अवलंब करून भीड चेपेपर्यंत सराव केल्याने आपल्या अंतरंगाला तजेला प्राप्त होतो व पुणेरी असल्याचा सार्थ अभिमान आपल्यामध्ये दृढ होऊ लागतो. अर्थात इतर कोणत्याही व्यसनाप्रमाणे ’डोक्यात जाणे’ या अस्त्राचा वापर आपापल्या मापात राहून करावा. घडणार्या दुष्परीणामांना लेखक, सरकार, पाऊस, इंडीया टीव्ही, नंदन निलेकणी आणि परमेश्वर जबाबदार नाही याची ’आधार’ कार्ड काढलेल्या अथवा न काढलेल्या सर्वांनीच नोंद घ्यावी !!
युक्ती (१) भीषण पीजे –
दुसर्याला अक्षरशः वात येईल असे पीजे मारले की माणूस आपसूकच डोक्यात जायला लागतो. जोक मारणार्याच्या विनोदबुद्धीपेक्षा त्याच्या चुकीच्या टायमिंगवर डोक्यात जाण्याची तीव्रता अवलंबून असते.
प्रसंग:
तुम्ही आणि ’ती’ गाडीवरून चालले आहात. मागे बसलेल्या सुखद ’प्रकरणा’मुळे उत्तेजित होऊन तुमचा गाडीचा वेग वाढत चाललेला आहे. लटक्या रागाचे हुंकार (अथवा चिमटे, गुद्दे, थाप, बिलगणे..ज्याच्या त्याच्या सोयीनुसार, अनुभवानुसार आणि कल्पनाशक्तीनुसार आपण आपला पर्याय निवडावा !) ऐकून तुम्हाला जास्तीच चेव येतो आहे. इतक्यात एक प्रचंड मंद दिसणारा माणूस प्रकृतीधर्मानुसार शांतपणे मध्ये येतो. जीवनात कुठल्याच गोष्टीची घाई नसल्यासारखा तो मुंगीच्या पावलांनी रस्ता ओलांडणार अस्तो. तुम्ही ब्रेकचा (ऑटोमोबाईल कंपनीने डिझाईन केलेल्या क्षमतेपेक्षा अधिक) छळ करत त्याला चुकवता/घासता/थोडक्यात वाचवता.
मागे बसलेली व्यक्ती ओरडते/चीत्कारते/डोळे मिटते/अधिकच बिलगते वगैरे वगैरे.
वाचणारा आणि वाचवणारा दोघेही पुणेरी असल्याने एका आळसावलेल्या नेत्रपल्लवीखेरीज जास्ती नाट्य तिथे घडत नाही. गाडी पुढे जातेच आहे.
प्रकरण आता भानावर येऊन मोठ्या रागाच्या आविर्भावात म्हणते, “अरे काय चालवतो आहेस गाडी तू? उडवला असतास ना त्याला?”
वाचकहो, हीच ती वेळ आणि हाच तो क्षण !
तुमच्या भात्यातून निघालेला अशक्य पीजे – “असा कसा उडवेन? (जमल्यास ’ईटीव्ही कॉमेडी एक्सप्रेस’ मधील कमलाकर सातपुतेचा आवाज काढत) तो काय दिवाळीचा फटाका आहे का उडवायला?”
तुमच्या प्रेमात कितीही आकंठ बुडालेली व्यक्ती असो, या विनोदाने तुम्ही तिच्या (हृदयातून) डोक्यात जाणारंच !!
याचेच थोडे सामाजिक variation:
“असा कसा उडवेन? तो काही जमिन विकून आलेला पैसा आहे का उडवायला?”
त्याच व्यक्तीसोबत हा प्रसंग दुबार घडत असल्यास घ्यायचे variation:
“असा कसा उडवेन? तो काही पतंग आहे का उडवायला?”
प्रथम प्रयत्नात अपेक्षित परीणाम न साधल्यास लगेच पुढचा जोड-विनोद तयार असायलाच हवा.
“असा कसा उडवेन? तो म्हणजे काही जत्रेत मिळणारे विमान आहे का उडवायला?”
युक्ती (२) शब्दच्छल –
शब्दच्छल हा दुसर्याच्या डोक्यात जाण्याचा बौद्धीक राजमार्ग आहे असे आचरट-विज्ञान सांगते.
सदरहू प्रकारात इतरांनी बोललेल्या शब्दांचा सहारा घेऊन त्यातील काही शब्दांवर अत्यंत बालीश अगर ओढून ताणून केल्यासारखी कोटी करणे अपेक्षित आहे. काही काही वेळा यातून चपखल विनोद निर्माण होऊ शकतो पण ते आपले ध्येय नसल्याने हसू न येणार्या शब्दच्छलाकडे तूर्तास आपण सोदाहरण लक्ष देऊया.
तुमची ओळखीची कोणीही व्यक्ती एका गंभीर विषयावर तुमच्याशी चॅट करीत आहे. (टीप: शब्दच्छलाची खुमारी समोरासमोर घडणार्या संभाषणापेक्षा अप्रत्यक्ष बोलण्यामध्ये वापरल्याने खुप वाढते. शिवाय अघोरी शब्दच्छलामुळे दुसर्याच्या डोक्याची नस तडकल्याने तुम्हांस होऊ शकणार्या शारीरीक इजेपासून बचाव होतो) गप्पांचा विषय (कन्या राशीच्या प्रारब्धानुरूप) अनुक्रमे तक्रार, दुःख, वेदना, वैषम्य, करूणा, उद्वेग इत्यादी स्थानके पार करून असहाय्यतेच्या ’डेपो’मध्ये येत आहे.
तुम्ही: I think you should leave everything behind !
समोरील व्यक्ती: hmm… I wish
(वाचकहो, हीच ती वेळ आणि हाच तो क्षण !)
तुम्ही: I amrut
समोर भयानक शांतता पसरते. आधी मूळात हा जीवघेणा पीजे कळायला अंमळ वेळ लागतो अन् त्यानंतर राग, चीड, वैताग अश्या अनेक भावनांचा उद्रेक झाला असल्याने नेमके काय उत्तर द्यावे हे त्याला अथवा तिला समजत नाही.
आपल्या हजरजबाबी वाक्यानंतर प्रसंगवशात :P, :D किंवा ;) अश्या स्माईलीचा उपयोग करावयास हरकत नाही. चिन्हांचा वापर करताना आपला चारचौघात ’मनिष तिवारी’ होत नाही ना याची खबरदारी घ्यावी.
पलीकडील व्यक्ती अचानक लॉग ऑफ होणे, संतापाच्या भरात असंसदीय शब्द वापरणे, शिफ्ट आणि की-बोर्डवरील १ ते ९ पर्यंतच्या सर्व ’कीज्’ दाबून निर्माण होणारा स्माईलीसमूह पाठवणे या व अश्या प्रतिक्रीया आल्या की आपला शब्दच्छल उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाला असे समजावे !
समोरासमोरच्या संभाषणात शब्दच्छल वापरताना डोक्यात जाण्याची तीव्रता अनेक पटींनी वाढवायची असेल तर खालील बारकाव्यांकडे सूज्ञांनी लक्ष द्यावे –
अ) एकसे भले दो... एकाच वाक्यातील दोन शब्दांवर अथवा एकाच शब्दावर ’कॅस्केड’ केलेले दोन शब्दच्छल
उदा.
Project Manager: Let’s have another sitting tomorrow on this issue
तुम्ही: This requires system ‘setting’ rather than ‘sitting’ !!
Technical team doesn’t like to ‘sit’ on the issue for long time !!
किंवा
The way it is wiping the records from database, this issue should be called as tissue !!
आ) शब्दच्छलाच्या वेळी आपल्या उपकाराच्या ओझ्याखाली दबून गेलेल्या व्यक्ती (जसे - ज्याला आपण व्रत घेतल्यासारखे टपरीवर रोज फुकटात चहा पाजतो असा सहकारी, ऑफीसच्या वेळात सिनेमाची तिकीटे आणायला गेल्यावर ज्याचा मेसेंजर आपण ऑनलाईन ठेवतो व टाईमशीट भरून देतो असा टीम मेंबर, विकतची पावभाजी खाण्याची इच्छा झाल्याने ज्याचा घरून दिलेला डबा संपवण्यास आपण नित्यनियमाने मदत करतो असा निम-वरीष्ठ इत्यादी इत्यादी) आजूबाजूला असतील असे पहावे. केल्या मदतीला स्मरून अश्या व्यक्ती आपला विनोद उचलून धरतात अन् त्यामुळे आपण अगदी सुकरपणे इतरांच्या डोक्यात जातो.
इ) पहीला शब्दच्छल वाया गेल्यास नविन तयार करून मारण्यापेक्षा आपण केलेली कोटी समजावून देणे हा डोक्यात जाण्याचा हमखास उपाय आहे हे जिज्ञासूंनी लक्षात घ्यावे. समजावून सांगत असताना खोटे, खोटे डोळ्यात पाणी येईपर्यंत हसणे, टेबलावर हात आपटणे, पाय झाडणे, ’तुला सांगतो’, ’Did you get that?’ वगैरे शब्दप्रयोग मुश्कीलीने उच्चारणे या क्लृप्त्यांचा वापर करावा
ई) शब्दच्छलाचा चीड येईल असा उपसंहार म्हणजे जोक संपताक्षणी ऐकणार्याच्या तोंडाकडे हसण्याच्या अपेक्षेने पाहणे. टाळीसाठी हात पुढे करणे ही त्याच्याही पुढची पायरी. ’विनोदाचा दर्जा जितका दरीद्री तितकी टाळीस्तव हात पुढे करण्याची तत्परता अधिक’ हे सूत्र मात्र कायम लक्षात ठेवावे.
उ) शब्दच्छलानंतर दुसर्याला हाताने स्पर्श करणे हा डोक्यात जाण्याच्या प्रकाराचा कडेलोट आहे. आपल्या एकापाठोपाठ एक अश्या असहनीय कोट्यांमुळे जर्जर झालेल्या व्यक्तीस हाताने ढोसून हसण्यास प्रवृत्त करणे या अतीव रोमहर्षक कृतीमुळे मनमोहन सिंगसारख्या थंड व्यक्तींच्या मनातही आपल्याबद्दल पराकोटीचा संताप निर्माण होऊ शकतो.
युक्ती (३) सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये वाजणारे मोबाईल –
एकाचवेळी अनेकांच्या डोक्यात जाण्याची खुबी शोधण्यासाठी आपण हा लेख इथपर्यंत वाचत आला असाल तर अभिनंदन!! आता उलगडण्यात येणारी बहुमुल्य माहिती या बाबतीत आपल्या खरंच कामी येऊ शकते.
प्रेक्षागृहे, सिनेमा थिएटर, गाण्याच्या मैफीली, नाट्यगृहे, सभा-मिटींगचे हॉल्स ही ठिकाणे यासाठी अतिशय उपयुक्त म्हणून गणली जातात.
आपले आसन रंगमंचापासून जवळ आणि रांगांच्या दोन्ही शेवटांकडून बरोबर मध्यभागी असेल तर मोठी पर्वणीच !
कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी ’आपला मोबाईल बंद ठेवावा’ या सूचनेकडे आपण जाणीवपूर्वक दुर्लक्ष करावे. फावल्या वेळेत कामे नसलेल्या (म्हणजेच सरकारी कचेरीत नोकरीस असणार्या) आपल्या आप्तेष्टांना, बडबड्या मित्रांना, आपण देणे लागत असलेल्या महात्म्यांना “Give me call after 30 minutes”, “Call me once you reach home.. need to discuss something”, “Ring me after an hour… will sort out the matter” वगैरे आपल्या Free SMS Pack च्या कक्षेत येतील इतपतच मेसेज पाठवावेत.
त्यानंतर मोबाईलची रिंगटोन कर्णकर्कश अश्या ’सोनी दे नखरे’, ’कोंबडी पळाली’ किंवा ’ए गणपत’ यांपैकी कोणत्याही गाण्याला सेट करावी. होता होईल तो हिंदीपेक्षा प्रादेशिक भाषेतील गाण्यांना पसंती द्यावी.
गब्बरसिंग किंवा मकरंद अनासपुरेच्या आवाजातील धन्य संवाद किंवा ’बाबा लगीन’ सारखा मिरवणुकीत वाजवायचा लूप असेल तर सोन्याहून पिवळे !!
मोबाईलमधील व्ह्यायब्रेटर आणि साऊंड असे दोन्ही पर्याय आपण उदारपणे स्वीकारावेत.
कीपॅड पूर्णपणे लॉक करावे. मोबाईल जीन्सच्या अगदी आतल्या कप्प्यात (ए. राजाने 2G स्कॅमचा पैसा दडवला तसा) लपवून ठेवावा.
त्यावर रूमाल, पेन, खाली पडताच ’खळ्ळकन्’ अथवा ’खण्णकन्’ वाजणारी गाडीची किल्ली अश्या बहुविध वस्तू ठेवाव्यात. सर्व तजवीज करून झाल्यानंतर अत्यंत एकाग्र चेहरा करून रंगमंचाकडे पहात रहावे.
मध्ये मध्ये स्व-मनोरंजनासाठी ’उशीरा आलेल्या लोकांकडे दुपारची झोपमोड झाल्यासारखे अत्यंत त्रासिकपणे बघणे’, ’उग्र कांदा घातलेली भेळ तोंडाचे आवाज करत आणि सांडत सांडत खाणे,’ ’सादर होत असलेल्या गाण्याच्या अथवा कवितेच्या पुढच्या ओळी बाकीच्यांना ऐकू जातील अश्या पद्धतीने म्हणणे’, (हेच विनोदी नाटक असेल तर) ’जोक संपायच्या आधीच मोठ्यांदा हसू लागणे अथवा तो विनोद शेजारच्याला सांगून टाकणे’, ’झोपेत एका कुशीवरून दुसरीवर वळतो तसे आसनात जागा बदलत राहणे’, ’प्रेक्षागृहामधील ए.सी.च्या स्थितीनुसार हुडहुडी भरल्याचा अगर घामेघुम झाल्याचा अभिनय करत राहणे’ वगैरे गोष्टी चवीने कराव्यात.
कार्यक्रम रंगात येऊ लागला की आपण तयारीत रहावे. अंधारलेल्या हॉलमध्ये आपल्या आजूबाजूचे सर्व जण रंगमंचावर सादर होणार्या कलेमध्ये मग्न आहेत. कलाकार अत्यंत प्रभावीपणे सादरीकरण करत आहेत. एवढ्यात........मगाशी पाठवलेल्या अनेक (फ्री) SMS पैकी एखादा सुफल होतो....
आणि.... वाचकहो, हीच ती वेळ आणि हाच तो क्षण! ....
सर्व वातावरणाला पालटून टाकणारा एक खणखणीत नाद आपल्याच खिश्यातून येवू लागतो... प्रत्येक रिंगबरोबर आवाजाची तीव्रता वाढत जाते.... त्याला साथसंगत करण्यासाठी रात्री दोन-अडीचला कर्वेनगर चौकात मोकाट फिरणार्या कुत्र्यांच्या घश्यातून येतो तसा ’गुर-गुर’ हा व्हायब्रेटरचा रांगडा आवाज... क्या बात है !
काही कळायच्या आत जपानचा किनारा आणि भूप्रदेश गिळंकृत करणार्या सुनामीसारखी ही रिंगटोन आपल्या खुर्चीपासून उगम पावून आजूबाजूच्या अनेक प्रेक्षक-श्रोत्यांपर्यंत जाऊन धडकू लागते.
अल्पसंतुष्ट लोकांनी इथे थांबायला हरकत नाही. पण ज्यांना ’सामुहीक डोक्यात जाण्याच्या’ कल्पनेचा प्रगत थरार अनुभवायचा असेल त्याने पुढच्या नाट्याला प्रारंभ करावा.
सर्वप्रथम लोकांमधून उमटणार्या ’श्या’, ’चुक् चुक्’, ’शी’, ’काय हे’ असल्या प्रतिक्रीयांकडे साफ कानाडोळा करावा. मोबाईल ज्यात आहे तो सोडून इतर सर्व खिसे चाचपल्याचा/धुंडाळल्याचा अभिनय करावा.
इथे तात्कालिक परिस्थितीनुसार जीन्सच्या खिशात हात अडकून बसलाय, पाण्याची अथवा पिऊन ठेवलेल्या कोल्ड्रींकची बाटली लवंडली वगैरे variations घ्यायला लेखकाची हरकत नाही.
जवळ कॅरीबॅग असेल तर त्यात पूर्ण आतपर्यंत हात घालून वाद्यांपेक्षाही मोठा आवाज होईल अश्या रितीने ती चुरगळावी. चष्माधारी व्यक्तींनी आधी काही वेळ चष्मा काढणे, साफ करणे, पुन्हा घालून मोबाईल शोधायला लागणे असे उपचार आचरावेत.
शोधकार्य चालू असताना ’आत्ता नेमका कुणाचा फोन आला?’, ’कुठे ठेवला बरं फोन?’ असे प्रश्न पुटपुटत रहावे. एव्हाना रिंगटोनच्या गाण्याचे पहिले आवर्तन पूर्ण होऊन त्याचे पडसाद स्टेजवरही उमटायला लागलेले असतात. आता फोन सापडल्याचा आविर्भाव आणावा. त्या खिश्यातून मोबाईल काढण्यासाठी खुर्चीत अर्धवट उठून बसण्यापासून ते पाय समोरच्याच्या खुर्चीखाली लांब ताणण्यापर्यंत सर्व शक्कली लढवाव्यात. फोन बाहेर निघत असताना शक्य तेवढ्या सर्व वस्तू खाली पाडाव्यात. ती उचलण्याचे निमित्त करून उरलेली भेळ सांडावी.
आपण खाली वाकलेले असताना हॅंडसेट मात्र उंच वर धरावा जेणे करून आपली रिंगटोन समस्त प्रेक्षागृहाला व्यापून टाकेल.
आता इथून पुढचा टप्पा मात्र अगदी बेरकी साधकांसाठी आहे. मार्ग खूप खडतर आहे. पण त्यातून तरून गेल्यावर लाभणारा असुरी आनंद काही औरच आहे. प्रत्येकाने आपल्या बाय-सेपचा साईज, LIC Policyची संख्या आणि रक्कम, जवळच्या पोलिस मित्रांचे नंबर इत्यादींचे यथोचित भान राखून पुढील भाग अवलंबणे हेच इष्ट!
मोबाईल काढल्यानंतर आपण खुर्चीत स्थिर होऊन बसावे. गाणे चालूच आहे. इनकमिंग कॉलच्या बॅकलाईटमुळे तुमचा चेहरा उजळून निघालेला आहे. आता भगवंताने दिलेल्या या सुंदर चेहर्याचा यथायोग्य उपयोग करून घेण्याची नामी संधी तुम्हाला बहाल झालेली आहे.
आपण नितांत गोंधळल्याचे भाव आणावेत. मगाशी चष्मा काढलेल्यांनी इथे तो परत घालून फोनवरील नंबर वाचण्याचा निष्फळ प्रयत्न करावयाचा आहे. इतरांनी फोनवर आलेल्या नंबरकडे (अप्पा बळवंत चौकातील पुस्तक दुकानातील कर्मचारी हातातली कामे सोडून एकाच ग्राहकाकडे अगर रस्त्यावरील रहदारीकडे पहात राहतात तसे) बघत रहावे. एव्हाना तुम्ही तिथे उपस्थित असलेल्या बहुसंख्य लोकांच्या डोक्यात गेलेले असता.
इथे आपण फोन कट करून खांदे उडवत परत चित्रविचित्र आवाज करत तो फोन आत ठेवू शकतो. पण तुम्ही जर इतक्याने मन न भरलेले खंदे वीरपुरूष असाल तर आपण आता ’सामुहीक डोक्यात जाण्याच्या’ क्लायमॅक्सकडे जाऊया.. ही स्टेप प्रत्येकाने आपल्या जोखमीवर घेणे अपेक्षित आहे.
निष्णात वाचकहो, आता कॉल चक्क रिसीव्ह करावा. ’मी आत्ता एका कार्यक्रमात आहे’ हे वाक्य हळूच बोलल्याचा आव आणत पण खरं तर बॅकस्टेजपर्यंत ऐकू जाईल अश्या बेताने म्हणावे. अजून रसनिष्पत्तीसाठी ’त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यात घे रे’, ’फोल्डरला राईट क्लीक कर...दिसतंय ना ते पिवळे फोल्डर’, ’हॅल्लो...कुठे आहेस? विरारहून अंधेरीला चालला आहेस का?’ किंवा ’अहो मॅडम, तुमचे पैसे कुठे पळून जात आहेत का? कार्यक्रम संपल्यावर मी ब्रॅंचला लगेच येतो’ अशी वायफळ वाक्ये मोठ्यांदा उच्चारावीत.
लोकांची शिवीगाळ, तिरस्कारपूर्ण कटाक्ष, आरडाओरडा, शाप शांतपणे झेलावेत आणि आपण इतक्या बखुबीने इतक्या मोठ्या जनसमुदायाचं रक्त तापवलं/उसळवलं/वाया घालवलं या विकृत आनंदात रमून रहावं !!
डिसक्लेमर:
१. या प्रयोगाने चिडून जाऊन एखाद्या सहप्रवाश्याने तुमचा मोबाईल (’जिंदगी ना मिलेगी दोबारा’ मध्ये फरहान ह्रतिकचा फेकून देतो तसा) बाहेर फेकून दिल्यास लेखक जबाबदार नाही. चाणाक्ष लोकांनी अश्या वेळी कंपनीने दिलेला हॅंडसेट, अनेक वर्षे पडून असलेला जुना दणकट नोकीया किंवा सासुरवाडीच्या लोकांकडून एका दिवसाच्या वायद्यावर मागून आणलेला फोन वापरावा !!
२. हे डोक्यात जाण्याचे टेक्निक ’आयुष्यावर बोलू काही’ मध्ये चुकूनही वापरू नये. तिथे याचा प्रयोग करणे म्हणजे स्वतःच्या पायावर ’कपिल सिब्बल’ पाडून घेण्यासारखे आहे. असला वावदूकपणा करणार्या मंडळींवर ’आबोका’च्या स्टेजवरील मान्यवरांचे बारीक लक्ष असते. त्यामुळे बाजी उलटून असले चाळे करणारा गुन्हेगार त्यांच्या विनोदाचा एक भाग केंव्हा बनून जाईल हे सांगता येत नाही.
मान्यवरांकडून उडवली गेलेली खिल्ली, चुरचुरीत विनोदी पद्धतीने घेतला गेलेला समाचार आणि त्याला सहप्रेक्षकांचा मिळालेला कानठाळ्या बसवणारा प्रतिसाद यामुळे एखाद्याच्या आत्मविश्वासाला major तडे जाऊ शकतात !!
३. श्रीराम लागू, नाना पाटेकर, विक्रम गोखले, राहुल सोलापूरकर, मकरंद देशपांडे इत्यादी मंडळी भूमिका करत असलेल्या नाटक समयी हा प्रयोग करणे हे आपल्या व समाजाच्या दृष्टीने हानीकारक ठरू शकते !!
युक्ती (४) सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये गोंधळ घालणारी बालके –
वर दिलेल्या युक्ती क्रमांक ३ मध्ये जीवाला असलेल्या संभाव्य धोका टाळायचा असेल आणि तरीही ’सामूहिक डोक्यात जाण्याच्या’ भावनेचा आनंद लुटायचा असेल तर या अमोघ मार्गाला पर्याय नाही. बहुतांश मुलांमध्ये आपल्या पालकांचे गुण उपजतच आलेले असल्याने द्वाडपणा व संभावितपणा शिकवण्याचे विशेष कष्ट घ्यावे लागत नाहीत. मुलांनी कसा आणि किती गोंधळ करावा याचे काही विशेष ठोकताळे नसल्याने ती गोष्ट आपण व्रात्य अपत्यांवर सोडून द्यावी. सार्वजनिक कार्यक्रमात दंगा करणार्या मुलांचे ढोबळमानाने पुढीलप्रमाणे चार प्रमुख प्रकार पडतात -
(अ) अकलनीय शब्द अथवा सुरस आवाज काढणारे – जसे ’आव्व्व्व्व’, ’धुडुम’, ’क्वाड्ड्ड्ड्ड्ड्ड्ड’, ’बाब्य्य्य्य्य्य्य्य्या’. श्रोत्यांकडून मिळणारा हशा हे त्यांचे बलस्थान.
(आ) रडणारे/किंचाळणारे/हुंदके देणारे – या मुलांना जितके शांत करायला जावे तितके त्यांचे रडणे अधिकच वाढते असा सार्वत्रिक अनुभव आहे
(इ) खुर्च्यांच्या मध्ये, पॅसेजमध्ये, स्टेजसमोरील मोकळ्या जागेत खेळणारे – चेंडूपासून शिवणा-पाणीपर्यंत आणि कोलांट्या उड्यांपासून ते हावभावापर्यंत कोणत्याही मनोरंजक खेळात मग्न असलेले.
(ई) कार्यक्रम भर रंगात आलेला असताना थेट स्टेजवर अथवा कलाकाराच्या समोर जाऊन उभे ठाकणारे – ही सर्वात धीट आणि हाताळायला आगाऊ जमात. असे बालवीर पुढच्या क्षणाला काय करतील याचा अंदाज येऊ न शकल्याने भलेभले कलाकारही यांना वचकून असतात. मोठमोठ्यांची पत्रास न बाळगायची (आणि त्यांची फजिती करायची) सवय लागल्याने अशी मुले पुढे जाऊन अर्णब गोस्वामी, राजदीप सरदेसाई, दीपक चौरासिया, सागरीका घोश, बरखा दत्त, निखील वागळे इत्यादी नावांनी कुप्रसिद्ध होतात.
आपले मूल यापैकी कोणत्याही गटात बसत असले अथवा नसले तरी कार्यक्रमस्थळी त्यांना उधळू दिले की ते उपस्थितांच्या डोक्यात रितसर जाते ही काळ्या दगडावरची रेघ आहे.
कार्यक्रम/समारंभ रंगात आलेला आहे. श्रोते/प्रेक्षक तल्लीन झालेले आहेत. कलाकर ऐन भरात आले आहेत. वाचकहो, हीच ती वेळ आणि हाच तो क्षण ! आपल्या चिरंजीवांच्या अथवा कन्येच्या उपद्रवमूल्याचा रसरशीत आविष्कार होऊ देण्यासाठी याहून चांगली घटीका ती कोणती?
गाण्याच्या अथवा कवितेच्या कार्यक्रमात किंवा गंभीर सिनेमाच्या वेळी भोकाड पसरणार्या लहान मुलापरता ’डोक्यात जाण्याचा’ दुसरा जालीम उपाय नाही.
एकीकडे बालकांना त्यांची प्रतिभा मुक्तहस्ताने उधळण्याची मुभा देत असताना आई-बाबांनी मात्र कपाळ्यावर आठ्या किंवा ’काय करू? कसं सांभाळू? ऐकतच नाहीये’ अश्या भावना दर्शवणारे हताशतेचे भाव धारण करावेत. आतून उकळ्या फुटत असतानाही केवळ चार-दोन प्रेक्षकांच्या रागीट नजरांमुळे आपल्या मुलांना पकडायला अगर शांत करायला जाऊ नये. अगदीच आणिबाणीची परिस्थिती ओढवल्याने मुलांच्या पाठीमागे जावे लागलेच तर तो गोंधळ द्विगुणित कसा होईल हे निग्रहाने पहावे.
कितीही डोक्यात जात असलो तरी पालकत्वाच्या सहानुभूतीमुळे आपल्यावर थेट कसलीही कारवाई होणार नाही याबद्दल आपण अगदी निःशंक असावे !
(क्रमशः)
Sunday, August 7, 2011
गाणे - ’कन्या’ राशीचे
प्रास्ताविक :
कपाळाला जास्ती आठ्या घालण्याचे कारण नाही. ’कन्या’ राशीच्यांचे दुखणे ’कन्या’रासवालेच जाणे ! आज अचानक हे गाणे सुचले.... एकदम out & out ’कन्या’वान व्यक्तीचे हे स्वगत... एक कडवे सोडले तर बाकी सर्व पद नर्मविनोदी अंगाने वाचायचे आहे - वास्तवतेचे भान न सोडता !!
पटले तर ठीक नाहीतर ’कन्या’ राशीच्या व्यक्तीचा आवाज तरी असा कितीसा असणार?
तर मंडळी, वाचा, ताडून पहा, आनंद लुटा पण डाव्या मेंदूतून उठणारे तार्कीक प्रश्न नकोत :P (ही खास पुणेरी सूचना !!)
झाले उपाय, नाना विपाय, अंती एकच स्फुरले होते
मजेत होते जग हे सारे, आमचेच ग्रह फिरले होते ॥धृ॥
आम्ही गावयास गेलो
मारे ऐटीत नवी पाऊसगाणी,
ढगांचा दोष नव्हता काही
आमुच्याच खिशात खोटी नाणी,
भिजताना उगाच उद्याचे, श्रावण सगळे स्मरले होते
मजेत होते जग हे सारे, आमचेच ग्रह फिरले होते ॥१॥
आम्ही टेकायाला गेलो
त्या त्या निकट पाऊलखुणा,
भासच होते संकेत सगळे
आधारही होता चक्क उणा,
हाय ! सुटणारे टोक, मी मजपाशी धरले होते
मजेत होते जग हे सारे, आमचेच ग्रह फिरले होते ॥२॥
आम्ही द्यावयास गेलो
जगास मदतीचा हात,
आपुलकीच्याच डोळ्यांनी केला
साधून कसा अचूक घात,
बेईमानीचे रोज असे, अनेक झरे जिरले होते
मजेत होते जग हे सारे, आमचेच ग्रह फिरले होते ॥३॥
आम्ही पकडाया गेलो
फुलपाखराच्या चंद्रपंखांना,
दार त्वरीत लावून घेतले
त्यांनीही आमच्या सुखांना,
पायी सोडलेले परागकण, फक्त हाती उरले होते
मजेत होते जग हे सारे, आमचेच ग्रह फिरले होते ॥४॥
आम्ही पोहोचाया गेलो
पैलतीराला , मारूनी प्रयत्नांचे हात,
इतका शीणला जीव प्रवासी
चणे मिळूनही शिल्लक नाहीत दात !!
सकाळीचे कोरे कपडे, वाट पाहून पाहून विरले होते
मजेत होते जग हे सारे, आमचेच ग्रह फिरले होते ॥५॥
आम्ही हसाया गेलो
पाहून आनंदाचे क्षण,
दिसले नाहीत कधीच,
त्या आत लपलेले व्रण
नशिबही कुढून आत, एकदा खरेच झुरले होते
मजेत होते जग हे सारे, आमचेच ग्रह फिरले होते ॥६॥
आम्ही कराया गेलो
पुन्हा एकदा शब्दांचा खेळ,
विनोदी नच जाहली तरी
साधण्यास कवितेने वेडी वेळ,
लांब चेहर्याचे गंभीर मन, कवितेतही शिरले होते
मजेत होते जग हे सारे, आमचेच ग्रह फिरले होते ॥७॥
आणि….
शेवटी म्हणायचं काय?
तर मजेत होते जग हे सारे, आमचेच ग्रह फिरले होते !!! :P
कपाळाला जास्ती आठ्या घालण्याचे कारण नाही. ’कन्या’ राशीच्यांचे दुखणे ’कन्या’रासवालेच जाणे ! आज अचानक हे गाणे सुचले.... एकदम out & out ’कन्या’वान व्यक्तीचे हे स्वगत... एक कडवे सोडले तर बाकी सर्व पद नर्मविनोदी अंगाने वाचायचे आहे - वास्तवतेचे भान न सोडता !!
पटले तर ठीक नाहीतर ’कन्या’ राशीच्या व्यक्तीचा आवाज तरी असा कितीसा असणार?
तर मंडळी, वाचा, ताडून पहा, आनंद लुटा पण डाव्या मेंदूतून उठणारे तार्कीक प्रश्न नकोत :P (ही खास पुणेरी सूचना !!)
झाले उपाय, नाना विपाय, अंती एकच स्फुरले होते
मजेत होते जग हे सारे, आमचेच ग्रह फिरले होते ॥धृ॥
आम्ही गावयास गेलो
मारे ऐटीत नवी पाऊसगाणी,
ढगांचा दोष नव्हता काही
आमुच्याच खिशात खोटी नाणी,
भिजताना उगाच उद्याचे, श्रावण सगळे स्मरले होते
मजेत होते जग हे सारे, आमचेच ग्रह फिरले होते ॥१॥
आम्ही टेकायाला गेलो
त्या त्या निकट पाऊलखुणा,
भासच होते संकेत सगळे
आधारही होता चक्क उणा,
हाय ! सुटणारे टोक, मी मजपाशी धरले होते
मजेत होते जग हे सारे, आमचेच ग्रह फिरले होते ॥२॥
आम्ही द्यावयास गेलो
जगास मदतीचा हात,
आपुलकीच्याच डोळ्यांनी केला
साधून कसा अचूक घात,
बेईमानीचे रोज असे, अनेक झरे जिरले होते
मजेत होते जग हे सारे, आमचेच ग्रह फिरले होते ॥३॥
आम्ही पकडाया गेलो
फुलपाखराच्या चंद्रपंखांना,
दार त्वरीत लावून घेतले
त्यांनीही आमच्या सुखांना,
पायी सोडलेले परागकण, फक्त हाती उरले होते
मजेत होते जग हे सारे, आमचेच ग्रह फिरले होते ॥४॥
आम्ही पोहोचाया गेलो
पैलतीराला , मारूनी प्रयत्नांचे हात,
इतका शीणला जीव प्रवासी
चणे मिळूनही शिल्लक नाहीत दात !!
सकाळीचे कोरे कपडे, वाट पाहून पाहून विरले होते
मजेत होते जग हे सारे, आमचेच ग्रह फिरले होते ॥५॥
आम्ही हसाया गेलो
पाहून आनंदाचे क्षण,
दिसले नाहीत कधीच,
त्या आत लपलेले व्रण
नशिबही कुढून आत, एकदा खरेच झुरले होते
मजेत होते जग हे सारे, आमचेच ग्रह फिरले होते ॥६॥
आम्ही कराया गेलो
पुन्हा एकदा शब्दांचा खेळ,
विनोदी नच जाहली तरी
साधण्यास कवितेने वेडी वेळ,
लांब चेहर्याचे गंभीर मन, कवितेतही शिरले होते
मजेत होते जग हे सारे, आमचेच ग्रह फिरले होते ॥७॥
आणि….
शेवटी म्हणायचं काय?
तर मजेत होते जग हे सारे, आमचेच ग्रह फिरले होते !!! :P
Tuesday, July 26, 2011
(आणि २६ जुलै च्या निमित्ते......)
६ वर्षांपुर्वी मुंबईत आला होता तो प्रलयंकारी पाऊस.... याच दिवशी, नाही का?काही जणांच्या होत्याचं नव्हतं करणारा.... कित्येकांच्या जगण्याच्या तर्हाच बदलून टाकणारा......
या संहारक पावसाने उद्ध्वस्त झालेल्या एका स्त्रीचं हे मनोगत.... अकस्मात आलेल्या या जल-संकटाने तिचा पती हिरावून नेलाय.. काडी काडी जमवून उभा केलेला संसार मोडून टाकलाय...... कसा भासला असेल तिला हा पाऊस? वाफाळल्या कॉफी सोबत आपल्या सुरक्षित खोप्यामधून मजेत ओली गाणी ऐकताना या विचाराने हलवून टाकलं... प्रस्तुत कवितेचं साहित्यीक मूल्य फार नसलं तरी असा वेगळ्या रौद्ररूपात भेटलेला पाऊस तिच्या थिजलेल्या संवेदनांनी मांडण्याचा हा प्रयत्न ! नेहमीप्रमाणेच लाक्षणिक, संकेतार्थी वगैरे वगैरे.....
पाऊस वैरी बनून काल
माझ्या कुंपणात घुसला,
नाच नाचून त्याने
उभा संसार पुसला !
नव्हते त्याला भान
भिंती सांडून टाकताना,
आभाळाला नाही दया
काळीज असं लुटताना !
आता नाही हात पाठी
दोन चिमण्या पिलांना,
लाटा उफाळून आल्या
नेती खुडून फुलांना !
नाका तोंडात पाणी
आणि डोळ्यात ऊन खारे,
डोई कोसळत्या धारात
स्वप्न वाहिले ते सारे !
गोड हळवा पाऊस
फक्त गाण्यात राहिला,
काल गाठून त्याने
उभा संसार पुसला.....
काल गाठून त्याने
उभा संसार पुसला..... !!
Saturday, July 9, 2011
भेटी लागी जीवा
ओढ.. एक अनामिक ओढ..... याच ओढीपायी तहान-भूक, उन-वारा-पाऊस कशाचीही तमा न बाळगता लाखो वारकरी पंढरीच्या दिशेने निघालेले आहेत....एकच गूज-"संपत्ती सोहळा नावडे जीवाला । लागलासे टकळा पंढरीचा".....
महाराष्ट्राचे लोकदैवत आणि आराध्य असलेल्या श्री पांडुरंगांचे समचरण पाहण्यासाठी प्रत्येक भागवत उत्सुक झालेला... इकडे पावसाची हलकीशी सर येऊन गेलेली.... आकाशाने सुद्धा विठाईचा सावळा रंग धारण केलेला.... आज पुणे शहरात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखीचे आगमन !... एरव्ही पोटाची खळगी भरण्यासाठी जीवाचा आटापीटा करणार्या सामान्य जीवांना त्यांच्याही नकळत आज भक्तीचा हलकासा स्पर्श झालेला.... ’गणेश कला क्रीडा मंचा’च्या भव्य हॉलमध्ये पाऊल टाकताच वातावरणात दाटलेला भक्तीभाव जाणवू लागला. एरव्ही टीव्ही चॅनेलच्या शो साठी सारे कसे खोटे खोटे चेहरे घेऊन येतात... पण आज इथे थेट पंढरपूर अवतीर्ण करण्याची क्षमता असलेले कलाकार आणि निवेदक असल्याने प्रेक्षकही साजूक बनून आलेले !
"ज्ञानोबा माऊली तुकाराम" अशी साद कानावर पडताच हात जोडले जात नाहीत, अबीर बुक्क्याचा वास मनभर दरवळत नाही आणि टाळ, चिपळ्या, मृदुंगाचा नाद हृदयाला जाऊन भिडत नाही तो मराठी माणूस कसला? अश्यातच पडदा वर जातो.... भुलोकीचे वैकुंठ म्हणवल्या जाणार्या पंढरपूरचे आणि वारीमधल्या मनोज्ञ क्षणांचे दर्शन घडवणारा रंगमंच.... रंगमंच कसला? भक्तांचा दरबारच तो.....
वादकांच्या धीरगंभीर सुरूवातीनंतर नामधून सुरू होते - "जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी". समोर मांडी ठोकून बसलेल्या पाचही मान्यवरांनी केलेल्या स्वरवर्षावाचा हा धावता आलेख !
***********************
आनंद भाटे. स्व. पं. भीमसेन जोशींचे अंतरंग शिष्य!
’किराणा’ घराण्याचा वारसा पंडीतजींनी ज्यांच्या हातात मोठ्या विश्वासाने आणि प्रेमाने सुपुर्त केला ते लोकविलक्षण गायक आनंद भाटे...
अगदी लहान वयापासून निसर्गदत्त गायनी कळेला ज्यांनी तपश्चर्या मानलं ते आद्य गायक आनंद भाटे..
’बालगंधर्व’ चित्रपटाने इतिहास रचण्यापूर्वी कितीतरी आधीपासून मैफिलीच्या मैफीली आपल्या गळ्याच्या करामतीने मंत्रमुग्ध करून टाकणारे आनंद भाटे....
’इंद्रायणी काठी’ या त्यांच्या गुरूंनी अजरामर करून ठेवलेल्या पदाने आनंद भाटेंनी प्रारंभ केला. ’किराणा’ घराण्याची खासियत असलेल्या जोरकस ताना, स्वच्छ दाणेदार आवाज आणि सूरांवर कमालीची हुकुमत! राहुलबरोबर ’कानडा राजा पंढरीचा’ सादर करताना त्यांचा लागलेला आवाज तर लाजवाबचं !!
’तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ अभंगाने पार्थिव-अपार्थिवामधली रेषा जवळजवळ पुसून टाकलेली....
’जोहार मायबाप जोहार’ ही तर भाटेंची स्पेशालिटी. ’जोहार गावं तर फक्त आनंद भाटेंनीच’ अशी सांप्रत मराठी संगीत वर्तुळात एक वदंता आहे !! ’हे असं का?’ या प्रश्नाचं यथार्थ उत्तर मिळायला फारसा वेळ लागला नाही. अतिशय उत्कट भाव ओतून त्यांनी असा काही ’जोहार’ आळवला की दगडालाही पाझर फुटावा....
’अगा वैकुंठीच्या राया’ ने या सांगतेच्या भैरवीने कार्यक्रमाचा परमोच्च बिंदू गाठला गेला. पुन्हा एकदा आनंद भाटेंनी ’आनंदगंधर्व’ ही पदवी सार्थ ठरवताना संपूर्ण प्रेक्षागृहाला अक्षरशं बेभान करून सोडलं. हजारो जीवांच्या वतीने जणू ते नारायणाला साद घालत होते. सगळा आसमंत भगवंतमय करून टाकणारा त्यांच्या आवाज आजही कानात घुमतो आहे.....
***********************
’ज्ञानेश्वर मेश्राम’ म्हटले की आपल्याला थेट माऊलींची ’आळंदी’ आठवते. तिथले अनौपचारीक पण स्नेहार्द्र वागणं घेऊन आलेला हा गुणी गायक. गावच्या मातीचा गंध बेमालूमपणे गाण्यामध्ये मिसळत ज्ञानेश्वर सच्च्या दिलाने आपली गानसेवा सादर करत असतो. ’कांदा, मुळा आणि भाजी’ या मोठ्या गोड अभंगाने त्याने प्रेक्षकांना जिंकून घेतलं. ’विठू माऊली तू’ आणि ’सोनियाचा दिस आज अमृते’ या दोन गीतांनी यथायोग्य भावाची पखरण केली. ज्ञानेश्वरने खरी कमाल केली ती गुलाबराव महाराजांच्या सुप्रसिद्ध ’राधे चाल बाई चाल’ या गवळणीच्या सादरीकरणातून... महाराजांच्या प्रज्ञाचक्षूला दिसलेलं गोपाळकृष्णांचं आणि राधेचं मनोहारी दर्शन त्याच्या खटकेबाज स्वरात ऐकताना मज्जा आली.
***********************
’IBN-लोकमत’ वाहिनीने तीन वर्षांपूर्वी आषाढी वारी आणि पालखी सोहळ्याचे औचित्य साधून हा कार्यक्रम सुरू केला. पंढरीचा राणा कुणाला कमरेवर हात ठेवून उभा असलेला दिसतो, कुणाला जनीची कामे करताना दिसतो, कुणाला सावता माळ्याच्या शेतातील कांदा, मुळा आणि भाजी झालेला दिसतो तर कुणाला भक्तांबरोबर चंद्रभागेच्या वाळवंटी नाचताना दिसतो. संतांच्या शब्दांना सूरात गुंफून त्याचंच प्रातिभ दर्शन घडवण्याचं काम ’भेटी लागी जीवा’ या कार्यक्रमाने सुरू झालं. मागील दोन वर्षे आपल्या आगळ्यावेगळ्या कल्पकतेमुळे लोकप्रिय ठरलेल्या या संकीर्तनाचे हे तिसरे पुष्प....
***********************
सावनी शेंडे-साठ्ये ची ओळख जाणकार आणि विचक्षण श्रोत्यांना नव्याने करून देण्याची अजिबात गरज नाही. कसदार श्रुतींचे निधान सतत जवळ बाळगून असलेल्या सावनीचे गायन हा खरोखरच एक अनुपम्य अनुभव असतो. अंतःकरणाचा थेट वेध घेणार्या सूरांची उपजत लाभलेली दैवी देणगी, मांडणीतील रंजकता, समोरच्याला तोष होईल अश्या सहेतुक पद्धतीने केलेली पदाची बांधणी आणि गायनाला लाभलेली निरागस, प्रसन्न, सहज व्यक्तीमत्वाची झालर यामुळे सावनीच्या मैफीली या कायमच दीर्घकाळ स्मरणात राहणार्या ठरतात.
’बोलावा विठ्ठल’ या तुकाराम महाराजांच्या अभंगाद्वारे तिने ’गणेश कला क्रीडा’चे प्रांगण अगदी भारून टाकले.
संत नामदेवांच्या काही रचना या अवाक करून टाकणार्या आहेत. त्यातीलच एक ’आषाढी कार्तिकी विसरू नका मज । सांगतसे गूज पांडुरंग ॥’ हा भावस्पर्शी अभंग सावनीने कमालीच्या ताकदीने पेश केला. असं खिळवून टाकणं सावनीच करू जाणे....
कर कटीवर ठेवून अठ्ठावीस युगे उभा असलेला पांडुरंग.... भक्तांच्या पदरवाकडे मोठ्या उत्कंठेने पाहणारा पांडुरंग.... भोळा-भाबडा भाव घेऊन दारात येणा सर्वांना स्वतः सन्मुख जाऊन आलिंगन देणारा पांडुरंग.... सावनीने त्याच्या मनातले स्फूट असे काही प्रकट केले की डोळ्यात टचकन् पाणी...
हे कमी की काय म्हणून तिच्या आज्जी कुसुमताई शेंडेंनी संगीतबद्ध केलेली अप्रतिम बंदीश ’मायबापे केवळ काशी’...... सूरांच्या उद्यानात आम्हाला मोठ्या आनंदाने व भाविक हृदयाने फिरायला घेउन जाणारी सावनी स्वतः देखील ठेहरावात बुडून गेलेली ! सगळीकडे नुसता एक शुचिर्भूतपणा दाटलेला....
सावनीची भैरवी ’अवघा रंग एक जाला’ तर नखशिखांत भिजवून गेली. वाह! सोयराबाईंसारख्या लौकीकार्थाने अशिक्षीत स्त्रीने वर्णन केलेली ’पाहता पाहणे गेले दुरी । म्हणे चोखयाची महारी ॥’ अशी अवधूतावस्था.... थेट ब्रम्हभावाच्या अनुभूतीचे शब्द... त्यात घनीभूत झालेला तो सगुण,साजिरा पंढरीनाथ... आणि त्या उच्चकोटीच्या अवस्थेला अक्षरशः समोर साकार करणारे सावनीचे गायन.... ’रंगि रंगला श्रीरंग’ हे तिथं उपस्थित असणार्या प्रत्येकाचं पालुपद बनून गेलं जणू !!
***********************
मायमराठीला ’अमृतातेही पैजा जिंके’ अशी पदवी ज्ञानेश्वर महाराजांनी का बहाल केली असेल याचा मी बरेच वेळा विचार करतो. ’भेटी लागी जीवा’च्या निमित्ताने मिलिंद कुलकर्णींचं ओघवतं निवेदन ऐकायला मिळालं आणि त्या प्रश्नाचं काहीसं उत्तर दिसल्यासारखं झालं. कुलकर्णी व्यासपीठावरून बोलू लागले की शारदीय कळा जणू मूर्त रूपात येऊन त्यांच्या मुखावाटे अविरत स्त्रवू लागते. अतिशय व्यासंगी, बहुश्रुत, कलासक्त आणि साहित्योपासक असलेला हा अष्टावधानी माणूस मूळ संहितेची लज्जत नेहमीच वाढवतो.
निवेदनातील नेमकेपणा, कार्यक्रमाला सुसंगत अशी चपखल उदाहरणे, परीणामकारक पण मनावर ठसणारा स्वच्छ, मोकळा आवाज, ऐनवेळच्या विषयांवर अत्यंत हजरजबाबीपणे केलेल्या मार्मिक टिप्पण्या आणि मैफीलीची सलगता टिकवून ठेवत, नव्हे ती अधिक रंगतदार करत केलेले मुद्देसूद विवेचन ही त्यांच्या सूत्रसंचालनाची ठळक सांगता येतील अशी वैशिष्ट्ये...
एखादी कलाकुसर असलेली मोत्याची माळ तितक्याच सुंदर पण भक्कम सोन्याच्या दोराने ओवावी तसे ’भेटी लागी जीवा’ची एकसंधता मिलींदच्या रसाळ निवेदनाने पेलली होती.....
***********************
राहुल देशपांडे. बस्सं नामही काफी है ! आजकालच्या तरूण वर्गात अभिजात संगीताची आवड निर्माण करणारा गुणी गायक, हरहुन्नरी पण नम्र कलावंत. प्रचंड लोकप्रियता, कौतुक आणि एक आख्यायिका बनून राहिलेल्या आपल्या महान आजोबांचा वसा सांभाळत असतानाच त्याची गायकी रोज नवेनवे शिखर पादाक्रांत करत असते. सुरूवातीला राहुलने "आधी बीज एकले" हे ’संत तुकाराम’ चित्रपटामधील पद मोठ्या आवेशात सादर केले. केशवराव भोळ्यांनी उत्कटतेने रचलेल्या या गीताला राहुलने आपल्या बिनचूक स्वरांनी असे काही डवरले की बस्सं.... राहुलसाठी संगीतक्षेत्रामध्ये आदरणीय असणार्या अनेक कलाकारांपैकी एक म्हणजे पं. कुमार गंधर्व. त्यांनी गायलेले तुकोबारचित "लक्ष्मीवल्लभा, दीनानाथा पद्मनाभा" हे ठेक्यातले भजन घेऊन राहुलने श्रोत्यांना तल्लीन करून टाकलं. वातावरण एकदम जमून आलेलं....आणि या सर्वावर जणू कळस चढवणारं राहुल आणि
आनंद भाटेंचं ड्युएट "कानडा राजा पंढरीचा" अतोनात दादींबरोबर कार्यक्रमातील सर्वात मोठा ’वन्स मोअर’ घेउन गेलं
***********************
अमर ओक यांचा चाहतावर्ग तसा फार मोठा.... ’अमर-बन्सी’ ची भुरळ आबालवृद्धांसहीत जाणकारांनाही.... निगर्वी, विनयशील, अत्यंत प्रतिभाशाली व सृजनशील बासरीवादक असलेले अमर ओक!
’भेटी लागी’ साजरा होत असताना अमरच्या जादुई बासरीचा आविष्कार श्रोत्यांना पहावयास मिळतो. ओकांनी ’माझे माहेर पंढरी’ हे संपूर्ण पद इतर वाद्यवृंदासहीत बासरीवर वाजवले. कहर म्हणजे एखादा निष्णात गवई घेतो तश्या ताना, आलाप, खास लयकारी त्या पोकळ बांबूच्या आणि श्वासांच्या अद्वितीय मिलाफातून..... दहाच्या दहा बोटे तोंडात जावीत अश्या थराराक कलाकृतीने कार्यक्रमातील सर्वात जास्ती टाळ्या मिळवल्या नसत्या तरच नवल !!
***********************
वयाने आणि कर्तृत्वाने मोठ्या असलेल्या गायक, वादकांच्या खांद्याला खांदा लाऊन तितक्याच आत्मविश्वासाने रंगमंचावर वावरणार्या आर्या आंबेकरचे सर्वांनाच अप्रुप होते. कमालीचा गोड गळा लाभलेली ही ’लिटल चॅंप’ सूरांशी नेहमीच प्रामाणिक असते.
’पांडुरंग कांती, दिव्यतेज झळकती, रत्नकीळ फाकती, प्रभा’ असे तिने नुसते म्हटल्याबरोबर प्रत्यक्ष परब्रम्ह असलेल्या त्या कानड्या विठ्ठ्लाची आभा आमच्या अंतरंगात....
आर्याचे शब्दोच्चार, तिच्या भावमुद्रा आणि कसलीही औपचारीकता न ठेवता अभंगातल्या स्थायी पदांना थेट घातलेला हात हे विषय नेहमीप्रमाणेच लक्षवेधक होते. त्यामुळेच की काय ’रूणुझुणु रूणुझुणु रे भ्रमरा’ सारखं गूढ काव्यही सुगम बनून गेलं....
’खेळ मांडीयेला’ या वैष्णव संप्रदायाचं उत्सवी वातावरण अधोरेखित करणार्या संत तुकारामांच्या अभंगाने तर सगळीकडे एक जबरदस्त चैतन्य निर्माण केलं. पण आर्याने अस्वस्थतेचे बांध फोडून डोळे वाहते केले ते कार्यक्रमाचे शीर्षक असलेल्या ’भेटी लागी जीवा’ने......भगवंताच्या दर्शनासाठी, त्याच्या कृपेसाठी, त्याच्या समीपतेसाठी कमालीचा आतुर झालेल्या परमभक्ताचे हे आर्त.... ’तुका म्हणे मज लागलीसे भूक। धावूनि श्रीमुख दावी देवा॥’ हे असे जिव्हारी लागणारे शब्द आर्या कुठेतरी खोल जाऊन गात होती आणि ती आस, ती तडफड आपल्याही आतमध्ये चालू आहे असं जाणवून गेलं... ईश्वरव्याकुळतेचा उद्रेक करणारं ’भेटी लागी जीवा’ नंतर कितीतरी दिवस कानात घुमत राहिलं !!!!
***********************
आपण पालखीला सामोरे जातो, मंदीरांमध्ये जाऊन हात जोडतो, तीर्थक्षेत्री जातो, आपल्याला काही कळो अगर ना कळो गाण्याच्या बैठकींनाही हजेरी लावतो, आपण संगीतामध्ये काही तरी शोधायला जातो आणि बहुतेक वेळा ओंजळ न भरल्याची तक्रार करतो. ’भेटी लागी जीवा’ सारखे कार्यक्रम मात्र अनपेक्षीतपणे काहीतरी भरभरून देऊन जातात आणि मग, ’धन्य ती गायनी कळा’ या समर्थांच्या उक्तीचा प्रत्यय या निमित्ताने येऊन जातो.
त्या नंतर मिटल्या डोळ्यांसमोर रेगांळत राहते चंदनाची उटी लावलेले पंढरीनाथांचे सावळे रूप, त्याच्या नामगजरात दंग होऊन गेलेले वारकरी, दिंडीत फडकणार्या पताका, श्री विठ्ठलांच्या अंगाखांद्यावर लडीवाळपणे विहार करणारे समस्त संतवृंद आणि या सात्विक विश्वाचे जवळून मनोमय दर्शन घडवणारे आपल्या लाडक्या कलावंतांचे सूर................
***********************
टीप: सदर कार्यक्रमाचे प्रक्षेपण IBN-लोकमत वाहिनीवर आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजे सोमवार दि. ११ जुलै २०११ रोजी दिवसभर होत राहील.
महाराष्ट्राचे लोकदैवत आणि आराध्य असलेल्या श्री पांडुरंगांचे समचरण पाहण्यासाठी प्रत्येक भागवत उत्सुक झालेला... इकडे पावसाची हलकीशी सर येऊन गेलेली.... आकाशाने सुद्धा विठाईचा सावळा रंग धारण केलेला.... आज पुणे शहरात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखीचे आगमन !... एरव्ही पोटाची खळगी भरण्यासाठी जीवाचा आटापीटा करणार्या सामान्य जीवांना त्यांच्याही नकळत आज भक्तीचा हलकासा स्पर्श झालेला.... ’गणेश कला क्रीडा मंचा’च्या भव्य हॉलमध्ये पाऊल टाकताच वातावरणात दाटलेला भक्तीभाव जाणवू लागला. एरव्ही टीव्ही चॅनेलच्या शो साठी सारे कसे खोटे खोटे चेहरे घेऊन येतात... पण आज इथे थेट पंढरपूर अवतीर्ण करण्याची क्षमता असलेले कलाकार आणि निवेदक असल्याने प्रेक्षकही साजूक बनून आलेले !
"ज्ञानोबा माऊली तुकाराम" अशी साद कानावर पडताच हात जोडले जात नाहीत, अबीर बुक्क्याचा वास मनभर दरवळत नाही आणि टाळ, चिपळ्या, मृदुंगाचा नाद हृदयाला जाऊन भिडत नाही तो मराठी माणूस कसला? अश्यातच पडदा वर जातो.... भुलोकीचे वैकुंठ म्हणवल्या जाणार्या पंढरपूरचे आणि वारीमधल्या मनोज्ञ क्षणांचे दर्शन घडवणारा रंगमंच.... रंगमंच कसला? भक्तांचा दरबारच तो.....
वादकांच्या धीरगंभीर सुरूवातीनंतर नामधून सुरू होते - "जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी". समोर मांडी ठोकून बसलेल्या पाचही मान्यवरांनी केलेल्या स्वरवर्षावाचा हा धावता आलेख !
***********************
आनंद भाटे. स्व. पं. भीमसेन जोशींचे अंतरंग शिष्य!’किराणा’ घराण्याचा वारसा पंडीतजींनी ज्यांच्या हातात मोठ्या विश्वासाने आणि प्रेमाने सुपुर्त केला ते लोकविलक्षण गायक आनंद भाटे...
अगदी लहान वयापासून निसर्गदत्त गायनी कळेला ज्यांनी तपश्चर्या मानलं ते आद्य गायक आनंद भाटे..
’बालगंधर्व’ चित्रपटाने इतिहास रचण्यापूर्वी कितीतरी आधीपासून मैफिलीच्या मैफीली आपल्या गळ्याच्या करामतीने मंत्रमुग्ध करून टाकणारे आनंद भाटे....
’इंद्रायणी काठी’ या त्यांच्या गुरूंनी अजरामर करून ठेवलेल्या पदाने आनंद भाटेंनी प्रारंभ केला. ’किराणा’ घराण्याची खासियत असलेल्या जोरकस ताना, स्वच्छ दाणेदार आवाज आणि सूरांवर कमालीची हुकुमत! राहुलबरोबर ’कानडा राजा पंढरीचा’ सादर करताना त्यांचा लागलेला आवाज तर लाजवाबचं !!
’तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ अभंगाने पार्थिव-अपार्थिवामधली रेषा जवळजवळ पुसून टाकलेली....
’जोहार मायबाप जोहार’ ही तर भाटेंची स्पेशालिटी. ’जोहार गावं तर फक्त आनंद भाटेंनीच’ अशी सांप्रत मराठी संगीत वर्तुळात एक वदंता आहे !! ’हे असं का?’ या प्रश्नाचं यथार्थ उत्तर मिळायला फारसा वेळ लागला नाही. अतिशय उत्कट भाव ओतून त्यांनी असा काही ’जोहार’ आळवला की दगडालाही पाझर फुटावा....
’अगा वैकुंठीच्या राया’ ने या सांगतेच्या भैरवीने कार्यक्रमाचा परमोच्च बिंदू गाठला गेला. पुन्हा एकदा आनंद भाटेंनी ’आनंदगंधर्व’ ही पदवी सार्थ ठरवताना संपूर्ण प्रेक्षागृहाला अक्षरशं बेभान करून सोडलं. हजारो जीवांच्या वतीने जणू ते नारायणाला साद घालत होते. सगळा आसमंत भगवंतमय करून टाकणारा त्यांच्या आवाज आजही कानात घुमतो आहे.....
***********************
’ज्ञानेश्वर मेश्राम’ म्हटले की आपल्याला थेट माऊलींची ’आळंदी’ आठवते. तिथले अनौपचारीक पण स्नेहार्द्र वागणं घेऊन आलेला हा गुणी गायक. गावच्या मातीचा गंध बेमालूमपणे गाण्यामध्ये मिसळत ज्ञानेश्वर सच्च्या दिलाने आपली गानसेवा सादर करत असतो. ’कांदा, मुळा आणि भाजी’ या मोठ्या गोड अभंगाने त्याने प्रेक्षकांना जिंकून घेतलं. ’विठू माऊली तू’ आणि ’सोनियाचा दिस आज अमृते’ या दोन गीतांनी यथायोग्य भावाची पखरण केली. ज्ञानेश्वरने खरी कमाल केली ती गुलाबराव महाराजांच्या सुप्रसिद्ध ’राधे चाल बाई चाल’ या गवळणीच्या सादरीकरणातून... महाराजांच्या प्रज्ञाचक्षूला दिसलेलं गोपाळकृष्णांचं आणि राधेचं मनोहारी दर्शन त्याच्या खटकेबाज स्वरात ऐकताना मज्जा आली.
***********************
’IBN-लोकमत’ वाहिनीने तीन वर्षांपूर्वी आषाढी वारी आणि पालखी सोहळ्याचे औचित्य साधून हा कार्यक्रम सुरू केला. पंढरीचा राणा कुणाला कमरेवर हात ठेवून उभा असलेला दिसतो, कुणाला जनीची कामे करताना दिसतो, कुणाला सावता माळ्याच्या शेतातील कांदा, मुळा आणि भाजी झालेला दिसतो तर कुणाला भक्तांबरोबर चंद्रभागेच्या वाळवंटी नाचताना दिसतो. संतांच्या शब्दांना सूरात गुंफून त्याचंच प्रातिभ दर्शन घडवण्याचं काम ’भेटी लागी जीवा’ या कार्यक्रमाने सुरू झालं. मागील दोन वर्षे आपल्या आगळ्यावेगळ्या कल्पकतेमुळे लोकप्रिय ठरलेल्या या संकीर्तनाचे हे तिसरे पुष्प....
***********************
सावनी शेंडे-साठ्ये ची ओळख जाणकार आणि विचक्षण श्रोत्यांना नव्याने करून देण्याची अजिबात गरज नाही. कसदार श्रुतींचे निधान सतत जवळ बाळगून असलेल्या सावनीचे गायन हा खरोखरच एक अनुपम्य अनुभव असतो. अंतःकरणाचा थेट वेध घेणार्या सूरांची उपजत लाभलेली दैवी देणगी, मांडणीतील रंजकता, समोरच्याला तोष होईल अश्या सहेतुक पद्धतीने केलेली पदाची बांधणी आणि गायनाला लाभलेली निरागस, प्रसन्न, सहज व्यक्तीमत्वाची झालर यामुळे सावनीच्या मैफीली या कायमच दीर्घकाळ स्मरणात राहणार्या ठरतात.
’बोलावा विठ्ठल’ या तुकाराम महाराजांच्या अभंगाद्वारे तिने ’गणेश कला क्रीडा’चे प्रांगण अगदी भारून टाकले.
संत नामदेवांच्या काही रचना या अवाक करून टाकणार्या आहेत. त्यातीलच एक ’आषाढी कार्तिकी विसरू नका मज । सांगतसे गूज पांडुरंग ॥’ हा भावस्पर्शी अभंग सावनीने कमालीच्या ताकदीने पेश केला. असं खिळवून टाकणं सावनीच करू जाणे....
कर कटीवर ठेवून अठ्ठावीस युगे उभा असलेला पांडुरंग.... भक्तांच्या पदरवाकडे मोठ्या उत्कंठेने पाहणारा पांडुरंग.... भोळा-भाबडा भाव घेऊन दारात येणा सर्वांना स्वतः सन्मुख जाऊन आलिंगन देणारा पांडुरंग.... सावनीने त्याच्या मनातले स्फूट असे काही प्रकट केले की डोळ्यात टचकन् पाणी...
हे कमी की काय म्हणून तिच्या आज्जी कुसुमताई शेंडेंनी संगीतबद्ध केलेली अप्रतिम बंदीश ’मायबापे केवळ काशी’...... सूरांच्या उद्यानात आम्हाला मोठ्या आनंदाने व भाविक हृदयाने फिरायला घेउन जाणारी सावनी स्वतः देखील ठेहरावात बुडून गेलेली ! सगळीकडे नुसता एक शुचिर्भूतपणा दाटलेला....
सावनीची भैरवी ’अवघा रंग एक जाला’ तर नखशिखांत भिजवून गेली. वाह! सोयराबाईंसारख्या लौकीकार्थाने अशिक्षीत स्त्रीने वर्णन केलेली ’पाहता पाहणे गेले दुरी । म्हणे चोखयाची महारी ॥’ अशी अवधूतावस्था.... थेट ब्रम्हभावाच्या अनुभूतीचे शब्द... त्यात घनीभूत झालेला तो सगुण,साजिरा पंढरीनाथ... आणि त्या उच्चकोटीच्या अवस्थेला अक्षरशः समोर साकार करणारे सावनीचे गायन.... ’रंगि रंगला श्रीरंग’ हे तिथं उपस्थित असणार्या प्रत्येकाचं पालुपद बनून गेलं जणू !!
***********************
मायमराठीला ’अमृतातेही पैजा जिंके’ अशी पदवी ज्ञानेश्वर महाराजांनी का बहाल केली असेल याचा मी बरेच वेळा विचार करतो. ’भेटी लागी जीवा’च्या निमित्ताने मिलिंद कुलकर्णींचं ओघवतं निवेदन ऐकायला मिळालं आणि त्या प्रश्नाचं काहीसं उत्तर दिसल्यासारखं झालं. कुलकर्णी व्यासपीठावरून बोलू लागले की शारदीय कळा जणू मूर्त रूपात येऊन त्यांच्या मुखावाटे अविरत स्त्रवू लागते. अतिशय व्यासंगी, बहुश्रुत, कलासक्त आणि साहित्योपासक असलेला हा अष्टावधानी माणूस मूळ संहितेची लज्जत नेहमीच वाढवतो.निवेदनातील नेमकेपणा, कार्यक्रमाला सुसंगत अशी चपखल उदाहरणे, परीणामकारक पण मनावर ठसणारा स्वच्छ, मोकळा आवाज, ऐनवेळच्या विषयांवर अत्यंत हजरजबाबीपणे केलेल्या मार्मिक टिप्पण्या आणि मैफीलीची सलगता टिकवून ठेवत, नव्हे ती अधिक रंगतदार करत केलेले मुद्देसूद विवेचन ही त्यांच्या सूत्रसंचालनाची ठळक सांगता येतील अशी वैशिष्ट्ये...
एखादी कलाकुसर असलेली मोत्याची माळ तितक्याच सुंदर पण भक्कम सोन्याच्या दोराने ओवावी तसे ’भेटी लागी जीवा’ची एकसंधता मिलींदच्या रसाळ निवेदनाने पेलली होती.....
"ज्ञानदेव मधील प्रत्येक अक्षराचे महत्व आहे. ज्ञानोत्तम, नरोत्तम, देवोत्तम आणि वरोत्तम... वरोत्तम का? तर त्यांनी वर ही असा मागितला जो पृथ्वीतलावरचा कोणाही अन्य भूतमात्राने मागितला नसेल ’जो जे वांछिल तो ते लाहो’...म्हणून ते ज्ञानदेव !"अश्या अनेक दृष्टांतातून ’भेटी लागी जीवा’ पुढे सरकत राहतो.... संगीतसाधना, शब्दसाधना, श्रवणभक्ती एक होत जाते....काळाचं, परिस्थितीचं भान विसरून आपणही नकळत या शब्द-सूरांच्या पालखीत सामील होऊ लागतो !
***********************
राहुल देशपांडे. बस्सं नामही काफी है ! आजकालच्या तरूण वर्गात अभिजात संगीताची आवड निर्माण करणारा गुणी गायक, हरहुन्नरी पण नम्र कलावंत. प्रचंड लोकप्रियता, कौतुक आणि एक आख्यायिका बनून राहिलेल्या आपल्या महान आजोबांचा वसा सांभाळत असतानाच त्याची गायकी रोज नवेनवे शिखर पादाक्रांत करत असते. सुरूवातीला राहुलने "आधी बीज एकले" हे ’संत तुकाराम’ चित्रपटामधील पद मोठ्या आवेशात सादर केले. केशवराव भोळ्यांनी उत्कटतेने रचलेल्या या गीताला राहुलने आपल्या बिनचूक स्वरांनी असे काही डवरले की बस्सं.... राहुलसाठी संगीतक्षेत्रामध्ये आदरणीय असणार्या अनेक कलाकारांपैकी एक म्हणजे पं. कुमार गंधर्व. त्यांनी गायलेले तुकोबारचित "लक्ष्मीवल्लभा, दीनानाथा पद्मनाभा" हे ठेक्यातले भजन घेऊन राहुलने श्रोत्यांना तल्लीन करून टाकलं. वातावरण एकदम जमून आलेलं....आणि या सर्वावर जणू कळस चढवणारं राहुल आणि
आनंद भाटेंचं ड्युएट "कानडा राजा पंढरीचा" अतोनात दादींबरोबर कार्यक्रमातील सर्वात मोठा ’वन्स मोअर’ घेउन गेलं
***********************
अमर ओक यांचा चाहतावर्ग तसा फार मोठा.... ’अमर-बन्सी’ ची भुरळ आबालवृद्धांसहीत जाणकारांनाही.... निगर्वी, विनयशील, अत्यंत प्रतिभाशाली व सृजनशील बासरीवादक असलेले अमर ओक!
’भेटी लागी’ साजरा होत असताना अमरच्या जादुई बासरीचा आविष्कार श्रोत्यांना पहावयास मिळतो. ओकांनी ’माझे माहेर पंढरी’ हे संपूर्ण पद इतर वाद्यवृंदासहीत बासरीवर वाजवले. कहर म्हणजे एखादा निष्णात गवई घेतो तश्या ताना, आलाप, खास लयकारी त्या पोकळ बांबूच्या आणि श्वासांच्या अद्वितीय मिलाफातून..... दहाच्या दहा बोटे तोंडात जावीत अश्या थराराक कलाकृतीने कार्यक्रमातील सर्वात जास्ती टाळ्या मिळवल्या नसत्या तरच नवल !!
***********************
वयाने आणि कर्तृत्वाने मोठ्या असलेल्या गायक, वादकांच्या खांद्याला खांदा लाऊन तितक्याच आत्मविश्वासाने रंगमंचावर वावरणार्या आर्या आंबेकरचे सर्वांनाच अप्रुप होते. कमालीचा गोड गळा लाभलेली ही ’लिटल चॅंप’ सूरांशी नेहमीच प्रामाणिक असते.
’पांडुरंग कांती, दिव्यतेज झळकती, रत्नकीळ फाकती, प्रभा’ असे तिने नुसते म्हटल्याबरोबर प्रत्यक्ष परब्रम्ह असलेल्या त्या कानड्या विठ्ठ्लाची आभा आमच्या अंतरंगात....
आर्याचे शब्दोच्चार, तिच्या भावमुद्रा आणि कसलीही औपचारीकता न ठेवता अभंगातल्या स्थायी पदांना थेट घातलेला हात हे विषय नेहमीप्रमाणेच लक्षवेधक होते. त्यामुळेच की काय ’रूणुझुणु रूणुझुणु रे भ्रमरा’ सारखं गूढ काव्यही सुगम बनून गेलं....
’खेळ मांडीयेला’ या वैष्णव संप्रदायाचं उत्सवी वातावरण अधोरेखित करणार्या संत तुकारामांच्या अभंगाने तर सगळीकडे एक जबरदस्त चैतन्य निर्माण केलं. पण आर्याने अस्वस्थतेचे बांध फोडून डोळे वाहते केले ते कार्यक्रमाचे शीर्षक असलेल्या ’भेटी लागी जीवा’ने......भगवंताच्या दर्शनासाठी, त्याच्या कृपेसाठी, त्याच्या समीपतेसाठी कमालीचा आतुर झालेल्या परमभक्ताचे हे आर्त.... ’तुका म्हणे मज लागलीसे भूक। धावूनि श्रीमुख दावी देवा॥’ हे असे जिव्हारी लागणारे शब्द आर्या कुठेतरी खोल जाऊन गात होती आणि ती आस, ती तडफड आपल्याही आतमध्ये चालू आहे असं जाणवून गेलं... ईश्वरव्याकुळतेचा उद्रेक करणारं ’भेटी लागी जीवा’ नंतर कितीतरी दिवस कानात घुमत राहिलं !!!!
***********************
आपण पालखीला सामोरे जातो, मंदीरांमध्ये जाऊन हात जोडतो, तीर्थक्षेत्री जातो, आपल्याला काही कळो अगर ना कळो गाण्याच्या बैठकींनाही हजेरी लावतो, आपण संगीतामध्ये काही तरी शोधायला जातो आणि बहुतेक वेळा ओंजळ न भरल्याची तक्रार करतो. ’भेटी लागी जीवा’ सारखे कार्यक्रम मात्र अनपेक्षीतपणे काहीतरी भरभरून देऊन जातात आणि मग, ’धन्य ती गायनी कळा’ या समर्थांच्या उक्तीचा प्रत्यय या निमित्ताने येऊन जातो.
त्या नंतर मिटल्या डोळ्यांसमोर रेगांळत राहते चंदनाची उटी लावलेले पंढरीनाथांचे सावळे रूप, त्याच्या नामगजरात दंग होऊन गेलेले वारकरी, दिंडीत फडकणार्या पताका, श्री विठ्ठलांच्या अंगाखांद्यावर लडीवाळपणे विहार करणारे समस्त संतवृंद आणि या सात्विक विश्वाचे जवळून मनोमय दर्शन घडवणारे आपल्या लाडक्या कलावंतांचे सूर................
***********************
टीप: सदर कार्यक्रमाचे प्रक्षेपण IBN-लोकमत वाहिनीवर आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजे सोमवार दि. ११ जुलै २०११ रोजी दिवसभर होत राहील.
Labels:
Aarya Ambekar,
IBN,
आनंद भाटे,
आर्या आंबेकर,
राहुल देशपांडे,
लोकमत,
संगीत,
सावनी शेंडे
Wednesday, June 15, 2011
समईच्या शुभ्र कळ्या
***************************************************************************थोडं.......थोडं सावरून बसायला हवं........ दाद देण्याइतपत तरी हातांना जागा मिळावी........अंगावरचा काटा लपवता आला तर उत्तमच....... पण डोळ्यातल्या खार्या पाण्याचं काय? असू दे.... असू दे........
रंगमंचावर ती आली की मग सगळ्याचा विसर पडेल बहुधा....
त्या जुन्या गोष्टींमधल्या अष्टधा सम्राज्ञीसारखी ती येईल.... चेहर्यावर गोड हसू असेलच पण नजरेत एक अनामिक शोध ! मी तिला एकदा विचारलंही "काय शोधत असतेस गाणं सुरू करण्यापूर्वी? कुठे अज्ञातात हरवलेली असतेस?" .... यावर खळखळून हसून ती म्हणाली, "’सा’ शोधत असते मी ..... कुठं सापडतोय का बघत असते तो षडज्..." प्रेटी यंग गर्ल ’आर्या आंबेकर’च्या या उत्तरावर मी अवाक्!
***************************************************************************
"एकदम त्रास्स्स्स्स्स्स गायलीस......... म्हणजे ’नक्क्को ते गाणं’ असं गायलीस.... काय वेडं लागलंय का तुला?" परीक्षक अवधूत गुप्ते आर्याच्या एका जबरदस्त परफॉरमन्स नंतर तिला म्हणत होता. आम्ही माना डोलावल्या. अवधूतची उत्स्फुर्त टिप्पणी एकदम चपखल होती.
गेले सहा महिने सह्याद्रीच्या कड्याकपार्यांचं, कोकणाच्या समुद्रकिनार्याचं, विदर्भ-मराठवाड्य़ाच्या अस्सल मराठमोळ्या मातीचं, खानदेशाच्या खुमारीचं, गोव्याच्या माडबनांचं आणि जगभर पसरलेल्या प्राकृताच्या लेकरांचं हेच मत होतं. आज अवधूतच्या मुखातून जणू मराठी संगीत ऐकणारा समस्त रसिकवर्गच बोलत होता.
असं प्रचंड छळणारं गाणं ही आर्याची श्रोत्यांना घायाळ करून टाकणारी भेट !!
***************************************************************************
आज १६ जून २०११. आर्या आंबेकरचा वाढदिवस.
***************************************************************************
’जाहल्या काही चुका’ ......... आर्याने थेट वरच्या सप्तकात शिरकाव केला आणि इकडे माझी दातखीळ बसली ! गाण्यातले वेटोळे.... चालीमधल्या दुर्दम्य भिंती..... डोळे पांढरे करणार्या जागा...... ऐकताना तोंडाला फेस येण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. आर्या मात्र मिटल्या पापण्यांच्या आत सूरांना घट्ट चिकटून होती. तो विषाद, ती भूतकाळाची सल इकडे दिवाणखान्यात लोडाला टेकून ऐकणं शक्यचं नव्हतं....... उगाच घश्यातले आवंढे लपवत मी बाहेर दाटलेल्या अंधाराकडे पहात राहिलो - वेड्यासारखा !
असाच प्रपात तिने ’नवल वर्तले गे माये’ ला अनुभवायला दिलेला..... ’हास्यची विलसे ओठी, अद्भूतची जाली गोठी’ नंतर घेतलेली नखशिखांत थरारून टाकणारी तान ... त्या पाठोपाठ कुठल्याही ’ईसीजी’ मध्ये न येणारी हृदयाची स्वैर स्पंदनं ..... मी परत अवाक् !
***************************************************************************
स्थळ: अकलूज, जि. सोलापूर.
दहा ते बारा हजार श्रोत्यांनी खच्चून भरलेलं एका प्रथितयश शाळेचे पटांगण.
वेळ: विवीधरंगी दिव्यांच्या प्रकाशात लख्ख उजळून निघालेली संध्याकाळ.
औचित्य: पंचरत्न स्टेज शो.
हस्त नक्षत्राचा पाऊस पडावा तशी एका पाठोपाठ एक धुंवाधार गाणी सादर होत होती. प्रथमेश, मुग्धा, कार्तिकी, आर्या आणि रोहीत विलक्षण फॉर्ममध्ये होते. समोरून कानठळ्या बसवणारा प्रतिसाद !!
पुढची पेशकश घेऊन निळ्या मोहक ड्रेसमधे सजलेली आर्या रंगमंचावर आली. प्रेक्षकांमधून घणाघाती टाळ्यांची मानवंदना. म्युझिक सुरू.....
संपूर्ण कार्यक्रमाचा नूरच पालटून टाकेल अश्या खट्याळ आवाजातलं आर्याचं गीत - "जा जा जा रे.. नको बोलू जा ना......जा जा मीही भिते काय कोणा?"...... आसमंत मंत्रमुग्ध.... जादूची कांडी फिरवल्यासारखा !
"जोरा तुझा का रे पुन्हा......सांग ना....?" ......चेहर्यावर उमटवलेला प्रश्न ... कसलेल्या अभिनेत्रीसारखी भावमुद्रा........ मी ठार अवाक् !
***************************************************************************
’पंचरत्न’ पासून ते ’पोएट बोरकर स्पीकींग’ पर्यंत आपल्या वैविध्यपुर्ण कलेने सर्वांची मने जिंकून घेणार्या, ’अनामवीरा’पासून ते ’मला म्हणतात हो म्हणतात पुण्याची मैना’ पर्यंत आपल्या लक्षवेधक गायकीने अमीट ठसा उमटवणार्या, कधी गाल फुगवून गुरंफटून बसणार्या तर कधी मधाळ स्मिताने वातावरण प्रसन्न करून टाकणार्या, संगीतावर जीवापाड प्रेम करणार्या आणि त्यासाठी कितीही कष्टाची तयारी असणार्या आर्या आंबेकरचा आज वाढदिवस !
सारेगम लिटल चॅंपस ने कित्येकांची जीवनं पालटून गेली. ’न भूतो न भविष्यती’ असे अनेक चमत्कार या मुलांनी घडवले. त्याचं मांदीयाळी मधीलच एक - शांत तेवणार्या पण तेजस्वी समईच्या कळ्यांसारखी आर्या !
ओतप्रोत भरलेल्या शालीनतेला पुणेरी दिमाखाची जोड देणारी आर्या !
आवाजातील अशक्य गोडव्यानं भावगीताच्या स्वप्नाळू विश्वाला अजूनच हळवे बनवणारी आर्या !
'सहज सख्या एकटाच’, ’गगन सदन’, ’अवघा रंग एक जाला’, ’गर्द निळा गगनझुला’, ’पान खाये सैंया’, ’सरीवर सरी आल्या गं’, ’मी अशी एकटी, ’बालगंधर्व-बंदीश’, ’ये जवळी घे जवळी’, ’सखी गं मुरली मोहन’ अश्या कितीतरी गीतांमधून आपल्या मनामनात जाऊन बसलेली आर्या !
***************************************************************************
२००९ मध्ये पुण्यात शनिवारवाड्यावर ’लिटल चॅंपस्’चा एक शो झाला होता. तुडुंब गर्दीबरोबर सांगितीक बेहोशी शेकडो प्रेक्षक अनुभवत होते. आर्या तिचे शेवटचे गाणे सादर करण्यासाठी रंगमंचावर आली. वादक वाद्ये जुळवण्यात मग्न होते. या छोट्याश्या पॉजमध्ये प्रेक्षकातून एकजण जीव खाऊन ओरडला - "आर्याsssssssssssss.....छमछम"... आर्याने आपली भिरभिरती नजर एका क्षणासाठी रोखली. अतिशय निरागस चेहर्याने पण खूप गोड हसून तिने होकारार्थी मान डोलावली...... जणू या गाण्याची फर्माईश येणार हे तिने आधीच जाणलं होतं.........
तिचा बालसुलभ उत्साह, तिचे लकाकणारे डोळे, तिच्या मनात दाटून आलेला आनंद....मी अवाक् !
हीच तिची निरागसता, हाच तिचा चांगुलपणा, हीच तिची प्रसन्नता टिकून रहावी.... यशाच्या, कीर्तीच्या, सन्मानाच्या शिड्या चढत असताना तिने असाच परमतोष आपल्या गाण्यातून आम्हाला देत रहावा..... आणि सात्विकतेचे कोंदण लाभलेल्या या समईचा प्रकाश दशदिशा फाकून उरावा.... माझ्यातर्फे तिला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा !!!
***************************************************************************
(Aarya Birthday Special: "सरीवर सरी आल्या गं" from Album "आठवा स्वर". Click below player to listen !)
Labels:
Aarya Ambekar,
आर्या आंबेकर,
ललित,
संगीत
Tuesday, June 7, 2011
’ते’, ’हे’ आणि ’मी’
’त्यांचं’ असं म्हणणं आहे
की आता जास्ती ताणू नये मी,
गोष्टींचा करावा शेवट – श्रावणातल्या शुचिर्भूत कहाणीसारखा !
मी म्हणतो – होय करेन की....
आधी कळू तर देत मला कथेचा पूर्वार्ध !!
’ह्यांचं’ असं म्हणणं आहे
उगाच नरडे फाकण्यात अर्थ नसतो
जेंव्हा तुम्हालाच नसतो गंध, तुमच्या षडजाचा !
मी म्हणतो – मांडू द्यात हो मला
जशी मला उमगलीये तशी माझी कविता !!
’त्यांचं’ असं म्हणणं आहे
की फार एकटं एकटं फिरू नये आता मी,
सुख, समाधान, संस्कृती, प्रजा, आनंद, भक्ती
सगळं कसं द्विगुणित व्ह्यायला हवं !
मी म्हणतो – पायवाटांची सलगी
मला जास्ती बरी वाटते हो – खोट्या साथीदारांपेक्षा !!
’ह्यांचं’ असं म्हणणं आहे
झाड झाडाला वाढवते हे तरं खरंय,
पण अंगभर काटे घेऊन जन्माला आलात तुम्ही
आता ’शरद’ आणि ’वसंता’चं अप्रुप कशाला?
मी म्हणतो – ओबडधोबड खरा
पण निवडुंगही कधीतरी हिरवा असतो बरं !!
’त्यांचं’ असं म्हणणं आहे
की पंगस्त पायांनी शर्यतीत भाग घेऊ नये मी,
कडेला उभे राहून टाळ्या पिटणार्यांच्या
ताज्या, प्रच्छन्न विनोदाचा विषय होऊ नये मी !
मी म्हणतो – इथे जिंकायचंय कुणाला?
फक्त शर्यत पूर्ण करण्यातच मानावी सार्थकता !!
’ह्यांचं’ असं म्हणणं आहे
कुवतीनुसार स्वप्ने विणावीत एखाद्याने,
माणसाने कसं नेमस्त चालावं, बोलावं, वागावं
तीन तासाच्या सुखपटातील नायकासारखं !
मी म्हणतो – नकाशे आणि तक्ते खुप झाले
घेऊ द्या की कधीतरी मला वेडी रान-उडी !!
’त्यांचं’ असं म्हणणं आहे
की शब्दांचे खेळ आता बंद करावेत मी
आणि शोधायला लागावं एक भरभक्कम, फसवा मुखवटा,
पांढरं निशाण फडकवण्याची वेळ जवळ येते आहे !
मी म्हणतो – हात कायमचेच आहेत जोडलेले माझे
समोरची मूर्ती बदलत जाते प्रत्येक वेळी !!
...
’ह्यांचं’ ’असं असं’ म्हणणं आहे आणि ’त्यांचं’ ’तसं तसं’
मी ’ह्यांचं’ही ऐकतो आणि ’त्यांचं’ही ऐकतो
आणि बांधत बसतो आडाखे माझ्या जुन्या मनाशी,
त्याला पक्कं ठाऊक असावं बहुधा -
’ह्यांचं’ म्हणणं, ’त्यांचं’ म्हणणं आणि उरलेलं ’माझं’ म्हणणं !!
की आता जास्ती ताणू नये मी,
गोष्टींचा करावा शेवट – श्रावणातल्या शुचिर्भूत कहाणीसारखा !
मी म्हणतो – होय करेन की....
आधी कळू तर देत मला कथेचा पूर्वार्ध !!
’ह्यांचं’ असं म्हणणं आहे
उगाच नरडे फाकण्यात अर्थ नसतो
जेंव्हा तुम्हालाच नसतो गंध, तुमच्या षडजाचा !
मी म्हणतो – मांडू द्यात हो मला
जशी मला उमगलीये तशी माझी कविता !!
’त्यांचं’ असं म्हणणं आहे
की फार एकटं एकटं फिरू नये आता मी,
सुख, समाधान, संस्कृती, प्रजा, आनंद, भक्ती
सगळं कसं द्विगुणित व्ह्यायला हवं !
मी म्हणतो – पायवाटांची सलगी
मला जास्ती बरी वाटते हो – खोट्या साथीदारांपेक्षा !!
’ह्यांचं’ असं म्हणणं आहे
झाड झाडाला वाढवते हे तरं खरंय,
पण अंगभर काटे घेऊन जन्माला आलात तुम्ही
आता ’शरद’ आणि ’वसंता’चं अप्रुप कशाला?
मी म्हणतो – ओबडधोबड खरा
पण निवडुंगही कधीतरी हिरवा असतो बरं !!
’त्यांचं’ असं म्हणणं आहे
की पंगस्त पायांनी शर्यतीत भाग घेऊ नये मी,
कडेला उभे राहून टाळ्या पिटणार्यांच्या
ताज्या, प्रच्छन्न विनोदाचा विषय होऊ नये मी !
मी म्हणतो – इथे जिंकायचंय कुणाला?
फक्त शर्यत पूर्ण करण्यातच मानावी सार्थकता !!
’ह्यांचं’ असं म्हणणं आहे
कुवतीनुसार स्वप्ने विणावीत एखाद्याने,
माणसाने कसं नेमस्त चालावं, बोलावं, वागावं
तीन तासाच्या सुखपटातील नायकासारखं !
मी म्हणतो – नकाशे आणि तक्ते खुप झाले
घेऊ द्या की कधीतरी मला वेडी रान-उडी !!
’त्यांचं’ असं म्हणणं आहे
की शब्दांचे खेळ आता बंद करावेत मी
आणि शोधायला लागावं एक भरभक्कम, फसवा मुखवटा,
पांढरं निशाण फडकवण्याची वेळ जवळ येते आहे !
मी म्हणतो – हात कायमचेच आहेत जोडलेले माझे
समोरची मूर्ती बदलत जाते प्रत्येक वेळी !!
...
’ह्यांचं’ ’असं असं’ म्हणणं आहे आणि ’त्यांचं’ ’तसं तसं’
मी ’ह्यांचं’ही ऐकतो आणि ’त्यांचं’ही ऐकतो
आणि बांधत बसतो आडाखे माझ्या जुन्या मनाशी,
त्याला पक्कं ठाऊक असावं बहुधा -
’ह्यांचं’ म्हणणं, ’त्यांचं’ म्हणणं आणि उरलेलं ’माझं’ म्हणणं !!
Tuesday, May 24, 2011
कुछ मीठा हो जाये !
(पूर्वप्रसिद्धी - सकाळ ’तनिष्का’ मे-२०११)
ज्याप्रमाणे मैफिलीची सांगता भैरवीने होते, क्रिकेट विश्वचषकाचा शेवट षटकाराने होतो, रंगलेल्या कार्यक्रमाची सांगता पसायदानाने होते, नोकरीचा शेवट निरोपसमारंभाने होतो आणि जीवनाचा शेवट मृत्यूने होतो त्याच धर्तीवर मेजवानीच्या अंती एखाद्या पक्वान्नाचं असणं हे ठरलेलंच!! जेवणातले गोडधोड ही एक अटळ बाब म्हणून एव्हाना आपण स्वीकारलेली आहे. गोड पदार्थ अगर मिष्टान्न हा फक्त भारतीयच नव्हे तर जागतिक उदरभरणाचा परमोच्च बिंदू आहे. मूळ भोजन काहीही असो त्याची यशस्वी पूर्ती होण्यामध्ये या पक्वान्नांचा सिंहाचा वाटा असतो. असा भुकेल्यांच्या वाट्याला आलेला क्षण मधुर करून टाकणार्या बिनीच्या शिलेदारांपैकी काही निवडक मंडळींची ही थोडक्यात ओळख !
पुरणपोळी – काही काही पदार्थ हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग होऊन गेलेले असतात. बहुतेक प्रमुख सणांना अनिवार्य असलेली पुरणपोळी ही अशीच अखिल मराठी मुकादमखान्यात नियमितपणे आढळणारी वस्तू!
गूळ, डाळ आणि नेहमीच्या वापरातली कणिक अश्या सुगम वस्तूंना हाताशी धरून केला जाणारा हा पदार्थ मग थेट भल्या भल्या पक्वानांना आव्हान द्यायला निघतो. गाभ्यामध्ये भरलेल्या कमीअधिक गोड पुरणाला घट्ट कवटाळून वर मऊसुत पदर फडकवणारी पुरणपोळी सणाचा ’फील’ लगेच देऊन जाते.
गरमागरम पुरणपोळीला तुपाने आकंठ भिजवून त्याचा पहिला पिष्ठमय घास मुखात टाकताना होणारं सुख निव्वळ अवर्णनीय असतं. चवीला अतिशय चांगला असणारा हा पदार्थ करायला मात्र तितकाच अवघड आहे असे म्हणतात. जाणकारांनी अधिक खुलासा करावा! विशेषतः ’पुरण वाटणे’ या प्रक्रीयेला अनेक वर्षांपासून एक वेगळंच वलय प्राप्त झालं आहे. कधीही फसण्याची शक्यता असलेले पुरणाचे तंत्र जिला सांभाळता येते, तिचा घरामध्ये तातडीने ’सुगरण’ या उपाधीने सन्मान होतो. आजकालच्या यंत्राच्या आणि तंत्राच्या युगातही मन लावून, कष्टाने भरघोस पुरण वाटणार्यास गृहिणी पाहिल्या की आपली संस्कृती टिकून राहिली आहे याची मनोमन खात्री पटते.
पुरणपोळीची साथसंगत कोणी करावी हा वैयक्तिक आवडीनिवडीचा विषय आहे. दूध आणि कटाची आमटी हे पुरणपोळीचे पारंपारिक साथीदार. तुपात सचैल भिजलेली पोळी दूधात बुडवून खाताना स्वर्गीय सुख होतेच पण तिला आंबूस, तिखट अश्या कटाच्या आमटीची जोड लाभली की भोजनार्थीला एक वेगळीच रूचकर चव चाखण्याचे भाग्य लाभते. मराठवाड्यातील अथवा विदर्भातील काही काही मंडळी पुरणपोळी आमरसा बरोबर खाण्याचा प्रयोग करतात. पण हे म्हणजे किशोरी आमोणकर आणि लता मंगेशकर यांची संयुक्त मैफील ठेवण्यासारखे आहे. आपापल्या जागी दोन्हीही महान असले तरी आमरस हा आमरसाच्या बेहोशीत खावा व पुरणपोळी ही तिचा मान ठेवून साग्रसंगीत खावी हेच उत्तम.
येणार्या प्रत्येक सणागणिक पुरणपोळीची वेगवेगळी रूपे पहावयास मिळतात. श्रावणातली पुरणपोळी ही नाकातली नथ सांभाळत, शालीनतेची वस्त्रे लेवून आलेल्या घरंदाज कुलवधूसारखी भासते. खरं तर सगळा श्रावणंच एक पावित्र्याचा गजर करत येतो. त्याच दैवी आसमंतात, किंचीतश्या कुंद पावसाळी हवेत खरपूस, गरमागरम अश्या पुरणपोळ्या कुरोड्या-पापड्यांसह ताटात पडायला लागल्या की श्रावणातला घननिळा अंतःकरण व्यापायला सुरूवात करतो. पोळ्याची पुरणपोळी म्हणजे श्रमिकांच्या कष्टाने शिंपलेला प्रसाद वाटतो. लग्नाआधीच्या विधींमध्ये वाढल्या जाणार्या गुळचट पुरणपोळीमध्ये मंगलकार्य आणि मंगलकार्यामधील केटरींगवाला या दोहोंचीही टीपीकल खूण उमटलेली असते. श्राद्धपक्षात काही घरांमध्ये केल्या जाणार्या पुरणपोळ्या या अक्षरशः कर्तव्यकर्म उरकून टाकल्यासारख्या थोडक्यात आटोपलेल्या असतात. धकाधकीच्या जगातली पूर्वजांविषयीची ही अनास्था मग ताटात वाढलेल्या पोळीला गोड लागू देत नाही.
बाकी पुरणपोळीचा खरा मान आणि यथोचित सन्मान होतो तो होळीच्या दिवशी! या सणाला पुरणपोळीचा बेत जो काही जमून येतो त्याची सर कोणत्याही दिवसाला येणे नाही. यादिवशी पुरणपोळीला केंद्रस्थानी ठेवूनच जेवणाची रचना केलेली असते. ’होळी रे होळी, पुरणाची पोळी’ या हाकाळीबरोबर आपापल्या घरी केलेली पुरणपोळी मोठ्या आवडीने खाल्ली जाते आणि असे भुरके मारत तव्यावरच्या ऊन-ऊन पोळ्या खाणार्या कुटुंबियांना बघून हाडाच्या गृहलक्ष्मीला परम तोष प्राप्त होतो.
बासुंदी – दूधाचं दूधपण जाऊन त्याची माया घट्ट होऊ लागली की त्याला ’बासुंदी’ म्हणावं. बासुंदी हा जीभेसकट मनाला तोषवणारा एक असाधारण प्रकार आहे. सर्वसामान्यतः एखादी गोष्ट आटू लागली की आपल्याला दुःख होतं. पण इथे मात्र बासुंदीला फुटलेल्या प्रत्येक उकळीगणिक करणार्याचा उत्साह हा वाढताना दिसतो. बासुंदी हा खर्या अर्थाने राजेशाही पदार्थ. काही काही गोष्टी ठरवल्या तरी कुरूप बनू शकत नाहीत. त्या पद्धतीने गरीबाघरची काटकसरीची किंवा गर्भश्रीमंत्याच्या पाकखान्यातील सोनेरी पात्रांमध्ये वास्तव्याला असलेली बासुंदी ही चवीला लाजवाबच असते. तपमान आणि बाह्य भेसळीची नेटकी काळजी घेतली की तयार होणारी बासुंदी ही ’वाहवा’ मिळवूनच जाते.
बासुंदी चमच्याने खाणारे नेमस्त लोक मला पहावत नाहीत. डायबेटीस, शुगर, कोलेस्टेरॉल, बीपी, पित्त अश्या मानवविरोधी असंख्य शत्रूंमुळे काही काही जणांवर ही वेळ येते. पण इतरांनी मात्र बासुंदी हा ’खाण्याची’ नसून ’पिण्याची’ वस्तू आहे याच आविर्भावात घोट घ्यावेत. तोंडात मावेनाशी होऊन ओष्ठद्वयावरून ओघळणार्या सुमधुर थेंबांखेरीज जगात मनोहर अजून काही नाही याची प्रचिती आपल्याला निकराच्या बासुंदीप्राशनाने येते.
बासुंदीचा आग्रह हा साधारणपणे खाणार्याच्या डोळ्यांच्या फटीच्या घटत्या आकारमानानुसार करावा. बासुंदीचा जोर वाढत चाललेला असतो. जायफळ, वेलदोडे आणि इतर सुक्या मेव्याचे तुकडे अल्पावधीतल आपले काम दाखवायला लागलेले असतात. प्रत्येक घासागणिक पोट, जीभ, मन आणि मेंदू यांचा तीव्र झगडा चालू झालेला असतो. सुस्तीच्या सुनामी येऊन आदळू लागलेल्या असतात. त्याचा योग्य तो अंदाज घेऊन वाढप्याने पुढची वाटी भरावी असा पूर्वापार चालत आलेला संकेत आहे. पट्टीचे खाणारे मात्र कसलेल्या अभिनेत्याप्रमाणे आपल्या गुंगीच्या खुणा लपवून ठेवत शक्य तेवढी बासुंदी आपल्या कंठात रिती करतात.
सांप्रत काळात, ’रबडी’ आणि ’रसमलाई’ या बासुंदीच्या दोन भगिनींचं प्रस्थ वाढलेलं दिसतं. दूधाला थोडं कमी आटवून त्यामध्ये गोळे सोडले की रस मलाई आणि त्यामध्ये इतर घटकांचं मिश्रण केलं की रबडी तयार होते. हे दोन्हीही पदार्थ एखाद्या स्वागतसमारंभात अगर सार्वजनिक कार्यक्रमात ठीक वाटतात पण घरगुती मिष्टान्नासाठी पारंपारीक बासुंदीला तोड नाही. बासुंदीमध्ये पेढे कुस्करून घालण्याची प्रथा अजूनही काही रसिक लोकांमध्ये टिकून आहे. क्वचित केंव्हा केंव्हा केशराच्या काड्या आणि मुबलक चारोळ्या घातलेली बासुंदीही आपल्या पुढ्यात येते.
बासुंदी थंड खावी की गरम याविषयी अनेक मतमतांतरे आहेत. फ्रीजमध्ये पुरेशी थंड केलेली बासुंदी जीभेपासून जठरापर्यंत सर्व अवयवांना गोड गारवा देत जाते. त्यातील घनवटपणा द्विगुणित झाल्याचा अनुभव बर्याच मंडळींनी वर्णिला आहे. काही खवैयांच्या मते मात्र उकळी फुटलेली गरमागरम बासुंदी हीच खरी संतोषजनक पाककृती आहे. कुठल्याही पद्धतीने असो, बासुंदी ही खाणार्याला जालीम समाधान देऊन जाते हे मात्र खरं !
श्रीखंड – श्रीमंताघरी जन्माला आलेलं, एखादं चांगल्या नशिबाचं गुटगुटीत लेकरू असावं तसा श्रीखंड हा सर्वकाळी आपल्या मिजासीत वावरणारा पदार्थ आहे. कुंडलीत राजयोग घेऊनच श्रीखंडाने आपल्या भोजनाच्या प्रांतात पाऊल टाकलं असावं! चक्का, साखर आणि दिमतीला जुजबी इतर
पदार्थ इतकीच सामुग्री असूनही पूर्णत्वाला गेल्यावर श्रीखंडाचा दिमाख असा काही वाढतो की इतरांना त्याचा तद्दन हेवा वाटावा!! घट्ट अश्या या दूग्धजन्य कृतीचा पहिलाच घास मिष्टान्नाची सर्वंकष खुमारी देऊन जातो. पुरी अथवा पोळी, वाटी अथवा डिश, घरगुती अथवा दुकानातील ब्रॅंडेड वेष्टन - कोणत्याही विकल्पामध्ये श्रीखंडाचा तोरा तसूभरही ढळत नाही. आधी डोळ्यांना व नाकाला पुरेश्या सुखोर्मी देऊन झाल्यावर मुखात घास घेतल्या क्षणापासून श्रीखंड जीभेशी लडीवाळ करू लागतं. जिव्हेच्या सर्व पेशींना हवेहवेसे लाडीक, मृदू स्पर्श करून होईस्तोवर त्या गोळ्याचं अवतारकार्य संपून देखील जातं. मग नादावलेल्या मनाने पुढचा घास घेणं, तो काही काळ तसाच तोंडात घोळत राहणं आणि मग अन्ननलिकेच्या अस्तरांना दुलईदारपणे खेटत खेटत त्याने इप्सित स्थळी पोहोचणं ही क्रिया बराच काळ चालू राहते. श्रीखंडग्रहणातलं सर्वोच्च शिखर गाठलं जातं ते पात्रातील श्रीखंड संपत आल्यावर! अंगठा वगळता हाताच्या कोणत्याही एका किंवा एकापेक्षा अधिक बोटांचा वापर करून उर्वरीत श्रीखंड चाटण्याची लज्जत काही न्यारीचं. चमच्यात अथवा पुरीमध्ये न सापडणारे अवशेष बोटांनी कब्जामध्ये घेऊन भांडे स्वच्छ, लख्ख केले की श्रीखंडपुराणाची इतिश्री होते.
आम्रखंड हा श्रीखंडाचा मोठा सौंदर्यवान उपप्रकार आपल्याकडे आढळतो. हापूस किंवा तत्सम उच्च प्रजातीच्या आंब्याचा गर अथवा रस घातला की एरव्ही उद्धट वाटणारी श्रीखंडाची श्रीमंत कांती एक हवेहवेसे रूपलावण्य धारण करते. आम्रखंड ही पाहताक्षणी प्रेमात पाडणारी पाककृती. केशरी रंगात न्हाऊन निघालेले, आंब्याच्या फोडींचे केंद्रशासित अस्तित्व विनातक्रार मान्य करणारे अन् अक्षयतृतीयेपासून ते लग्नाच्या रिसेप्शन पर्यंत सर्व ठिकाणी लक्षवेधक पद्धतीने मिरवणारे घट्ट आम्रखंड त्याच्या आठवणी कितीतरी काळ रेंगाळवत ठेवते.
जिलेबी – वळणं-वळणं घेत जाणार्या सगळ्याच गोष्टींचं मानवाला एक आदिम आकर्षण असतं. अनामिक वर्तुळांचा वेध घेत जाण्यात त्याचे आयुष्य जणू खर्ची पडते. पाकामध्ये बेमालूम मुरलेली, अनेक वेटोळ्यांनी स्वतःमध्ये गुरफटून बसलेली, एकाचवेळी कुरकुरीत आणि रसरशीत या दोन्ही लक्षणांनी युक्त अशी पिवळीधमक जिलेबी म्हणजे ताटाची शोभा कैकपटीने वाढवणारे प्रकरण आहे. जिलेबीची (प्राकृतातील उच्चार “जिलबी”) जाडी, आकार, विस्तार आणि वेटोळ्यांची संख्या ही जिलेबी तयार करणार्या व्यक्तीच्या सृजनशीलतेनुसार बदलत जाते. आपली कलाकुसर दाखवायला बल्लवाचार्यांना यापेक्षा मोठी संधी कुठेच मिळत नसावी. विशेषतः जिलेबीच्या सर्वात बाहेरच्या तिढ्याला सर्वात आतल्या आरंभबिंदूशी जोडण्यासाठी खानसामे जी काही कुशलता दाखवतात त्याने एखादा पट्टीच्या कलाकारालाही थक्क व्हायला होतं. मेंदीच्या कोनाची कल्पना जिलेबी तयार करण्याच्या रोमहर्षक कृतीकडे पाहून सुचली असावी असा अस्मादिकांना दाट संशय आहे.
कढईमध्ये जिलेबी उकळण्याचा कालावधी हा त्याच्या अंतिम गुणदोषांसाठी जबाबदार असा अत्यंत महत्वाचा घटक. कमी अथवा जास्त तळलेली जिलेबी मेजवानीचा इस्कोट करायला पुरेशी असते. त्यामुळे जिलेबी तयार करणार्याच्या मनाची एकाग्रता ही कायम कढई, कढईतील तूप अथवा पाक आणि त्या संयंत्राला मिळत असलेली आच यांच्याकडे एकवटलेली दिसते.
जिलेबी आणि विवाहभोजन यांचं एक अतूट नातं ठरून गेलेलं आहे. लग्नात मिरवणारी पिवळीधमक जिलबी मला नववधूच्या हरखून जाण्याचं आणि अंतरी फुललेल्या आमोदाचं प्रतिक वाटते. परातीमधून अगर मोठाल्या ताटांमधून केला जाणारा जिलेबीचा बेसुमार आग्रह हा अगदीच न टाळता येणारा प्रसंग असतो. ’एक जिलेबी’ असं परीमाण खरं तर आपल्याकडे अस्तित्वात नाही. हरीणाचे कळप, गुंडांच्या टोळ्या, अभिनंदनाचा वर्षाव किंवा प्रेक्षकांचे जथे असतात त्या प्रमाणे जिलेबी ही कायम दोन किंवा त्याच्या पटीमध्ये खाण्याची वस्तू मानली जाते. सुरूवातीच्या काही जिलेब्या तर फक्त माधुर्याची पार्श्वभूमी तयार करण्यासाठी खाल्ल्या जातात. बाकी जिलेबीचा खरा अंमल हा आग्रहाने वाढलेल्या अतिरीक्त जिलेब्यांनीच सुरू होतो.
वर्षानुवर्षे जिलेबीची इमान-इतबारे साथ करणारा तिचा सोयरासांगाती म्हणजे मठ्ठा. अत्यंत विपरीत गुणधर्म असलेले हे दोन्ही पदार्थ एकत्र आल्यावर मात्र जबरदस्त धमाल उडवतात. मठ्ठा-जिलेबी खाण्यासाठी उठसूट कोणत्याही लग्नाला जाणारे कित्येक जिलेबीप्रेमी मला माहित आहेत. पैजा लावून जिलेबी खाणारे लोक हे तिच्या गोडीच्या प्रेमात कधीच नसतात. अश्या लोकांना चवीच्या पद्यापेक्षा अंकगणिताच्या गद्यामध्ये जास्ती रस असतो. त्यापेक्षा अर्धशिशीवर उपचार म्हणून प्रातःकाळी उठल्या उठल्या, तोंडही न धुता जिलेबी खाणारे पामर हेच तिचे खरे उपासक !!
जिलेबीमध्ये रंग टाकून तिला केशरी बनवणे किंवा तिची जाडी वाढवून ’इमरती’ नावाचा विचित्र पदार्थ तयार करणे यातून फार काही साध्य होते असे मला वाटत नाही. हे म्हणजे मूळच्या गोर्यापान, सुंदर मुलीने उगाच टॅल्कम पावडर लावून अगर विसंगत रंगाचा मेक-अप करून बाहेर पडण्यासारखे आहे. चमचमत्या पिवळ्या रंगाने नटलेली आणि आतबाहेर पाकाच्या ओलाव्याने नितळ झालेली जिलेबी हेच तिचे लाखो लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेले साजिरे रूप....
खीर – पक्वान्नात वैविध्य आणायचं असेल तर ’खीर’ या लवचिक पदार्थाला पर्याय नाही. हव्या त्या मिश्रणात, हव्या त्या रूपात, हव्या त्या चवीत व हव्या त्या प्रमाणात पेश होणारी ’खीर’ म्हणजे अडीअडचणीला धावून येणारा देवदूत आहे. बहुतेक वेळा दूधाच्या समर्थ नेतृत्वाखाली कसलीही कुरबुर न करता सर्व घटकांनी आपापले योगदान दिले की ’खीर’ तयार होते. गरजेनुसार खीरीचे असंख्य अवतार स्वयंपाकघरात आणि तिथून थेट ताटामध्ये आविर्भूत होतात. शेवयाची खीर म्हणजे श्रीमंतांच्या रसमलाई अगर तत्सम भपक्याला गरीबांच्या अन्नपूर्णेने दिलेलं चोख उत्तर आहे. गव्हाची खीर उगाचच दंडातल्या बेटकुळ्या वर्धिष्णु झाल्याचा गोड गैरसमज करून देते. याचेच शहरी रूप असलेली दलियाची खीर आपला आटोपशीर व्यवहार नेमकेपणाने उरकत इतरांशी लगट टाळते. साबुदाण्याची खीर उपवासाचे महात्म्य पटवून देत असतानाच चेहरा स्थिर ठेवण्याची कला शिकवते. नाचणीची खीर नाडी तपासणार्या वैद्यासारखी गंभीरपणे काम करते. केरळी अथवा दाक्षिणात्य खिरी या अनेकविध उप-घटकांच्या भाऊगर्दीमध्ये मूळ ओळख हरवून बसलेल्या भासतात तर रव्याची खीर चवीला उत्कृष्ट असूनही दशक्रियाविधीसारख्या अमंगळ गोष्टींशी संबंध आल्याने जेवणाच्या टेबलावर उजळ माथ्याने फिरू शकत नाही. वास्तविक इतर राजमान्य पक्वान्ने उपलब्ध नसताना एक पर्याय म्हणून खीरींचा समावेश भोजनात केला जातो. पण या बद्दल कसलाही विषाद न बाळगता एखाद्या शिस्तबद्ध कॉम्रेडप्रमाणे खीर आपले कर्तव्य बजावून जाते.
लाडू – मिठाईच्या विस्तीर्ण प्रांगणामध्ये अढळस्थान मिळवलेलं बाळसेदार, लोकप्रिय व्यक्तीमत्व म्हणजे लाडू. या ना त्या कारणाने घराघरामध्ये लाडूभक्षणाचे प्रसंग सतत ओढवत असतात. लाडू म्हटले की तो गोल असायचाच. पृथ्वीच्या गोळ्याचा आकार घेऊन आलेल्या लाडवाला देवाच्या नैवेद्यामध्ये अग्रक्रम मिळतो. बुंदीचा लाडू, रव्याचा लाडू, बेसन लाडू, कणकेचा लाडू, डिंकाचा लाडू, चुरमुर्याचा लाडू, नारळाचा लाडू, अळिवाचा लाडू, गुलकंद लाडू अश्या असंख्य ज्ञात-अज्ञात प्रकृतींमध्ये असू शकणारा लाडू खाणार्यांचचे चांगलेच लाड पुरवतो. लाडवाचा बोकणा भरल्यानंतरचे संभाषण हे स्वरांऐवजी ’उम्म’ ’वॉम’ ’ह्म्म’ ’ऑ’ ’ऑम’ अश्या व्यंजनांमध्येच जास्ती होत असते. त्यामुळेच की काय चाणाक्ष लोक लाडू कंठाखाली उतरेपर्यंत मौनाची कास धरतात. समारंभात अगर काही उल्लेखनीय यश मिळवल्यानंतर लाडू वाटण्याची प्रथा आहे. पण असा औपचारिकतेच्या वर्खात गुंडाळलेला लाडू का कोण जाणे तितकासा गोड लागत नाही !
लाडूसमूहाचे रूपडे खरे उठून दिसते ते घरी मांडलेल्या लक्ष्म्यांच्या आराशीसमोर आणि दिवाळीच्या उत्सवी वातावरणात. या दोन्हीही प्रसंगी सर्व संकोच, सर्व काळज्या बाजूला ठेवून लाडवाच्या मोठाल्या खंडांनी आपले गाल फुगवावेत अशी बहुधा भगवंताची देखील इच्छा असावी... ताटात असो की पोटात, लाडू हा कमालीचे समाधान देऊन जातो असा सार्वत्रिक अनुभव आहे.
गुलाबजामुन – माणसाने मिष्टान्न का खावे याचे प्रत्यंयकारी उत्तर देणारा, हाती यायच्या आधीच मोहाची कुंपणे उध्वस्त करत वाढप्याच्या पात्रात मन गुंतायला लावणारा, रूप-रस-स्पर्श-गंध या चारही हुकुमी ऐक्क्यांमध्ये सरस असणारा व प्रत्येक भेटीत एक वेगळाच आठव देऊन जाणारा गुलाबजाम हे निर्विवादपणे एक श्रेष्ठ पक्वान्न म्हणून गणायला हरकत नाही. याच्या नावातील ’गुलाब’ भाकड अर्थाने आला असून ’जाम’ अथवा ’जामुन’ मात्र व्याख्येप्रमाणे खाणार्याची मती गुंग करायला समर्थ आहे. व्यावहारीक सोयीसाठी पाकातले आणि कोरडे असे गुलाबजामाचे दोन गट पाडले जातात. तसेच दंडाकार व गोल असे भौमितीक भेदभावही ते करण्याच्या पद्दतीनुसार ढोबळमानाने सापडतात.
गुलाबजाम हे खर्या अर्थाने स्वतंत्र पक्वान्न. ’याल तर तुमच्यासह, न याल तर तुमच्यावाचून’ अश्या करारी बाण्याने गुलाबजाम आपली जीवनयात्रा आक्रमत असते. आपलं अस्तित्व कुणावरही अवलंबून नसल्याने पोळीपासून ते चटणीपर्यंत कुठल्याचं बाह्यघटकाचा टेकू घेण्याची आवश्यकता त्याला भासत नसते. २/३ बहुमताने निवडून आलेल्या सरकारसारखं गुलाबजामचं तंत्र हे अगदी स्वायत्त बाण्याचं असतं.
जिलेबीप्रमाणेच गुलाबजाम हा एकापेक्षा अधिक अश्या मोजमापात खायचा पदार्थ आहे. विशेषतः पाकातले गुलाबजामून हे डोंगर रचून निथळणार्या पाकाकडे लक्ष न देता वेगाने खावेत असा रूढ नियम आहे. गुलाबजाम कधीही तोडून खाऊन नयेत. त्याचा मान हा समग्रतेमध्ये आहे. आपल्याला झेपणार्या आकाराचा गोळा उचलावा, पाकाला सावरण्याचा अयशस्वी प्रयत्न करावा व सरतेशेवटी यातील फोलपणा ध्यानी आल्यावर आपली वस्त्रे सांभाळत आख्खा गुलाबजाम मटकवावा असे रसिकशास्त्र सांगते.
खरपूसपणा हा गुलाबजामची आसक्ती वाढवण्यास कारणीभूत ठरणारा एक प्रमुख गुणधर्म. अट्टल खवय्ये गुलाबजामच्या बाह्यरंगावरून त्याच्या चवीचा अंदाज बांधण्यामध्ये मश्गुल झालेले दिसून येतात. साखरेत लोळवलेले कोरडे गुलाबजाम हा अतीव समाधान देऊन जाणारा मिठाईचा प्रकार. इतकी वर्षे होऊन गेली तरी पाकासहीत अथवा पाकाविना नांदणार्या गुलाबजामुनाचे गारूड गोडघाश्यांच्या मनावर अद्यापही तसेच कायम आहे.
आमरस – आंबा म्हणजे फळांचा राजा. त्याचे वैभवशाली साम्राज्य कैरीच्या पन्ह्यापासून ते आंबा बर्फीपर्यंत दिमाखात पसरलेलं दिसतं. या राज्याचा मानबिंदू म्हणजे आमरस. लहानपणी गोष्टी ऐकताना, पुस्तके वाचताना जिथे जिथे ’अमृत’ हा शब्द यायचा, तिथे तिथे कोकणी हापूसच्या घट्ट आमरसाचीच छबी माझ्या डोळ्यांसमोर उभी रहायची. आमरस म्हणजे तृप्ती. आमरस म्हणजे घनीभूत गोडवा. आमरस म्हणजे समरसता आणि आमरस म्हणजे आतबाहेर ओथंबलेला रसास्वाद. काही गोष्टींवर चर्चा करण्यापेक्षा थेट त्यामध्ये उतरण्यात मौज असते. आमरस सेवन ही त्याच यादीतील अग्रक्रमाने येणारी बाब! वैशाखातल्या दुपारी सूर्य डोईवर आलेला असावा... निवांत, निष्पर्ण वातावर
णात आंब्याच्या सालीचा अन् कोयीचा वास दरवळू लागावा.. मोठ्या पातेल्यामध्ये रत्नागिरी हापूसच्या रसाची पातळी क्षणागणिक वाढत जावी.... आपापल्या रूचीनुसार बर्फ, दूध किंवा बाधू नये म्हणून तूप घातलेलं आमरसाचं मोठं पात्र पुढ्यात यावं...घराचा कानाकोपरा पिवळाजर्द भासू लागावा.... आवेगाने पहिला भुरका घ्यावा आणि पोटात आमराई उमलून यावी.. आता कोकीळाचं कूजन आणि चैत्रातला मोहोर आमरसाच्या प्रत्येक हप्त्यागणिक रोमरोमात भिनायला सुरूवात व्हावी.. बास्सं! आमरस हा बोलायचा नसून त्यामध्ये नखशिखांत डुंबायचा विषय आहे!!
आईसक्रीम – जगामधील सर्व मानवांची विभागणी दोन गटांत करता येते – आईसक्रीम खाऊ शकणारे आणि आईसक्रीम खाऊ न शकणारे... आईसक्रीम आवडतच नाही असा द्विपाद प्राणी पृथ्वीतलावर सापडणे जरा कठीणच आहे. काही वैद्यकीय कारणांमुळे आईसक्रीम खाण्यावर बंधने आली की मनुष्याला अतीव दुःख होते. कसलेही दोष काढायला कणभरही जागा नसलेल्या आईसक्रीमने जनमानसाला अक्षरशः भुरळ घातली आहे.
वास्तविक नेहमीचेच दूध, साखर आणि संगतीला काही नैमित्तीक साथीदार घेऊन तयार केला जाणारा हा पदार्थ. पण शीतप्रक्रीयेचा परिसस्पर्श लाभला की थक्क करून टाकणारा जादूटोणा घडतो. गोठवलेल्या रूपड्यात स्वतःला अभिव्यक्त करत आईसक्रीम अश्या काही चित्तवेधक धाटणीने समोर येते की त्याला ’नकार देणे’ ही मरणप्राय घटना होऊन बसते. आईसक्रीम हा खर्या अर्थाने वैश्विक पदार्थ. जगाच्या कानाकोपर्यात कुठेही, कोणत्याही किमतीत उपलब्ध असणारे आईसक्रीम म्हणजे नवयुगातील मानवाला सापडलेला संतोषाचा ठेवाच आहे. आईसक्रीम केंव्हा, कसे आणि किती खावे याबद्दल जाणकारांमध्ये मतभिन्नता आढळते. वास्तविक या चित्तहारक, देखण्या कलाकृतीला स्थळकाळाचा कोणताही निकष नाही. भर थंडीमध्ये रात्रीच्या जेवणानंतर दात वाजत असताना, गार वाफा येत असलेल्या आईसक्रीम गोळ्याचा लचका तोडण्याची लज्जत जशी न्यारी तसे रणरणत्या उन्हात अंगाची लाही लाही होत असताना सॉफ्टीचा दाह शमवून जाणारा कोनही काही औरच!
आईसक्रीम हे भोजनाची कहाणी सुफळ, संपूर्ण करणारे पाश्चात्य उगमाचे वरदान आहे. याच्या चतुरंग सेनेमध्ये चोकोबार, मस्तानी, थिकशेक, मिल्कशेक, कुल्फी, कॅंडी इत्यादी अनेक सुखदायक उत्पादने सहजच अंतर्भूत असतात.
घसा बसेल अगर सर्दी होईल अश्या भीतीपोटी चाचरत चाचरत आईसक्रीम खाणारे लोक पाहिले की मला गलबलून येते. खरं म्हणजे जेवणाला परीपूर्णता आणण्यासाठी थंड आणि गोड पदार्थाची नितांत आवश्यकता असते. शून्य तपमानाच्या खाली जाऊन, आपलं सर्वस्व पणाला लावून आईसक्रीमचा गोळा तयार झालेला असतो. इंद्रधनुष्यासारखे अनेक रंग, अनेक हरहुन्नर चवी यांनी त्याचा शृंगार तडीस नेलेला असतो. रसिक माणसाने थेट पघळून जाऊन आईसक्रीमच्या अंतरंगात शिरकाव करणे अपेक्षित असते. आणि तसे अपरिमीत प्रेम करणारे आईसक्रीमचे कट्टर चाहते जगभर पसरलेले दिसतात. आबालवृद्धांना वेड लावणार्या या लाडक्या आईसक्रीमरूपी जादूगाराची महती वर्णावी तेवढी थोडीच आहे.
आपलं जीवन म्हणजे संघर्षाचं जीवन. अनेक व्याप, संकटे, प्रारब्धाच्या खडतर वाटा यांनी त्रासलेल्या मानवाला घटका-दोन घटका सुखाचा प्रत्यय यावा म्हणून भगवंताने विश्वात गोडाची निर्मिती केली. एरव्ही फुत्कारत असलेला, पिसून गेलेला जीव या पक्वान्नांच्या सेवनाने थोडा वेळ का होईना आनंदाला प्राप्त होतो. जीवनाची सार्थकता ही अशीच छोट्या छोट्या क्षणांमध्ये गवसणार्यान आनंदाच्या बेटांमध्ये आहे. तेंव्हा निर्धास्त मनाने आणि ईश्वराचा प्रसाद म्हणून आपणही या मिष्टान्नांवर आडवा हात मारूया अन् प्रफुल्लीत मनाने म्हणूया, “कुछ मीठा हो जाये !!”
ज्याप्रमाणे मैफिलीची सांगता भैरवीने होते, क्रिकेट विश्वचषकाचा शेवट षटकाराने होतो, रंगलेल्या कार्यक्रमाची सांगता पसायदानाने होते, नोकरीचा शेवट निरोपसमारंभाने होतो आणि जीवनाचा शेवट मृत्यूने होतो त्याच धर्तीवर मेजवानीच्या अंती एखाद्या पक्वान्नाचं असणं हे ठरलेलंच!! जेवणातले गोडधोड ही एक अटळ बाब म्हणून एव्हाना आपण स्वीकारलेली आहे. गोड पदार्थ अगर मिष्टान्न हा फक्त भारतीयच नव्हे तर जागतिक उदरभरणाचा परमोच्च बिंदू आहे. मूळ भोजन काहीही असो त्याची यशस्वी पूर्ती होण्यामध्ये या पक्वान्नांचा सिंहाचा वाटा असतो. असा भुकेल्यांच्या वाट्याला आलेला क्षण मधुर करून टाकणार्या बिनीच्या शिलेदारांपैकी काही निवडक मंडळींची ही थोडक्यात ओळख !
पुरणपोळी – काही काही पदार्थ हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग होऊन गेलेले असतात. बहुतेक प्रमुख सणांना अनिवार्य असलेली पुरणपोळी ही अशीच अखिल मराठी मुकादमखान्यात नियमितपणे आढळणारी वस्तू!
गूळ, डाळ आणि नेहमीच्या वापरातली कणिक अश्या सुगम वस्तूंना हाताशी धरून केला जाणारा हा पदार्थ मग थेट भल्या भल्या पक्वानांना आव्हान द्यायला निघतो. गाभ्यामध्ये भरलेल्या कमीअधिक गोड पुरणाला घट्ट कवटाळून वर मऊसुत पदर फडकवणारी पुरणपोळी सणाचा ’फील’ लगेच देऊन जाते.गरमागरम पुरणपोळीला तुपाने आकंठ भिजवून त्याचा पहिला पिष्ठमय घास मुखात टाकताना होणारं सुख निव्वळ अवर्णनीय असतं. चवीला अतिशय चांगला असणारा हा पदार्थ करायला मात्र तितकाच अवघड आहे असे म्हणतात. जाणकारांनी अधिक खुलासा करावा! विशेषतः ’पुरण वाटणे’ या प्रक्रीयेला अनेक वर्षांपासून एक वेगळंच वलय प्राप्त झालं आहे. कधीही फसण्याची शक्यता असलेले पुरणाचे तंत्र जिला सांभाळता येते, तिचा घरामध्ये तातडीने ’सुगरण’ या उपाधीने सन्मान होतो. आजकालच्या यंत्राच्या आणि तंत्राच्या युगातही मन लावून, कष्टाने भरघोस पुरण वाटणार्यास गृहिणी पाहिल्या की आपली संस्कृती टिकून राहिली आहे याची मनोमन खात्री पटते.
पुरणपोळीची साथसंगत कोणी करावी हा वैयक्तिक आवडीनिवडीचा विषय आहे. दूध आणि कटाची आमटी हे पुरणपोळीचे पारंपारिक साथीदार. तुपात सचैल भिजलेली पोळी दूधात बुडवून खाताना स्वर्गीय सुख होतेच पण तिला आंबूस, तिखट अश्या कटाच्या आमटीची जोड लाभली की भोजनार्थीला एक वेगळीच रूचकर चव चाखण्याचे भाग्य लाभते. मराठवाड्यातील अथवा विदर्भातील काही काही मंडळी पुरणपोळी आमरसा बरोबर खाण्याचा प्रयोग करतात. पण हे म्हणजे किशोरी आमोणकर आणि लता मंगेशकर यांची संयुक्त मैफील ठेवण्यासारखे आहे. आपापल्या जागी दोन्हीही महान असले तरी आमरस हा आमरसाच्या बेहोशीत खावा व पुरणपोळी ही तिचा मान ठेवून साग्रसंगीत खावी हेच उत्तम.
येणार्या प्रत्येक सणागणिक पुरणपोळीची वेगवेगळी रूपे पहावयास मिळतात. श्रावणातली पुरणपोळी ही नाकातली नथ सांभाळत, शालीनतेची वस्त्रे लेवून आलेल्या घरंदाज कुलवधूसारखी भासते. खरं तर सगळा श्रावणंच एक पावित्र्याचा गजर करत येतो. त्याच दैवी आसमंतात, किंचीतश्या कुंद पावसाळी हवेत खरपूस, गरमागरम अश्या पुरणपोळ्या कुरोड्या-पापड्यांसह ताटात पडायला लागल्या की श्रावणातला घननिळा अंतःकरण व्यापायला सुरूवात करतो. पोळ्याची पुरणपोळी म्हणजे श्रमिकांच्या कष्टाने शिंपलेला प्रसाद वाटतो. लग्नाआधीच्या विधींमध्ये वाढल्या जाणार्या गुळचट पुरणपोळीमध्ये मंगलकार्य आणि मंगलकार्यामधील केटरींगवाला या दोहोंचीही टीपीकल खूण उमटलेली असते. श्राद्धपक्षात काही घरांमध्ये केल्या जाणार्या पुरणपोळ्या या अक्षरशः कर्तव्यकर्म उरकून टाकल्यासारख्या थोडक्यात आटोपलेल्या असतात. धकाधकीच्या जगातली पूर्वजांविषयीची ही अनास्था मग ताटात वाढलेल्या पोळीला गोड लागू देत नाही.
बाकी पुरणपोळीचा खरा मान आणि यथोचित सन्मान होतो तो होळीच्या दिवशी! या सणाला पुरणपोळीचा बेत जो काही जमून येतो त्याची सर कोणत्याही दिवसाला येणे नाही. यादिवशी पुरणपोळीला केंद्रस्थानी ठेवूनच जेवणाची रचना केलेली असते. ’होळी रे होळी, पुरणाची पोळी’ या हाकाळीबरोबर आपापल्या घरी केलेली पुरणपोळी मोठ्या आवडीने खाल्ली जाते आणि असे भुरके मारत तव्यावरच्या ऊन-ऊन पोळ्या खाणार्या कुटुंबियांना बघून हाडाच्या गृहलक्ष्मीला परम तोष प्राप्त होतो.
बासुंदी – दूधाचं दूधपण जाऊन त्याची माया घट्ट होऊ लागली की त्याला ’बासुंदी’ म्हणावं. बासुंदी हा जीभेसकट मनाला तोषवणारा एक असाधारण प्रकार आहे. सर्वसामान्यतः एखादी गोष्ट आटू लागली की आपल्याला दुःख होतं. पण इथे मात्र बासुंदीला फुटलेल्या प्रत्येक उकळीगणिक करणार्याचा उत्साह हा वाढताना दिसतो. बासुंदी हा खर्या अर्थाने राजेशाही पदार्थ. काही काही गोष्टी ठरवल्या तरी कुरूप बनू शकत नाहीत. त्या पद्धतीने गरीबाघरची काटकसरीची किंवा गर्भश्रीमंत्याच्या पाकखान्यातील सोनेरी पात्रांमध्ये वास्तव्याला असलेली बासुंदी ही चवीला लाजवाबच असते. तपमान आणि बाह्य भेसळीची नेटकी काळजी घेतली की तयार होणारी बासुंदी ही ’वाहवा’ मिळवूनच जाते.
बासुंदी चमच्याने खाणारे नेमस्त लोक मला पहावत नाहीत. डायबेटीस, शुगर, कोलेस्टेरॉल, बीपी, पित्त अश्या मानवविरोधी असंख्य शत्रूंमुळे काही काही जणांवर ही वेळ येते. पण इतरांनी मात्र बासुंदी हा ’खाण्याची’ नसून ’पिण्याची’ वस्तू आहे याच आविर्भावात घोट घ्यावेत. तोंडात मावेनाशी होऊन ओष्ठद्वयावरून ओघळणार्या सुमधुर थेंबांखेरीज जगात मनोहर अजून काही नाही याची प्रचिती आपल्याला निकराच्या बासुंदीप्राशनाने येते.
बासुंदीचा आग्रह हा साधारणपणे खाणार्याच्या डोळ्यांच्या फटीच्या घटत्या आकारमानानुसार करावा. बासुंदीचा जोर वाढत चाललेला असतो. जायफळ, वेलदोडे आणि इतर सुक्या मेव्याचे तुकडे अल्पावधीतल आपले काम दाखवायला लागलेले असतात. प्रत्येक घासागणिक पोट, जीभ, मन आणि मेंदू यांचा तीव्र झगडा चालू झालेला असतो. सुस्तीच्या सुनामी येऊन आदळू लागलेल्या असतात. त्याचा योग्य तो अंदाज घेऊन वाढप्याने पुढची वाटी भरावी असा पूर्वापार चालत आलेला संकेत आहे. पट्टीचे खाणारे मात्र कसलेल्या अभिनेत्याप्रमाणे आपल्या गुंगीच्या खुणा लपवून ठेवत शक्य तेवढी बासुंदी आपल्या कंठात रिती करतात.
सांप्रत काळात, ’रबडी’ आणि ’रसमलाई’ या बासुंदीच्या दोन भगिनींचं प्रस्थ वाढलेलं दिसतं. दूधाला थोडं कमी आटवून त्यामध्ये गोळे सोडले की रस मलाई आणि त्यामध्ये इतर घटकांचं मिश्रण केलं की रबडी तयार होते. हे दोन्हीही पदार्थ एखाद्या स्वागतसमारंभात अगर सार्वजनिक कार्यक्रमात ठीक वाटतात पण घरगुती मिष्टान्नासाठी पारंपारीक बासुंदीला तोड नाही. बासुंदीमध्ये पेढे कुस्करून घालण्याची प्रथा अजूनही काही रसिक लोकांमध्ये टिकून आहे. क्वचित केंव्हा केंव्हा केशराच्या काड्या आणि मुबलक चारोळ्या घातलेली बासुंदीही आपल्या पुढ्यात येते.
बासुंदी थंड खावी की गरम याविषयी अनेक मतमतांतरे आहेत. फ्रीजमध्ये पुरेशी थंड केलेली बासुंदी जीभेपासून जठरापर्यंत सर्व अवयवांना गोड गारवा देत जाते. त्यातील घनवटपणा द्विगुणित झाल्याचा अनुभव बर्याच मंडळींनी वर्णिला आहे. काही खवैयांच्या मते मात्र उकळी फुटलेली गरमागरम बासुंदी हीच खरी संतोषजनक पाककृती आहे. कुठल्याही पद्धतीने असो, बासुंदी ही खाणार्याला जालीम समाधान देऊन जाते हे मात्र खरं !
श्रीखंड – श्रीमंताघरी जन्माला आलेलं, एखादं चांगल्या नशिबाचं गुटगुटीत लेकरू असावं तसा श्रीखंड हा सर्वकाळी आपल्या मिजासीत वावरणारा पदार्थ आहे. कुंडलीत राजयोग घेऊनच श्रीखंडाने आपल्या भोजनाच्या प्रांतात पाऊल टाकलं असावं! चक्का, साखर आणि दिमतीला जुजबी इतर
पदार्थ इतकीच सामुग्री असूनही पूर्णत्वाला गेल्यावर श्रीखंडाचा दिमाख असा काही वाढतो की इतरांना त्याचा तद्दन हेवा वाटावा!! घट्ट अश्या या दूग्धजन्य कृतीचा पहिलाच घास मिष्टान्नाची सर्वंकष खुमारी देऊन जातो. पुरी अथवा पोळी, वाटी अथवा डिश, घरगुती अथवा दुकानातील ब्रॅंडेड वेष्टन - कोणत्याही विकल्पामध्ये श्रीखंडाचा तोरा तसूभरही ढळत नाही. आधी डोळ्यांना व नाकाला पुरेश्या सुखोर्मी देऊन झाल्यावर मुखात घास घेतल्या क्षणापासून श्रीखंड जीभेशी लडीवाळ करू लागतं. जिव्हेच्या सर्व पेशींना हवेहवेसे लाडीक, मृदू स्पर्श करून होईस्तोवर त्या गोळ्याचं अवतारकार्य संपून देखील जातं. मग नादावलेल्या मनाने पुढचा घास घेणं, तो काही काळ तसाच तोंडात घोळत राहणं आणि मग अन्ननलिकेच्या अस्तरांना दुलईदारपणे खेटत खेटत त्याने इप्सित स्थळी पोहोचणं ही क्रिया बराच काळ चालू राहते. श्रीखंडग्रहणातलं सर्वोच्च शिखर गाठलं जातं ते पात्रातील श्रीखंड संपत आल्यावर! अंगठा वगळता हाताच्या कोणत्याही एका किंवा एकापेक्षा अधिक बोटांचा वापर करून उर्वरीत श्रीखंड चाटण्याची लज्जत काही न्यारीचं. चमच्यात अथवा पुरीमध्ये न सापडणारे अवशेष बोटांनी कब्जामध्ये घेऊन भांडे स्वच्छ, लख्ख केले की श्रीखंडपुराणाची इतिश्री होते.आम्रखंड हा श्रीखंडाचा मोठा सौंदर्यवान उपप्रकार आपल्याकडे आढळतो. हापूस किंवा तत्सम उच्च प्रजातीच्या आंब्याचा गर अथवा रस घातला की एरव्ही उद्धट वाटणारी श्रीखंडाची श्रीमंत कांती एक हवेहवेसे रूपलावण्य धारण करते. आम्रखंड ही पाहताक्षणी प्रेमात पाडणारी पाककृती. केशरी रंगात न्हाऊन निघालेले, आंब्याच्या फोडींचे केंद्रशासित अस्तित्व विनातक्रार मान्य करणारे अन् अक्षयतृतीयेपासून ते लग्नाच्या रिसेप्शन पर्यंत सर्व ठिकाणी लक्षवेधक पद्धतीने मिरवणारे घट्ट आम्रखंड त्याच्या आठवणी कितीतरी काळ रेंगाळवत ठेवते.
जिलेबी – वळणं-वळणं घेत जाणार्या सगळ्याच गोष्टींचं मानवाला एक आदिम आकर्षण असतं. अनामिक वर्तुळांचा वेध घेत जाण्यात त्याचे आयुष्य जणू खर्ची पडते. पाकामध्ये बेमालूम मुरलेली, अनेक वेटोळ्यांनी स्वतःमध्ये गुरफटून बसलेली, एकाचवेळी कुरकुरीत आणि रसरशीत या दोन्ही लक्षणांनी युक्त अशी पिवळीधमक जिलेबी म्हणजे ताटाची शोभा कैकपटीने वाढवणारे प्रकरण आहे. जिलेबीची (प्राकृतातील उच्चार “जिलबी”) जाडी, आकार, विस्तार आणि वेटोळ्यांची संख्या ही जिलेबी तयार करणार्या व्यक्तीच्या सृजनशीलतेनुसार बदलत जाते. आपली कलाकुसर दाखवायला बल्लवाचार्यांना यापेक्षा मोठी संधी कुठेच मिळत नसावी. विशेषतः जिलेबीच्या सर्वात बाहेरच्या तिढ्याला सर्वात आतल्या आरंभबिंदूशी जोडण्यासाठी खानसामे जी काही कुशलता दाखवतात त्याने एखादा पट्टीच्या कलाकारालाही थक्क व्हायला होतं. मेंदीच्या कोनाची कल्पना जिलेबी तयार करण्याच्या रोमहर्षक कृतीकडे पाहून सुचली असावी असा अस्मादिकांना दाट संशय आहे.

कढईमध्ये जिलेबी उकळण्याचा कालावधी हा त्याच्या अंतिम गुणदोषांसाठी जबाबदार असा अत्यंत महत्वाचा घटक. कमी अथवा जास्त तळलेली जिलेबी मेजवानीचा इस्कोट करायला पुरेशी असते. त्यामुळे जिलेबी तयार करणार्याच्या मनाची एकाग्रता ही कायम कढई, कढईतील तूप अथवा पाक आणि त्या संयंत्राला मिळत असलेली आच यांच्याकडे एकवटलेली दिसते.
जिलेबी आणि विवाहभोजन यांचं एक अतूट नातं ठरून गेलेलं आहे. लग्नात मिरवणारी पिवळीधमक जिलबी मला नववधूच्या हरखून जाण्याचं आणि अंतरी फुललेल्या आमोदाचं प्रतिक वाटते. परातीमधून अगर मोठाल्या ताटांमधून केला जाणारा जिलेबीचा बेसुमार आग्रह हा अगदीच न टाळता येणारा प्रसंग असतो. ’एक जिलेबी’ असं परीमाण खरं तर आपल्याकडे अस्तित्वात नाही. हरीणाचे कळप, गुंडांच्या टोळ्या, अभिनंदनाचा वर्षाव किंवा प्रेक्षकांचे जथे असतात त्या प्रमाणे जिलेबी ही कायम दोन किंवा त्याच्या पटीमध्ये खाण्याची वस्तू मानली जाते. सुरूवातीच्या काही जिलेब्या तर फक्त माधुर्याची पार्श्वभूमी तयार करण्यासाठी खाल्ल्या जातात. बाकी जिलेबीचा खरा अंमल हा आग्रहाने वाढलेल्या अतिरीक्त जिलेब्यांनीच सुरू होतो.
वर्षानुवर्षे जिलेबीची इमान-इतबारे साथ करणारा तिचा सोयरासांगाती म्हणजे मठ्ठा. अत्यंत विपरीत गुणधर्म असलेले हे दोन्ही पदार्थ एकत्र आल्यावर मात्र जबरदस्त धमाल उडवतात. मठ्ठा-जिलेबी खाण्यासाठी उठसूट कोणत्याही लग्नाला जाणारे कित्येक जिलेबीप्रेमी मला माहित आहेत. पैजा लावून जिलेबी खाणारे लोक हे तिच्या गोडीच्या प्रेमात कधीच नसतात. अश्या लोकांना चवीच्या पद्यापेक्षा अंकगणिताच्या गद्यामध्ये जास्ती रस असतो. त्यापेक्षा अर्धशिशीवर उपचार म्हणून प्रातःकाळी उठल्या उठल्या, तोंडही न धुता जिलेबी खाणारे पामर हेच तिचे खरे उपासक !!
जिलेबीमध्ये रंग टाकून तिला केशरी बनवणे किंवा तिची जाडी वाढवून ’इमरती’ नावाचा विचित्र पदार्थ तयार करणे यातून फार काही साध्य होते असे मला वाटत नाही. हे म्हणजे मूळच्या गोर्यापान, सुंदर मुलीने उगाच टॅल्कम पावडर लावून अगर विसंगत रंगाचा मेक-अप करून बाहेर पडण्यासारखे आहे. चमचमत्या पिवळ्या रंगाने नटलेली आणि आतबाहेर पाकाच्या ओलाव्याने नितळ झालेली जिलेबी हेच तिचे लाखो लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेले साजिरे रूप....
खीर – पक्वान्नात वैविध्य आणायचं असेल तर ’खीर’ या लवचिक पदार्थाला पर्याय नाही. हव्या त्या मिश्रणात, हव्या त्या रूपात, हव्या त्या चवीत व हव्या त्या प्रमाणात पेश होणारी ’खीर’ म्हणजे अडीअडचणीला धावून येणारा देवदूत आहे. बहुतेक वेळा दूधाच्या समर्थ नेतृत्वाखाली कसलीही कुरबुर न करता सर्व घटकांनी आपापले योगदान दिले की ’खीर’ तयार होते. गरजेनुसार खीरीचे असंख्य अवतार स्वयंपाकघरात आणि तिथून थेट ताटामध्ये आविर्भूत होतात. शेवयाची खीर म्हणजे श्रीमंतांच्या रसमलाई अगर तत्सम भपक्याला गरीबांच्या अन्नपूर्णेने दिलेलं चोख उत्तर आहे. गव्हाची खीर उगाचच दंडातल्या बेटकुळ्या वर्धिष्णु झाल्याचा गोड गैरसमज करून देते. याचेच शहरी रूप असलेली दलियाची खीर आपला आटोपशीर व्यवहार नेमकेपणाने उरकत इतरांशी लगट टाळते. साबुदाण्याची खीर उपवासाचे महात्म्य पटवून देत असतानाच चेहरा स्थिर ठेवण्याची कला शिकवते. नाचणीची खीर नाडी तपासणार्या वैद्यासारखी गंभीरपणे काम करते. केरळी अथवा दाक्षिणात्य खिरी या अनेकविध उप-घटकांच्या भाऊगर्दीमध्ये मूळ ओळख हरवून बसलेल्या भासतात तर रव्याची खीर चवीला उत्कृष्ट असूनही दशक्रियाविधीसारख्या अमंगळ गोष्टींशी संबंध आल्याने जेवणाच्या टेबलावर उजळ माथ्याने फिरू शकत नाही. वास्तविक इतर राजमान्य पक्वान्ने उपलब्ध नसताना एक पर्याय म्हणून खीरींचा समावेश भोजनात केला जातो. पण या बद्दल कसलाही विषाद न बाळगता एखाद्या शिस्तबद्ध कॉम्रेडप्रमाणे खीर आपले कर्तव्य बजावून जाते.
लाडू – मिठाईच्या विस्तीर्ण प्रांगणामध्ये अढळस्थान मिळवलेलं बाळसेदार, लोकप्रिय व्यक्तीमत्व म्हणजे लाडू. या ना त्या कारणाने घराघरामध्ये लाडूभक्षणाचे प्रसंग सतत ओढवत असतात. लाडू म्हटले की तो गोल असायचाच. पृथ्वीच्या गोळ्याचा आकार घेऊन आलेल्या लाडवाला देवाच्या नैवेद्यामध्ये अग्रक्रम मिळतो. बुंदीचा लाडू, रव्याचा लाडू, बेसन लाडू, कणकेचा लाडू, डिंकाचा लाडू, चुरमुर्याचा लाडू, नारळाचा लाडू, अळिवाचा लाडू, गुलकंद लाडू अश्या असंख्य ज्ञात-अज्ञात प्रकृतींमध्ये असू शकणारा लाडू खाणार्यांचचे चांगलेच लाड पुरवतो. लाडवाचा बोकणा भरल्यानंतरचे संभाषण हे स्वरांऐवजी ’उम्म’ ’वॉम’ ’ह्म्म’ ’ऑ’ ’ऑम’ अश्या व्यंजनांमध्येच जास्ती होत असते. त्यामुळेच की काय चाणाक्ष लोक लाडू कंठाखाली उतरेपर्यंत मौनाची कास धरतात. समारंभात अगर काही उल्लेखनीय यश मिळवल्यानंतर लाडू वाटण्याची प्रथा आहे. पण असा औपचारिकतेच्या वर्खात गुंडाळलेला लाडू का कोण जाणे तितकासा गोड लागत नाही !
लाडूसमूहाचे रूपडे खरे उठून दिसते ते घरी मांडलेल्या लक्ष्म्यांच्या आराशीसमोर आणि दिवाळीच्या उत्सवी वातावरणात. या दोन्हीही प्रसंगी सर्व संकोच, सर्व काळज्या बाजूला ठेवून लाडवाच्या मोठाल्या खंडांनी आपले गाल फुगवावेत अशी बहुधा भगवंताची देखील इच्छा असावी... ताटात असो की पोटात, लाडू हा कमालीचे समाधान देऊन जातो असा सार्वत्रिक अनुभव आहे.
गुलाबजामुन – माणसाने मिष्टान्न का खावे याचे प्रत्यंयकारी उत्तर देणारा, हाती यायच्या आधीच मोहाची कुंपणे उध्वस्त करत वाढप्याच्या पात्रात मन गुंतायला लावणारा, रूप-रस-स्पर्श-गंध या चारही हुकुमी ऐक्क्यांमध्ये सरस असणारा व प्रत्येक भेटीत एक वेगळाच आठव देऊन जाणारा गुलाबजाम हे निर्विवादपणे एक श्रेष्ठ पक्वान्न म्हणून गणायला हरकत नाही. याच्या नावातील ’गुलाब’ भाकड अर्थाने आला असून ’जाम’ अथवा ’जामुन’ मात्र व्याख्येप्रमाणे खाणार्याची मती गुंग करायला समर्थ आहे. व्यावहारीक सोयीसाठी पाकातले आणि कोरडे असे गुलाबजामाचे दोन गट पाडले जातात. तसेच दंडाकार व गोल असे भौमितीक भेदभावही ते करण्याच्या पद्दतीनुसार ढोबळमानाने सापडतात.
गुलाबजाम हे खर्या अर्थाने स्वतंत्र पक्वान्न. ’याल तर तुमच्यासह, न याल तर तुमच्यावाचून’ अश्या करारी बाण्याने गुलाबजाम आपली जीवनयात्रा आक्रमत असते. आपलं अस्तित्व कुणावरही अवलंबून नसल्याने पोळीपासून ते चटणीपर्यंत कुठल्याचं बाह्यघटकाचा टेकू घेण्याची आवश्यकता त्याला भासत नसते. २/३ बहुमताने निवडून आलेल्या सरकारसारखं गुलाबजामचं तंत्र हे अगदी स्वायत्त बाण्याचं असतं.
जिलेबीप्रमाणेच गुलाबजाम हा एकापेक्षा अधिक अश्या मोजमापात खायचा पदार्थ आहे. विशेषतः पाकातले गुलाबजामून हे डोंगर रचून निथळणार्या पाकाकडे लक्ष न देता वेगाने खावेत असा रूढ नियम आहे. गुलाबजाम कधीही तोडून खाऊन नयेत. त्याचा मान हा समग्रतेमध्ये आहे. आपल्याला झेपणार्या आकाराचा गोळा उचलावा, पाकाला सावरण्याचा अयशस्वी प्रयत्न करावा व सरतेशेवटी यातील फोलपणा ध्यानी आल्यावर आपली वस्त्रे सांभाळत आख्खा गुलाबजाम मटकवावा असे रसिकशास्त्र सांगते.
खरपूसपणा हा गुलाबजामची आसक्ती वाढवण्यास कारणीभूत ठरणारा एक प्रमुख गुणधर्म. अट्टल खवय्ये गुलाबजामच्या बाह्यरंगावरून त्याच्या चवीचा अंदाज बांधण्यामध्ये मश्गुल झालेले दिसून येतात. साखरेत लोळवलेले कोरडे गुलाबजाम हा अतीव समाधान देऊन जाणारा मिठाईचा प्रकार. इतकी वर्षे होऊन गेली तरी पाकासहीत अथवा पाकाविना नांदणार्या गुलाबजामुनाचे गारूड गोडघाश्यांच्या मनावर अद्यापही तसेच कायम आहे.
आमरस – आंबा म्हणजे फळांचा राजा. त्याचे वैभवशाली साम्राज्य कैरीच्या पन्ह्यापासून ते आंबा बर्फीपर्यंत दिमाखात पसरलेलं दिसतं. या राज्याचा मानबिंदू म्हणजे आमरस. लहानपणी गोष्टी ऐकताना, पुस्तके वाचताना जिथे जिथे ’अमृत’ हा शब्द यायचा, तिथे तिथे कोकणी हापूसच्या घट्ट आमरसाचीच छबी माझ्या डोळ्यांसमोर उभी रहायची. आमरस म्हणजे तृप्ती. आमरस म्हणजे घनीभूत गोडवा. आमरस म्हणजे समरसता आणि आमरस म्हणजे आतबाहेर ओथंबलेला रसास्वाद. काही गोष्टींवर चर्चा करण्यापेक्षा थेट त्यामध्ये उतरण्यात मौज असते. आमरस सेवन ही त्याच यादीतील अग्रक्रमाने येणारी बाब! वैशाखातल्या दुपारी सूर्य डोईवर आलेला असावा... निवांत, निष्पर्ण वातावर
आईसक्रीम – जगामधील सर्व मानवांची विभागणी दोन गटांत करता येते – आईसक्रीम खाऊ शकणारे आणि आईसक्रीम खाऊ न शकणारे... आईसक्रीम आवडतच नाही असा द्विपाद प्राणी पृथ्वीतलावर सापडणे जरा कठीणच आहे. काही वैद्यकीय कारणांमुळे आईसक्रीम खाण्यावर बंधने आली की मनुष्याला अतीव दुःख होते. कसलेही दोष काढायला कणभरही जागा नसलेल्या आईसक्रीमने जनमानसाला अक्षरशः भुरळ घातली आहे.
वास्तविक नेहमीचेच दूध, साखर आणि संगतीला काही नैमित्तीक साथीदार घेऊन तयार केला जाणारा हा पदार्थ. पण शीतप्रक्रीयेचा परिसस्पर्श लाभला की थक्क करून टाकणारा जादूटोणा घडतो. गोठवलेल्या रूपड्यात स्वतःला अभिव्यक्त करत आईसक्रीम अश्या काही चित्तवेधक धाटणीने समोर येते की त्याला ’नकार देणे’ ही मरणप्राय घटना होऊन बसते. आईसक्रीम हा खर्या अर्थाने वैश्विक पदार्थ. जगाच्या कानाकोपर्यात कुठेही, कोणत्याही किमतीत उपलब्ध असणारे आईसक्रीम म्हणजे नवयुगातील मानवाला सापडलेला संतोषाचा ठेवाच आहे. आईसक्रीम केंव्हा, कसे आणि किती खावे याबद्दल जाणकारांमध्ये मतभिन्नता आढळते. वास्तविक या चित्तहारक, देखण्या कलाकृतीला स्थळकाळाचा कोणताही निकष नाही. भर थंडीमध्ये रात्रीच्या जेवणानंतर दात वाजत असताना, गार वाफा येत असलेल्या आईसक्रीम गोळ्याचा लचका तोडण्याची लज्जत जशी न्यारी तसे रणरणत्या उन्हात अंगाची लाही लाही होत असताना सॉफ्टीचा दाह शमवून जाणारा कोनही काही औरच!आईसक्रीम हे भोजनाची कहाणी सुफळ, संपूर्ण करणारे पाश्चात्य उगमाचे वरदान आहे. याच्या चतुरंग सेनेमध्ये चोकोबार, मस्तानी, थिकशेक, मिल्कशेक, कुल्फी, कॅंडी इत्यादी अनेक सुखदायक उत्पादने सहजच अंतर्भूत असतात.
घसा बसेल अगर सर्दी होईल अश्या भीतीपोटी चाचरत चाचरत आईसक्रीम खाणारे लोक पाहिले की मला गलबलून येते. खरं म्हणजे जेवणाला परीपूर्णता आणण्यासाठी थंड आणि गोड पदार्थाची नितांत आवश्यकता असते. शून्य तपमानाच्या खाली जाऊन, आपलं सर्वस्व पणाला लावून आईसक्रीमचा गोळा तयार झालेला असतो. इंद्रधनुष्यासारखे अनेक रंग, अनेक हरहुन्नर चवी यांनी त्याचा शृंगार तडीस नेलेला असतो. रसिक माणसाने थेट पघळून जाऊन आईसक्रीमच्या अंतरंगात शिरकाव करणे अपेक्षित असते. आणि तसे अपरिमीत प्रेम करणारे आईसक्रीमचे कट्टर चाहते जगभर पसरलेले दिसतात. आबालवृद्धांना वेड लावणार्या या लाडक्या आईसक्रीमरूपी जादूगाराची महती वर्णावी तेवढी थोडीच आहे.
आपलं जीवन म्हणजे संघर्षाचं जीवन. अनेक व्याप, संकटे, प्रारब्धाच्या खडतर वाटा यांनी त्रासलेल्या मानवाला घटका-दोन घटका सुखाचा प्रत्यय यावा म्हणून भगवंताने विश्वात गोडाची निर्मिती केली. एरव्ही फुत्कारत असलेला, पिसून गेलेला जीव या पक्वान्नांच्या सेवनाने थोडा वेळ का होईना आनंदाला प्राप्त होतो. जीवनाची सार्थकता ही अशीच छोट्या छोट्या क्षणांमध्ये गवसणार्यान आनंदाच्या बेटांमध्ये आहे. तेंव्हा निर्धास्त मनाने आणि ईश्वराचा प्रसाद म्हणून आपणही या मिष्टान्नांवर आडवा हात मारूया अन् प्रफुल्लीत मनाने म्हणूया, “कुछ मीठा हो जाये !!”
Subscribe to:
Posts (Atom)
